शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

टेकडीवरील उद्यानाकडे महापालिकेचे दुर्र्लक्ष

By admin | Updated: November 15, 2015 00:14 IST

संत गाडगेबाबा यांच्या आठवणी जपण्यासाठी महापालिकेने आयुक्त निवासाच्या टेकडीवर उद्यान विकसित केले आहे.

नवी मुंबई : संत गाडगेबाबा यांच्या आठवणी जपण्यासाठी महापालिकेने आयुक्त निवासाच्या टेकडीवर उद्यान विकसित केले आहे. फक्त ५ व २ रुपये तिकीट असल्यामुळे नियमित येथे गर्दी असते. पाच वर्षांत तब्बल ९ लाख नागरिकांनी उद्यानास भेट दिली आहे. पालिका प्रशासन मात्र उद्यानाच्या देखभालीकडे योग्य लक्ष देत नसून येथे येणाऱ्या नागरिकांना अत्यावश्यक सुविधाही मिळत नाहीत. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात जवळपास २०० उद्याने विकसित केली आहेत. प्रत्येक नोडमध्ये नागरिकांना चांगले उद्यान उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु उद्यानांचा विकास करतानाही पक्षपात होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. उच्चभ्रू नागरिकांची वस्ती असलेल्या परिसरात उद्यानांवर जास्त खर्च होत असून गरिबांच्या वसाहतीमधील उद्यानांकडे मात्र दुर्लक्ष होऊ लागले आहे. महापालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर मिळालेल्या पैशातून हे उद्यान विकसित केले आहे. ११ जानेवारी २०११ ला हे उद्यान सुरू करण्यात आले. शहरात प्रथमच उद्यानामध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट दर आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रौढ नागरिकांसाठी ५ रुपये व १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी २ रुपये तिकीट ठेवण्यात आले. परंतु शहरात पहिलेच भव्य उद्यान असल्यामुळे व रेल्वे स्टेशनवरून पाच मिनिटा७त पोहोचता येत असल्यामुळे नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला. लहान मुले सुटी असली की पालकांना उद्यानाला भेट देण्याचा आग्रह करू लागली होती. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाही पालिका प्रशासनाने उद्यानाच्या देखभालीकडे योग्य लक्ष दिले नाही. नोव्हेंबरपर्यंत टॉय ट्रेन बंदच होती. गत आठवड्यात सुरू केली आहे. राशी उद्यानामध्ये नागरिकांच्या माहितीसाठीचा फलकावरील मजकूर पुसला गेला आहे. सुरुवातीला बसविण्यात आलेल्या खेळण्यांमध्ये वाढ केलेली नाही. वंडर्स पार्कमध्ये ज्या पद्धतीने खेळण्यांच्या खाली रबराचे आवरण तयार केले आहे, त्यापद्धतीने या परिसरात काहीच उपाययोजना केल्या नाहीत. अ‍ॅम्पी थिएटर तयार केले आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग केला जात नाही. धबधबे बंद आहेत. हिरवळ मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्याचा योग्य उपयोग केला जात नाही. नागरिकांना घसरगुंडी व झोपाळ्याव्यतिरिक्त करमणुकीसाठी काहीच पर्याय नाही. तेवढी खेळणी तर प्रत्येक नोडमधील उद्यानांमध्येही बसविली आहेत. पाच वर्र्षांमध्ये महापालिकेने उद्यानामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. परंतु त्याकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी उद्यानाची दुरवस्था होऊ लागली असून पूर्वीपेक्षा भेट देणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.