शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

टेकडीवरील उद्यानाकडे महापालिकेचे दुर्र्लक्ष

By admin | Updated: November 15, 2015 00:14 IST

संत गाडगेबाबा यांच्या आठवणी जपण्यासाठी महापालिकेने आयुक्त निवासाच्या टेकडीवर उद्यान विकसित केले आहे.

नवी मुंबई : संत गाडगेबाबा यांच्या आठवणी जपण्यासाठी महापालिकेने आयुक्त निवासाच्या टेकडीवर उद्यान विकसित केले आहे. फक्त ५ व २ रुपये तिकीट असल्यामुळे नियमित येथे गर्दी असते. पाच वर्षांत तब्बल ९ लाख नागरिकांनी उद्यानास भेट दिली आहे. पालिका प्रशासन मात्र उद्यानाच्या देखभालीकडे योग्य लक्ष देत नसून येथे येणाऱ्या नागरिकांना अत्यावश्यक सुविधाही मिळत नाहीत. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात जवळपास २०० उद्याने विकसित केली आहेत. प्रत्येक नोडमध्ये नागरिकांना चांगले उद्यान उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु उद्यानांचा विकास करतानाही पक्षपात होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. उच्चभ्रू नागरिकांची वस्ती असलेल्या परिसरात उद्यानांवर जास्त खर्च होत असून गरिबांच्या वसाहतीमधील उद्यानांकडे मात्र दुर्लक्ष होऊ लागले आहे. महापालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर मिळालेल्या पैशातून हे उद्यान विकसित केले आहे. ११ जानेवारी २०११ ला हे उद्यान सुरू करण्यात आले. शहरात प्रथमच उद्यानामध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट दर आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रौढ नागरिकांसाठी ५ रुपये व १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी २ रुपये तिकीट ठेवण्यात आले. परंतु शहरात पहिलेच भव्य उद्यान असल्यामुळे व रेल्वे स्टेशनवरून पाच मिनिटा७त पोहोचता येत असल्यामुळे नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला. लहान मुले सुटी असली की पालकांना उद्यानाला भेट देण्याचा आग्रह करू लागली होती. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाही पालिका प्रशासनाने उद्यानाच्या देखभालीकडे योग्य लक्ष दिले नाही. नोव्हेंबरपर्यंत टॉय ट्रेन बंदच होती. गत आठवड्यात सुरू केली आहे. राशी उद्यानामध्ये नागरिकांच्या माहितीसाठीचा फलकावरील मजकूर पुसला गेला आहे. सुरुवातीला बसविण्यात आलेल्या खेळण्यांमध्ये वाढ केलेली नाही. वंडर्स पार्कमध्ये ज्या पद्धतीने खेळण्यांच्या खाली रबराचे आवरण तयार केले आहे, त्यापद्धतीने या परिसरात काहीच उपाययोजना केल्या नाहीत. अ‍ॅम्पी थिएटर तयार केले आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग केला जात नाही. धबधबे बंद आहेत. हिरवळ मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्याचा योग्य उपयोग केला जात नाही. नागरिकांना घसरगुंडी व झोपाळ्याव्यतिरिक्त करमणुकीसाठी काहीच पर्याय नाही. तेवढी खेळणी तर प्रत्येक नोडमधील उद्यानांमध्येही बसविली आहेत. पाच वर्र्षांमध्ये महापालिकेने उद्यानामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. परंतु त्याकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी उद्यानाची दुरवस्था होऊ लागली असून पूर्वीपेक्षा भेट देणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.