शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

एलिव्हेटेड रस्ता झाला चकाचक

By admin | Updated: August 28, 2015 23:22 IST

रस्ते विकास महामंडळाने एमएसआरडीसीकडून निधी घेऊन पनवेलमध्ये एलिव्हेटेड रस्ता बांधला. मात्र त्यानंतर महामंडळाने सर्वच बाबतीत दुर्लक्ष केल्याने पुलाखाली मोठ्या प्रमाणात

पनवेल : रस्ते विकास महामंडळाने एमएसआरडीसीकडून निधी घेऊन पनवेलमध्ये एलिव्हेटेड रस्ता बांधला. मात्र त्यानंतर महामंडळाने सर्वच बाबतीत दुर्लक्ष केल्याने पुलाखाली मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात भिकारी, गर्दुल्ल्यांनी याठिकाणी कब्जा केला. या एलिव्हेटेड पुलाच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला असून या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.माती, कचरा, गवत काढण्याचे काम आरोग्य विभागाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केले आहे. त्याचबरोबर लवकर पुलावरही सफाई करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. पनवेल शहरातून जाणाऱ्या या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी टाळण्यासाठी गार्डन हॉटेल ते तक्कादरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्यात आला. पूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्यानंतर तो रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. निधीअभावी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एलिव्हेटेड रोडला निधी दिला. त्यानुसार हा पूल उभारण्यात आला असून दोन वर्षांपूर्वी वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. या ठिकाणी पथदिवे बसविण्यात आले असले तरी त्याचे वीजबिल भरण्याकरिता महामंडळाने हात वर केले. त्यामुळे कित्येक महिने हा रस्ता अंधारात होता. पनवेल नगरपालिकेने बिलाची जबाबदारी उचलल्याने पुलावरील पथदिवे उजळले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात माती साचल्याने पावसात वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले होते. याच महामार्गावर शेडूंग येथे आयआरबी टोल वसूल करते. त्यामुळे पनवेल शहरातून जाणाऱ्या महामार्गाची देखभाल करणे या एजन्सीची जबाबदारी आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याचा त्रास पनवेलकरांना होत होता. (वार्ताहर)शहरात नालेसफाई: पनवेल बसस्थानक ते गार्डन हॉटेल या दरम्यानचा परिसर स्वच्छ करण्याचे काम जवळपास झाले आहे. बसस्थानक बाजूच्या पावसाळी नाल्याची सफाई करण्यात आली. वास्तविक ही जबाबदारी एमएसआरडीसीची होती मात्र पनवेलकरांच्या हिताकरिता हे काम केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.वाहने घसरतात : पुलावरील पावसाचे पाणी खाली जावे याकरिता ठिकठिकाणी जागा ठेवण्यात आली आहे. मात्र त्यात माती आणि कचरा बसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहात आहे. रस्त्यावर चिखल झाल्याने वाहने घसरण्याचे प्रकार या ठिकाणी घडतात.