शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

नाल्यात गाळ, प्लास्टिकचा खच

By admin | Updated: February 17, 2017 02:18 IST

कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. मात्र, तरीदेखील हे नाले गाळाने भरलेले दिसून येतात.

नवी मुंबई : कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. मात्र, तरीदेखील हे नाले गाळाने भरलेले दिसून येतात. सीबीडी परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, प्लास्टिकचा कचरा पाहायला मिळतो. प्रशासनाने या नाल्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याची तक्रार परिसरातील नगरसेवकांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी पालिका दरवर्षी नालेसफाईची मोहीम हाती घेते. गेल्या वर्षी नाले सफाई करूनही अवघ्या सहा महिन्यांतच नाल्यांतून कचरा वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक नाले आणि गटारे कचरा आणि प्लास्टिक पिशव्यांमुळे तुंबली असून, आजूबाजूच्या रस्त्यांवरही घाणीचे ढीग साचले आहेत. सीबीडी सेक्टर ८ मधील नाल्यात प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात खच पाहायला मिळत आहे. नाल्यात काही ठिकाणी कचरा तुंबल्याने ठिकठिकाणी पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. परिणामी, डासांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ््यात या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यातून विषारी साप घरात येण्याची भीती रहिवाशांना भेडसावते. आर्टिस्ट कॉलनी परिसरातील नाल्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. नाल्यात घाण कुजत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)