शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

पर्यावरण अहवालातून ३२ उद्याने गायब

By admin | Updated: September 30, 2016 04:14 IST

पाच वर्षांपासून महापालिकेच्या संकेतस्थळावर व पर्यावरण अहवालामध्ये शहरातील उद्यानांची संख्या १९९ असल्याचे भासविले जात होते. परंतु अद्ययावत संकेतस्थळ

- नामदेव मोरे,  नवी मुंबई पाच वर्षांपासून महापालिकेच्या संकेतस्थळावर व पर्यावरण अहवालामध्ये शहरातील उद्यानांची संख्या १९९ असल्याचे भासविले जात होते. परंतु अद्ययावत संकेतस्थळ व पर्यावरण अहवालामध्ये ही संख्या १६७ असल्याचे स्पष्ट केले आहे. तब्बल ३२ उद्याने कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विभागनिहाय उद्यानांचा असमतोल व प्रशासनाचा अनागोंदी कारभारही उघडकीस आला आहे. सिडकोबरोबर महापालिकेनेही शहराचा विकास करताना पक्षपाती धोरण राबविल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. शहराची शिल्पकार म्हणविणारी सिडको आम्ही प्रत्येक नोडमध्ये उद्यानासाठी भूखंड आरक्षित केले असल्याचे सांगते. महापालिका आम्ही प्रत्येक नोडवासीयांसाठी चांगली उद्याने तयार केली असल्याचे वारंवार सांगत आहे. परंतु वास्तवामध्ये दोन्ही आस्थापनांनी शहरवासीयांची दिशाभूल केली आहे. महापालिका आतापर्यंत शहरात १९९ उद्याने असल्याचे सांगत होते. परंतु काही महिन्यांपासून अचानक हा आकडा १६७ करण्यात आला आहे. यामुळे ३२ उद्याने कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलाव व इतर मोकळ्या जागेवरील हिरवळही उद्यान असल्याचे भासविले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्यानांचा दर्जाही त्या परिसरातील लोकवस्तीच्या आर्थिक स्तरावर अवलंबून आहे. नेरूळ पूर्व बाजूला श्रीमंतांची वसाहत असल्याने तेथे वंडर्स पार्क, रॉक गार्डन, आर. आर. पाटील उद्यान अशी भव्य उद्याने आहेत. दुसरीकडे नेरूळ पश्चिमेला गरिबांची वस्ती असल्याने तेथील उद्यानेही कमी खर्चामध्ये व कमी जागेत विकसित केली आहेत. हीच स्थिती वाशीमध्येही आहे. वाशीमध्येही माथाडी वसाहत असलेल्या ठिकाणी चांगली उद्याने नाहीत. कोपरखैरणे हा माथाडी कामगारांची वसाहत असलेला विभाग. येथील उद्यानांची स्थिती अत्यंत बिकट आहे. सिडकोने उद्यानांसाठी अत्यंत कमी जागा ठेवली आहे. सर्वात गंभीर स्थिती तुर्भे गाव व नोडमध्ये आहे तिथे उद्यानांसाठी पुरेसी जागाच नाही. घणसोलीमध्येही फक्त ३ उद्याने असून दिघामध्ये फक्त एकच उद्यान आहे. उद्यानांचे क्षेत्रफळ पाहिले तरी पालिका व सिडकोचे पक्षपाती धोरण स्पष्ट होते. बेलापूरमधील उद्यानांचे क्षेत्रफळ २ लाख ९ हजार चौरस मीटर आहे. नेरूळमध्ये २ लाख ४३ हजार एवढे आहे. कोपरखैरणेमध्ये दाट लोकवस्ती असूनही तेथे फक्त ५० हजार चौरस मीटर क्षेत्रफळ उद्यानांनी व्यापले आहे. घणसोली व दिघा परिसरातील दहा चौरस मीटर एवढी जागाही उद्यानांसाठी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सिडकोही जबाबदार महापालिकेने श्रीमंतांच्या वसाहतीमध्ये भव्य उद्याने उभारली आहेत. गरीब व मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या परिसरात कमी क्षेत्रफळाची उद्याने तयार केली आहेत. यासाठी फक्त महापालिकाच जबाबदार नसून सिडकोने भूखंड आरक्षित करताना योग्य नियोजन केले नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. तुर्भे, नेरूळ पश्चिम, वाशी माथाडी वसाहत, कोपरखैरणे माथाडी वसाहत व गावठाण परिसरात उद्यानांसाठी पुरेसे भूखंड ठेवलेले नाहीत. बॅकलॉग कसा दूर होणार?महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उद्यानांचा विभागनिहाय राहिलेला बॅकलॉग भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु प्रत्यक्षात तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली व दिघा परिसरात उद्यानांची संख्या नगण्य आहे. भविष्यात जागा उपलब्ध होण्याची शक्यताही कमी आहे. अशा स्थितीमध्ये बॅकलॉग कसा भरून निघणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.