शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

महापालिकेमुळे विकासाला मिळणार गती

By admin | Updated: September 29, 2016 03:39 IST

पनवेल महानगरपालिकेमुळे अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने पनवेल महानगरपालिकेची अधिसूचना निघताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला.

- नितीन देशमुख, पनवेल

पनवेल महानगरपालिकेमुळे अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने पनवेल महानगरपालिकेची अधिसूचना निघताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला. महानगरपालिकेला विरोध असणाऱ्या शेकापक्षाने या निर्णयाचे स्वागत करणारे फलक लावले आहेत. बुधवारी सर्वत्र नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांच्या फलकाची चर्चा सुरू होती. पनवेल महानगरपालिकेची अधिसूचना सोमवारी रात्री उशिरा निघाली. १ आॅक्टोबरपासून अस्तित्वात येणाऱ्या महापालिकेत २९ महसुली गावांचा समावेश आहे. मे महिन्यात निघालेल्या पहिल्या अधिसूचनेत पनवेल नगरपरिषद क्षेत्रासह ६८ गावांचा समावेश होता. त्याबाबत जवळपास पावणेतीन हजार हरकती व सूचना आल्या. कोकण आयुक्तांच्या उपस्थितीत त्यावर चर्चा करण्यात आल्या. ‘लोकमत’नेही याबाबत पाठपुरावा करून वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले होते. महापालिकेतून काही गावे वगळण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार सरकारने ६८ पैकी ३९ गावे वगळून २९ महसूल गावांची पनवेल महानगरपालिकेची अधिसूचना काढली. महापालिका अस्तित्वात आल्याने पनवेल शहराला दर्जेदार सोयी- सुविधा मिळणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या ५ लाख ९ हजार आहे. त्यामुळे ही महापालिका ‘ड’ वर्गात मोडणार असल्याचे समजते. महापालिकेच्या मनुष्यबळात वाढ होणार असून १२५० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. पनवेल नगरपरिषदेतील नवीन पनवेल, खांदा वसाहत हा परिसर सिडको नोडमध्ये होता. तेथे रस्ते, उद्यानाचा बऱ्यापैकी विकास झाला असला तरी पनवेल शहर याबाबतीत उपेक्षितच होते. महापालिकेमुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल. वाढीव निधीमुळे रखडलेल्या तक्का, मार्केट यार्ड व हरी ओमनगर येथील अत्याधुनिक उद्यानांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. शहरातील अंतर्गत रस्ते दर्जेदार होतील. शहरात रिंग रूट बससेवेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. पनवेल पालिकेला ५७ कोटींचा खर्च पेलवणारा नव्हता त्यामुळे तो प्रस्ताव बारगळला होता. शहरात नवी मुंबई महानगरपालिकेप्रमाणे पनवेल महापालिकेची परिवहन सेवा देणे शक्य होईल. वगळलेली गावे : आदई, आकुर्ली, पाली देवद, देवद , विचुंबे, उसरली खुर्द,शिल्लोतर, रायचूर, चिपळे, बोनशेत, विहीघर, चिखले, कोण, डेरवली,पळस्पे, कोळखे, शिवकर, कोप्रोली,केवाळे, नेरे, हरिग्राम, नितळस, खैराण खुर्द,कानपोळी, वलप, हेदुटणे, पाले बुद्रुक, वाकडी, नेवाळी, उमरोळी, अंबिवली, मोहो, नांदगाव, कुडावे,वडवळी, तुरमाळे व चिरवत.सिडकोने विकसित केलेला मोठे विभाग महानगरपालिकेत समाविष्ट केल्याने मध्यम वर्गाचे कमी दरात घरे घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील घरे स्वस्त होती. ग्रामीण भाग महानगरपालिकेत समाविष्ट न केल्याने हा वर्ग शहराच्या बाहेरच राहणार असल्याचे एका बांधकाम व्यावसायिकाने सांगितले. शहरात घनकचरा व्यवस्थापनाच्या योग्य नियोजनाची गरज आहे. पाणीसाठा वाढविण्यावर लक्ष दिल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल, असा विश्वास कामोठे येथील सामाजिक कार्यकर्त्या सुलक्षणा जगदाळे यांना वाटते. पनवेल तालुक्याचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. नागरी समस्या व प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे यासाठी महानगरपालिका होणे गरजेचे होते. पनवेलच्या सर्वांगीण विकासाला आता गती मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचे मी आभार मानतो. - प्रशांत ठाकूर, आमदारपनवेल महानगरपालिका झाल्याचे आता शिक्कामोर्तब झाले आहे. नगर पालिकेला काम करताना मर्यादा असतात. महानगरपालिकेची व्याप्ती मोठी असते. आय.ए. एस. अधिकारी कारभार पाहणार असल्याने शहराच्या विकासाला चांगली गती प्राप्त होईल. - मंगेश चितळे, मुख्याधिकारी पनवेल पालिका