शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ई-कचऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 1, 2016 02:43 IST

शहरांमधील घनकचरा व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणा ई कचऱ्याच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ई - कचरा व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणाच नाही.

- नामदेव मोरे,  नवी मुंबईशहरांमधील घनकचरा व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणा ई कचऱ्याच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ई - कचरा व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणाच नाही. शास्त्रीय पध्दतीने या कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होवू लागले आहेत.मुंबईमधील देवणार डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीनंतर शहरांमधील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरामधील ओला - सुका कचरा संकलित करणे व त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणारी यंत्रणा निर्माण करण्यात मुंबईसह ठाणे जिल्ह्यामधील महाराष्ट्रामध्ये व नगरपालिकांनाही शक्य झालेले नाही. कचरा टाकण्यासाठी डंपींग ग्राऊंड होत नाही सर्वसाधारण कचऱ्याच्या प्रश्न अद्याप सुटलेला नसताना ई - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नवे आव्हाण शासकीय यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. शहरांसह ग्रामीण भागातली टी. व्ही., रेडीओ, मोबाईल, लँडलाईन फोन, फ्रीज, मिक्सर, संगणक, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर झपाट्याने वाढत आहे. एकट्या बेंगलोर शहरामधून प्रत्येक वर्षी ७ ते ८ हजार टन ई कचरा तयार होत आहे. मुंबई - ठाणे परिसरामध्येही प्रत्येक वर्षी हजारो टन ई - कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने घनकचऱ्यामध्येच ई - कचराही टाकला जात आहे.प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये ई - कचरा निर्माण होत आहे. नवीन मोबाईल घेतला की जुना कचराकुंडीत टाकला जातो. संगणकापासून इतर अनेक वस्तू भंगार वाल्याला विकल्या जातात.हा सर्व कचरा अखेर डंपींग ग्राऊंड व शहरांमधील मोकळ्या भूखंडावर टाकला जात असून त्याचे पर्यावरणावर गंभीर परिणाम होवू लागले आहेत.परिणाम होण्याची शक्यता असते. आरोग्यावर गंभीर परिणाम : ई - कचऱ्यामधील धातू वेगळा करताना ते अ‍ॅसीड टाकून जाळले जातात. कचऱ्यामध्ेय ई - वस्तू टाकल्याने घातक रसायणे पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळतात. यामुळे मज्जा संस्था, पुनउत्पादन किडनी, फुफ्फुसे, त्वचा व मेंदूशी संबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते. घातक रसायणांचा समावेशइलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती करण्यासाठी आर्सेनिक, लिथियम, अ‍ॅटिमनी, शिसे, पारा, कॅडमियन व इतर धातूंचा वापर केला जातो. पॉलीक्लोरिनेटेड, डायफेनाईल्स, पॉलिकोमिनेटेड बायफेनाईल्स, क्लोरो फ्ल्युरोकार्बन यांचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी ई - कचऱ्याचा पुनर्वापर करताना सुट्टे भाग तोडून फोडून सुट्टे भाग वेगळे केले जातात. त्यावर अ‍ॅसिड टाकून तांबे अ‍ॅल्युमिनीयम, चांदी व क्वचित प्रमाणात सोने वेगळे केले जाते.