शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

सरपंचावर कारवाई करताना भेदभाव

By admin | Updated: February 15, 2016 03:04 IST

मुंबई ग्रामंपचायत कायद्याच्या कलम ३९ (१) अन्वये सरपंच, उपसरपंच व सदस्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकणे, त्यांना अपात्र ठरविणे याबाबत कारवाई करताना

अलिबाग : मुंबई ग्रामंपचायत कायद्याच्या कलम ३९ (१) अन्वये सरपंच, उपसरपंच व सदस्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकणे, त्यांना अपात्र ठरविणे याबाबत कारवाई करताना आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून राजकीय दडपणाखाली भेदभाव केला जात असल्याची गंभीर तक्र ार काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कोकण विभाग आयुक्त, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संशयास्पद कार्यपध्दतीबाबत त्यांची चैकशी करण्याची मागणीही ठाकूर यांनी केली आहे. या पत्राच्या प्रती मुख्य सचिव, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, आयुक्त कोकण विभाग व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आल्याचे ठाकूर म्हणाले.ठाकूर यांनी २०१३ मधील मुंबई ग्रामंपचायत कायद्याच्या कलम ३९ (१) नुसार अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायत आणि २०१५ मधील थळ ग्रामपंचायत यांच्या बेकायदा वर्तनाबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावर अद्याप कारवाई नाही. त्यानंतर सुमारे तीन वर्षांनंतर प्राप्त झालेल्या तक्र ारीमध्ये आयुक्तांनी तातडीने निर्णय घेऊन संबंधित सरपंचांना पदावरून दूर केले असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. पदाचा गैरवापर करणाऱ्या सरपंचांविरुद्ध आयुक्तांनी पारित केलेले आदेश योग्य असले तरी ते पारित करताना आयुक्तांवर राजकीय दडपण असल्याचा संशय ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. अलिबाग शहरानजीक असलेल्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीमधील जागा आरसीएफ कंपनीच्या मालकीची असूनही ही जागा आरसीएफची नसल्याचे लेखी निवेदन देऊन या जागेमधील अतिक्र मणास पाठिंबा देणाऱ्या चेंढरे ग्रामपंचायतीच्या १४ ग्रामपंचायत सदस्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्र ठरविण्याबाबत ठाकूर यांनी २५ मार्च २०१३ ला आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे तक्र ार दाखल केली होती. तसेच अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरीस-गुंजीसच्या कार्यक्षेत्रामध्ये गट ग्रामपंचायत थळ यांनी बेकायदा बांधकामे परवानग्या दिल्या असल्याबाबत ठाकूर यांनी आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे २ मार्च २०१५ समक्ष तक्र ार दाखल केली होती. (प्रतिनिधी)