शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांची पोलीस भरतीसाठी धावपळ

By admin | Updated: April 1, 2016 02:53 IST

राज्यभरात दुष्काळाचे सावट आहे. शेतीमध्ये काम राहिले नाही, तसेच शिक्षण घेवून देखील उपासमारीची वेळ आली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त तरुणांनी थेट

- वैभव गायकर,  पनवेलराज्यभरात दुष्काळाचे सावट आहे. शेतीमध्ये काम राहिले नाही, तसेच शिक्षण घेवून देखील उपासमारीची वेळ आली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त तरुणांनी थेट नवी मुंबईकडे आपली धाव घेतली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व तळोजा मध्यवर्ती कारागृहातील भरतीसाठी हे तरुण कळंबोली पोलीस मुख्यालयात चाचणीसाठी आले आहेत. पोलिसांच्या ९० जागांसाठी तब्बल १४,०३३ अर्ज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त संख्या दुष्काळी पट्ट्यातील तरुणांची आहे. अकोला, धुळे, सातारा, सांगली, नंदुरबार, बीड, औरंगाबाद, लातूर आदीसह मराठवाडा व विदर्भाच्या लहान खेड्यातून तरुण याठिकाणी आलेले आहेत. लांबचा प्रवास करून आलेल्या तरुणांना बस स्थानक, रेल्वे स्थानकावर रात्र घालवावी लागत आहे. कागदपत्रे तपासणीसाठी वेगळी तारीख त्यानंतर शारिरीक चाचणीसाठी वेगळी तारीख यामुळे काहींना हेलपाटे मारावे लागणार आहेत तर काही जण याच ठिकाणी मुक्कामाला थांबले आहेत. नंदुरबार याठिकाणाहून आलेला मच्छींद्र भोई हा वीस वर्षीय तरुण २९ तारखेला याठिकाणी आलेला आहे. ठाण्याला मामा असल्याचे त्याने त्याच ठिकाणी आपला मुक्काम केला आहे. अकोला येथून आलेला श्रीकृष्ण मुंडेकर हा तरुण दोन दिवसांपासून नवी मुंबईत आलेला आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने रस्त्यावरच मुक्कामाला राहावे लागणार असल्याचे त्याने सांगितले. रस्त्यांच्या दुभाजकावर लावलेल्या झाडांच्या सावलीत तरुण बसत असल्याने अपघाताचा धोका असल्याचे काहींनी सांगितले.पोलीस मुख्यालयाच्या बाहेर सुरु असलेल्या एका बांधकाम साइटवरील पत्र्यांचा आधार घेवून अनेक तरुण विसावा घेत असल्याचे याठिकाणी दिसून येत आहे. परीक्षार्थींसोबत आलेल्या पालकांचे देखील हेच हाल आहेत. शासनामार्फत परीक्षार्थींसाठी कोटींचा निधी खर्च केला जातो, तो जातो कुठे? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित असलेल्या गणपती पाटील या पालकाने उपस्थित केला. परीक्षार्थींसाठी बसायची व्यवस्था नाही. मुख्यालयाबाहेर थांबलेल्या विद्यार्थ्यांना आंघोळ तसेच झोपण्याची काहीच व्यवस्था नाही.