शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ई-कचऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 1, 2016 02:43 IST

शहरांमधील घनकचरा व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणा ई कचऱ्याच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ई - कचरा व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणाच नाही.

- नामदेव मोरे,  नवी मुंबईशहरांमधील घनकचरा व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणा ई कचऱ्याच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ई - कचरा व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणाच नाही. शास्त्रीय पध्दतीने या कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होवू लागले आहेत.मुंबईमधील देवणार डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीनंतर शहरांमधील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरामधील ओला - सुका कचरा संकलित करणे व त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणारी यंत्रणा निर्माण करण्यात मुंबईसह ठाणे जिल्ह्यामधील महाराष्ट्रामध्ये व नगरपालिकांनाही शक्य झालेले नाही. कचरा टाकण्यासाठी डंपींग ग्राऊंड होत नाही सर्वसाधारण कचऱ्याच्या प्रश्न अद्याप सुटलेला नसताना ई - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नवे आव्हाण शासकीय यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. शहरांसह ग्रामीण भागातली टी. व्ही., रेडीओ, मोबाईल, लँडलाईन फोन, फ्रीज, मिक्सर, संगणक, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर झपाट्याने वाढत आहे. एकट्या बेंगलोर शहरामधून प्रत्येक वर्षी ७ ते ८ हजार टन ई कचरा तयार होत आहे. मुंबई - ठाणे परिसरामध्येही प्रत्येक वर्षी हजारो टन ई - कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने घनकचऱ्यामध्येच ई - कचराही टाकला जात आहे.प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये ई - कचरा निर्माण होत आहे. नवीन मोबाईल घेतला की जुना कचराकुंडीत टाकला जातो. संगणकापासून इतर अनेक वस्तू भंगार वाल्याला विकल्या जातात.हा सर्व कचरा अखेर डंपींग ग्राऊंड व शहरांमधील मोकळ्या भूखंडावर टाकला जात असून त्याचे पर्यावरणावर गंभीर परिणाम होवू लागले आहेत.परिणाम होण्याची शक्यता असते. आरोग्यावर गंभीर परिणाम : ई - कचऱ्यामधील धातू वेगळा करताना ते अ‍ॅसीड टाकून जाळले जातात. कचऱ्यामध्ेय ई - वस्तू टाकल्याने घातक रसायणे पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळतात. यामुळे मज्जा संस्था, पुनउत्पादन किडनी, फुफ्फुसे, त्वचा व मेंदूशी संबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते. घातक रसायणांचा समावेशइलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती करण्यासाठी आर्सेनिक, लिथियम, अ‍ॅटिमनी, शिसे, पारा, कॅडमियन व इतर धातूंचा वापर केला जातो. पॉलीक्लोरिनेटेड, डायफेनाईल्स, पॉलिकोमिनेटेड बायफेनाईल्स, क्लोरो फ्ल्युरोकार्बन यांचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी ई - कचऱ्याचा पुनर्वापर करताना सुट्टे भाग तोडून फोडून सुट्टे भाग वेगळे केले जातात. त्यावर अ‍ॅसिड टाकून तांबे अ‍ॅल्युमिनीयम, चांदी व क्वचित प्रमाणात सोने वेगळे केले जाते.