शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

राष्ट्रवादीच्या ५५ नगरसेवकांच्या गट स्थापनेचा मुहूर्त पुन्हा टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 02:19 IST

तांत्रिक त्रुटीचे कारण : बुधवारी होणार विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेतील सत्तांतराच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. राष्ट्रवादीच्या ५५ नगरसेवकांची महापौर बंगल्यावर सोमवारी बैठक पार पडली. त्यानंतर दुपारी ३ वाजता कोकण आयुक्तांकडे जाऊन वेगळा गट स्थापन करण्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. परंतु या प्रक्रियेत काही तांत्रिक त्रुटी राहिल्याने ५५ नगरसेवकांच्या विलीनीकरणाचा मुहूर्त टळला.

दरम्यान, मंगळवारी दिवसभरात राहिलेल्या त्रुटी दूर करून बुधवारी सकाळी कोकण आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अनंत सुतार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक भाजपत प्रवेश करणार असल्याने महापालिकेत सत्तांतर होणार आहे. या सत्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांना कोकण आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. या अगोदर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ६ सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र नियोजित ९ सप्टेंबरच्या भाजप प्रवेशाला मुख्यमंत्र्यांकडून तारीख न मिळाल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी महापौर बंगल्यावर ५५ नगरसेवकांची बैठक झाली. या वेळी नगरसेवकांची प्रतिज्ञापत्रे व इतर कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर दुपारी ३ वाजता कोकण आयुक्तांकडे जाऊन वेगळा गट स्थापन करण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, सायंकाळपर्यंत यासंदर्भात कोणतीच हालचाल झाली नाही. अखेर सायंकाळी राष्ट्रवादीचे नेते अनंत सुतार यांनी यासंदर्भात खुलासा करीत संभ्रम दूर केला.

कोकण आयुक्तांच्या सूचनेनुसार काही तांत्रिक बाबींची पूर्तता राहून गेल्याने विलीनीकरणाची प्रक्रिया होऊ शकली नाही. मात्र, मंगळवारी आवश्यक बाबींची पूर्तता करून बुधवारी सकाळी कोकण आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. त्यानंतर सायंकाळी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गणेश नाईक, संजीव नाईक यांच्यासह ५५ नगरसेवक भाजपत प्रवेश करतील, असे सुतार यांनी स्पष्ट केले आहे.