शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

दुष्काळग्रस्तांची पोलीस भरतीसाठी धावपळ

By admin | Updated: April 1, 2016 02:53 IST

राज्यभरात दुष्काळाचे सावट आहे. शेतीमध्ये काम राहिले नाही, तसेच शिक्षण घेवून देखील उपासमारीची वेळ आली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त तरुणांनी थेट

- वैभव गायकर,  पनवेलराज्यभरात दुष्काळाचे सावट आहे. शेतीमध्ये काम राहिले नाही, तसेच शिक्षण घेवून देखील उपासमारीची वेळ आली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त तरुणांनी थेट नवी मुंबईकडे आपली धाव घेतली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व तळोजा मध्यवर्ती कारागृहातील भरतीसाठी हे तरुण कळंबोली पोलीस मुख्यालयात चाचणीसाठी आले आहेत. पोलिसांच्या ९० जागांसाठी तब्बल १४,०३३ अर्ज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त संख्या दुष्काळी पट्ट्यातील तरुणांची आहे. अकोला, धुळे, सातारा, सांगली, नंदुरबार, बीड, औरंगाबाद, लातूर आदीसह मराठवाडा व विदर्भाच्या लहान खेड्यातून तरुण याठिकाणी आलेले आहेत. लांबचा प्रवास करून आलेल्या तरुणांना बस स्थानक, रेल्वे स्थानकावर रात्र घालवावी लागत आहे. कागदपत्रे तपासणीसाठी वेगळी तारीख त्यानंतर शारिरीक चाचणीसाठी वेगळी तारीख यामुळे काहींना हेलपाटे मारावे लागणार आहेत तर काही जण याच ठिकाणी मुक्कामाला थांबले आहेत. नंदुरबार याठिकाणाहून आलेला मच्छींद्र भोई हा वीस वर्षीय तरुण २९ तारखेला याठिकाणी आलेला आहे. ठाण्याला मामा असल्याचे त्याने त्याच ठिकाणी आपला मुक्काम केला आहे. अकोला येथून आलेला श्रीकृष्ण मुंडेकर हा तरुण दोन दिवसांपासून नवी मुंबईत आलेला आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने रस्त्यावरच मुक्कामाला राहावे लागणार असल्याचे त्याने सांगितले. रस्त्यांच्या दुभाजकावर लावलेल्या झाडांच्या सावलीत तरुण बसत असल्याने अपघाताचा धोका असल्याचे काहींनी सांगितले.पोलीस मुख्यालयाच्या बाहेर सुरु असलेल्या एका बांधकाम साइटवरील पत्र्यांचा आधार घेवून अनेक तरुण विसावा घेत असल्याचे याठिकाणी दिसून येत आहे. परीक्षार्थींसोबत आलेल्या पालकांचे देखील हेच हाल आहेत. शासनामार्फत परीक्षार्थींसाठी कोटींचा निधी खर्च केला जातो, तो जातो कुठे? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित असलेल्या गणपती पाटील या पालकाने उपस्थित केला. परीक्षार्थींसाठी बसायची व्यवस्था नाही. मुख्यालयाबाहेर थांबलेल्या विद्यार्थ्यांना आंघोळ तसेच झोपण्याची काहीच व्यवस्था नाही.