शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:50 IST

बँकांमध्ये गर्दी : आर्थिक व्यवहार खोळंबल्याने अनेकांची अडचण

- मयूर तांबडे

पनवेल : सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे जुने एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. १५ दिवस उलटूनही नवीन कार्ड उपलब्ध न झाल्याने ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी येत आहेत.सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे जुने एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८ नंतर बंद होतील, अशा सूचना ग्राहकांना सर्व बँकांनी दिल्या होत्या. तसे सूचना संदेशही बँकांकडून पाठवण्यात आले होते. त्यामुळे बँकांकडून नवीन एटीएम त्वरित उपलब्ध होणे अपेक्षित होते.

रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार, जुने तंत्रज्ञान असलेले एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८ रोजी ब्लॉक करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो ग्राहकांची गैरसोय झाली असून, मॅग्नेटिक चीप असलेले नवीन एटीएम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांनी बँकेत धाव घेतली. मात्र, नवीन एटीएम कार्ड पुरेशा संख्येने उपलब्ध न झाल्याने ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी येत आहेत.

बँक आॅफ इंडियाच्या ज्या खातेदारांचे नवीन डेबिट कार्ड आले आहेत, त्यांची नोंद रजिस्टरमध्ये केली जात आहे. मात्र, डेबिट कार्ड घेण्यासाठी येणाऱ्या खातेदाराला नाव शोधण्यासाठी अर्धा ते एक तास लागतो. त्यामुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढत आहे. अनेक ग्राहकांना आपली महत्त्वाची कामे सोडून बँकेत जाऊन रजिस्टरमध्ये नाव शोधावे लागत आहे. ज्यांना नवीन डेबिट कार्ड मिळाले नाही, त्यांचे आर्थिक व्यवहार एटीएमअभावी अडचणीत आले आहेत.

पनवेल तालुक्यात ग्रामीण भाग मोठा आहे. येथील अनेक ग्राहकांना जुने एटीएम बंद होणार असल्याचे माहीतच नव्हते. काही बँका नवीन एटीएम देण्यासाठी खातेदारांकडून नव्याने अर्ज भरून घेत आहेत. बँकांनी ग्राहकांना नवीन कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र, अनेकांचे एटीएम कार्ड बँकेमध्ये आलेच नाहीत त्यामुळे संबंधित बँकेच्याएटीएमधारक ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो.

टॅग्स :atmएटीएम