शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

सरपंचावर कारवाई करताना भेदभाव

By admin | Updated: February 15, 2016 03:04 IST

मुंबई ग्रामंपचायत कायद्याच्या कलम ३९ (१) अन्वये सरपंच, उपसरपंच व सदस्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकणे, त्यांना अपात्र ठरविणे याबाबत कारवाई करताना

अलिबाग : मुंबई ग्रामंपचायत कायद्याच्या कलम ३९ (१) अन्वये सरपंच, उपसरपंच व सदस्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकणे, त्यांना अपात्र ठरविणे याबाबत कारवाई करताना आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून राजकीय दडपणाखाली भेदभाव केला जात असल्याची गंभीर तक्र ार काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कोकण विभाग आयुक्त, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संशयास्पद कार्यपध्दतीबाबत त्यांची चैकशी करण्याची मागणीही ठाकूर यांनी केली आहे. या पत्राच्या प्रती मुख्य सचिव, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, आयुक्त कोकण विभाग व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आल्याचे ठाकूर म्हणाले.ठाकूर यांनी २०१३ मधील मुंबई ग्रामंपचायत कायद्याच्या कलम ३९ (१) नुसार अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायत आणि २०१५ मधील थळ ग्रामपंचायत यांच्या बेकायदा वर्तनाबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावर अद्याप कारवाई नाही. त्यानंतर सुमारे तीन वर्षांनंतर प्राप्त झालेल्या तक्र ारीमध्ये आयुक्तांनी तातडीने निर्णय घेऊन संबंधित सरपंचांना पदावरून दूर केले असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. पदाचा गैरवापर करणाऱ्या सरपंचांविरुद्ध आयुक्तांनी पारित केलेले आदेश योग्य असले तरी ते पारित करताना आयुक्तांवर राजकीय दडपण असल्याचा संशय ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. अलिबाग शहरानजीक असलेल्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीमधील जागा आरसीएफ कंपनीच्या मालकीची असूनही ही जागा आरसीएफची नसल्याचे लेखी निवेदन देऊन या जागेमधील अतिक्र मणास पाठिंबा देणाऱ्या चेंढरे ग्रामपंचायतीच्या १४ ग्रामपंचायत सदस्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्र ठरविण्याबाबत ठाकूर यांनी २५ मार्च २०१३ ला आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे तक्र ार दाखल केली होती. तसेच अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरीस-गुंजीसच्या कार्यक्षेत्रामध्ये गट ग्रामपंचायत थळ यांनी बेकायदा बांधकामे परवानग्या दिल्या असल्याबाबत ठाकूर यांनी आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे २ मार्च २०१५ समक्ष तक्र ार दाखल केली होती. (प्रतिनिधी)