शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

डॉ. आंबेडकर म्हणजे क्रांतीचा ज्वालामुखी

By admin | Updated: May 6, 2015 23:24 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात क्रांतीचे धगधगते ज्वालामुखी होते. त्यांनी बहिष्कृत जीणे जगणाऱ्यांसाठी लढा उभारला.

नागोठणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात क्रांतीचे धगधगते ज्वालामुखी होते. त्यांनी बहिष्कृत जीणे जगणाऱ्यांसाठी लढा उभारला. या लढ्याच्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार जिल्ह्यातील आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांनी केला. शेतकऱ्यांचा संप, खोतशाही नष्ट करण्यात डॉ. आंबेडकरांचे योगदान असून सालिंदे गावात आगरी आणि बौद्धबांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत, हे त्याचेच प्रतीक असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. बुद्ध जयंतीचे औचित्य साधून आनंदराज आंबेडकर यांनी सालिंदे (कासू) येथील बुद्धविहारला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते. डॉ. आंबेडकर आणि भगवान बुद्ध समतेचे प्रतीक आहेत. बुद्धांचे धम्म तत्त्वज्ञान आणि चांगुलपणाच्या नीतीने परिपूर्ण असा भरलेला आहे, म्हणूनच धम्म सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी असाच आहे. धम्माचा आरंभ, मध्य आणि शेवट कल्याणकारीच आहे. कल्याणाचा विचार जनसामान्यांना पोहोचविण्याचा संदेश आपल्याला भगवान बुद्ध यांनीच दिला असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती, मुंबईचे सरचिटणीस लक्ष्मण भगत, निवृत्त पोलीस अधिकारी प्रमोद काकडे, बौद्धजन समाज सेवा संघ, रायगडचे सचिव चंद्रकांत अडसुळे, पांडुरंग साळवी, दयानंद काकडे आदी मान्यवरांसह समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)