शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाआड पाण्यामुळे पनवेलकर हैराण

By admin | Updated: March 26, 2017 05:07 IST

पनवेलमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यामुळे वादाचा प्रसंग उद्भवत आहे. टंचाईची झळ

मयूर तांबडे / पनवेलपनवेलमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यामुळे वादाचा प्रसंग उद्भवत आहे. टंचाईची झळ रहिवाशांना सोसावी लागत असून, काही ठिकाणी कमी दाबाने तर काही सोसायट्यांमध्ये पाणीच न मिळल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पनवेल नगरपालिकेचे आता महानगरपालिकेत रूपांतर झाले असले, तरी ही शहरातील पाणीसमस्या अद्याप जैसे थेच आहे. एप्रिल-मे महिन्यात टंचाई जाणवू नये, म्हणून यंदा फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेने दिवसाआड पाणी सुरू केले आहे. गतवर्षी १५ फेब्रुवारीला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी दिवसाला सुमारे २६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. पनवेल पालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणामधून ८ एमएलडी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) १० ते १२ एमएलडी व औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) ८ एमएलडी पाणी घ्यावे लागते. मात्र, सद्यस्थितीत पनवेलकरांना दिवसाआड केवळ १८ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. देहरंग धरणातून पनवेलकराना पाणीपुरवठा केला जात नसला तरीदेखील एमजेपीची पाइपलाइन फुटली किंवा शटडाऊन घेतला, तर या धरणातून १० ते ११ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. इतर वेळी एमजेपीकडून ११ एमएलडी, एमआयडीसीकडून ६ एमएलडी व सिडकोकडून१ एमएलडी असा दिवसाआड १८ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.पनवेल नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले असल्याने पुरेसे पाणी पुरवेल, अशी आशा शहरवासीयांना होती. मात्र, ती व्यर्थ ठरली आहे. गाढेश्वर धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत आहे. गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिक संतापले आहेत. हळूहळू पाण्याची समस्या भीषण स्वरूप धारण करणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. २०११च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या १ लाख ११ हजार ९०६ आहे. सद्यस्थितीत पनवेलमध्ये ६४२० पाणी कनेक्शन असून, १ हजार ६९ जणांकडे पाण्याचे मीटर बसविण्यात आलेले आहेत. महापालिकेतर्फे काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठादेखील सुरू करण्यात आला आहेत. ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही, त्या ठिकाणी महापालिकेकडून टँकर पाठविण्यात येत आहेत. दिवसाला जवळपास २५ ते ३० टँकर पाठविले जात आहेत. टँकरसाठी ज्यांची मागणी असेल त्यांच्याकडून अर्ज घेऊन त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. गढूळ पाण्यासंदर्भात काही तक्र ारी असून त्याचा तपास सुरू आहे. पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल एवढे पाणी गाढेश्वर (देहरंग) धरणात शिल्लक आहे. -रामदास तायडे, पाणीपुरवठा अधिकारी, पनवेल महापालिका एक दिवसाआड पाणी येतेय. टँकर मागवावा लागतो. टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरल्यामुळे आजार होतात. त्यामुळे पिण्यासाठी पुन्हा वेगळ्या पाण्याच्या बाटल्या घ्या. हा सगळा त्रास प्रॉपर्टी टॅक्स, पाणीपट्टी वेळेवर भरल्यानंतरही किती त्रास सहन करायचा? - भक्ती जोशी, पनवेल, रहिवासी