शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या
3
दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह
4
अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली
5
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
6
आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष
7
पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू
8
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
9
गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार
10
शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू
11
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
12
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
13
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
14
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
15
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
16
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
17
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
18
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
19
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
20
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली

सुविधांअभावी घणसोलीकरांचा सिडकोविरोधात असंतोष

By admin | Updated: February 15, 2016 03:09 IST

घणसोली कॉलनी परिसर अद्यापही महापालिकेला हस्तांतर झालेला नसल्याने तिथल्या रहिवाशांना विविध गैरसोयींना सामोर जावे लागत आहे.

नवी मुंबई : घणसोली कॉलनी परिसर अद्यापही महापालिकेला हस्तांतर झालेला नसल्याने तिथल्या रहिवाशांना विविध गैरसोयींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे त्रस्त असलेल्या रहिवाशांनी जनसंवाद उपक्रमादरम्यान तक्रारींच्या माध्यमातून आपला असंतोष व्यक्त केला. यावेळी वीज वितरण व रस्त्यांबाबतच्या तक्रारींची संख्या अधिक होती.सिडकोने घणसोली कॉलनी विभाग अद्याप महापालिकेला हस्तांतर केलेला नाही. नव्याने विकसित होत असलेल्या या विभागातील रहिवाशांकडून सुविधांच्या नावाखाली कर घेतला जात असताना पुरेशा सुविधा मात्र मिळत नाहीत. परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली असल्याने अवघ्या १० वर्षांतच तिथले रस्ते रहदारीला अपुरे पडत आहेत. रहदारी वाढलेली असताना दुतर्फा होणारी पार्किंग तिथली मोठी समस्या ठरत आहे. तर पदपथांवर बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या दमदाटीला पादचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. विभागात रस्ते आहेत मात्र महानगर गॅस, विद्युत विभाग यांच्याकडून वारंवार खोदकामे होत आहेत. त्यानंतर रस्ते बुजवताना समानता व दर्जा राखला जात नसल्याने पडलेले खड्डे चुकवत चालकांना वाहने चालवावी लागत आहेत. तर सेक्टर १५-१६ परिसरात लोकवस्ती वाढलेली असतानाही अद्याप त्या ठिकाणी चांगल्या रस्त्यांची निर्मिती झालेली नाही. याचा परिवहन सेवेवरही परिणाम होत आहे. या भेडसावणाऱ्या समस्या सोडवणार तरी कोण, असा प्रश्नही रहिवाशांना सतावत आहे. सिडको व महापालिकेच्या हस्तांतर निर्णयात होणाऱ्या विलंबामुळे विभागातील सुविधा रखडल्या आहेत.सेक्टर १ व ७ परिसरात असलेल्या दोन नाल्यांमधून वाहणाऱ्या दूषित पाण्यापासून पसरणारी दुर्गंधी त्रासदायक ठरत आहे. शिवाय त्या ठिकाणच्या डासांमुळे नागरी आरोग्याचाही गंभीर प्रश्न सतावत आहे. खेळाची मैदाने, विरंगुळ्यासाठी उद्याने नसल्याने लहान मुलांसह ज्येष्ठांचीही गैरसोय होत आहे. नागरिकांच्या या विविध समस्या जाणून त्यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने आमदार संदीप नाईक यांनी जनसंवादाचे आयोजन केले होते. त्यामध्ये नागरिकांनी होणाऱ्या गैरसोयी मांडत सिडकोविरोधातला असंतोष व्यक्त केला. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह सिडको, पालिका, वीज वितरण, पोलीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी सिडकोच्या विरोधातील होत्या. त्या निकाली काढण्याचे आश्वासन आमदार नाईक यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)