शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

दिवसाआड पाण्यामुळे पनवेलकर हैराण

By admin | Updated: March 26, 2017 05:07 IST

पनवेलमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यामुळे वादाचा प्रसंग उद्भवत आहे. टंचाईची झळ

मयूर तांबडे / पनवेलपनवेलमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यामुळे वादाचा प्रसंग उद्भवत आहे. टंचाईची झळ रहिवाशांना सोसावी लागत असून, काही ठिकाणी कमी दाबाने तर काही सोसायट्यांमध्ये पाणीच न मिळल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पनवेल नगरपालिकेचे आता महानगरपालिकेत रूपांतर झाले असले, तरी ही शहरातील पाणीसमस्या अद्याप जैसे थेच आहे. एप्रिल-मे महिन्यात टंचाई जाणवू नये, म्हणून यंदा फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेने दिवसाआड पाणी सुरू केले आहे. गतवर्षी १५ फेब्रुवारीला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी दिवसाला सुमारे २६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. पनवेल पालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणामधून ८ एमएलडी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) १० ते १२ एमएलडी व औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) ८ एमएलडी पाणी घ्यावे लागते. मात्र, सद्यस्थितीत पनवेलकरांना दिवसाआड केवळ १८ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. देहरंग धरणातून पनवेलकराना पाणीपुरवठा केला जात नसला तरीदेखील एमजेपीची पाइपलाइन फुटली किंवा शटडाऊन घेतला, तर या धरणातून १० ते ११ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. इतर वेळी एमजेपीकडून ११ एमएलडी, एमआयडीसीकडून ६ एमएलडी व सिडकोकडून१ एमएलडी असा दिवसाआड १८ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.पनवेल नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले असल्याने पुरेसे पाणी पुरवेल, अशी आशा शहरवासीयांना होती. मात्र, ती व्यर्थ ठरली आहे. गाढेश्वर धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत आहे. गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिक संतापले आहेत. हळूहळू पाण्याची समस्या भीषण स्वरूप धारण करणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. २०११च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या १ लाख ११ हजार ९०६ आहे. सद्यस्थितीत पनवेलमध्ये ६४२० पाणी कनेक्शन असून, १ हजार ६९ जणांकडे पाण्याचे मीटर बसविण्यात आलेले आहेत. महापालिकेतर्फे काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठादेखील सुरू करण्यात आला आहेत. ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही, त्या ठिकाणी महापालिकेकडून टँकर पाठविण्यात येत आहेत. दिवसाला जवळपास २५ ते ३० टँकर पाठविले जात आहेत. टँकरसाठी ज्यांची मागणी असेल त्यांच्याकडून अर्ज घेऊन त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. गढूळ पाण्यासंदर्भात काही तक्र ारी असून त्याचा तपास सुरू आहे. पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल एवढे पाणी गाढेश्वर (देहरंग) धरणात शिल्लक आहे. -रामदास तायडे, पाणीपुरवठा अधिकारी, पनवेल महापालिका एक दिवसाआड पाणी येतेय. टँकर मागवावा लागतो. टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरल्यामुळे आजार होतात. त्यामुळे पिण्यासाठी पुन्हा वेगळ्या पाण्याच्या बाटल्या घ्या. हा सगळा त्रास प्रॉपर्टी टॅक्स, पाणीपट्टी वेळेवर भरल्यानंतरही किती त्रास सहन करायचा? - भक्ती जोशी, पनवेल, रहिवासी