शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेमुळे विकासाला मिळणार गती

By admin | Updated: September 29, 2016 03:39 IST

पनवेल महानगरपालिकेमुळे अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने पनवेल महानगरपालिकेची अधिसूचना निघताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला.

- नितीन देशमुख, पनवेल

पनवेल महानगरपालिकेमुळे अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने पनवेल महानगरपालिकेची अधिसूचना निघताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला. महानगरपालिकेला विरोध असणाऱ्या शेकापक्षाने या निर्णयाचे स्वागत करणारे फलक लावले आहेत. बुधवारी सर्वत्र नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांच्या फलकाची चर्चा सुरू होती. पनवेल महानगरपालिकेची अधिसूचना सोमवारी रात्री उशिरा निघाली. १ आॅक्टोबरपासून अस्तित्वात येणाऱ्या महापालिकेत २९ महसुली गावांचा समावेश आहे. मे महिन्यात निघालेल्या पहिल्या अधिसूचनेत पनवेल नगरपरिषद क्षेत्रासह ६८ गावांचा समावेश होता. त्याबाबत जवळपास पावणेतीन हजार हरकती व सूचना आल्या. कोकण आयुक्तांच्या उपस्थितीत त्यावर चर्चा करण्यात आल्या. ‘लोकमत’नेही याबाबत पाठपुरावा करून वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले होते. महापालिकेतून काही गावे वगळण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार सरकारने ६८ पैकी ३९ गावे वगळून २९ महसूल गावांची पनवेल महानगरपालिकेची अधिसूचना काढली. महापालिका अस्तित्वात आल्याने पनवेल शहराला दर्जेदार सोयी- सुविधा मिळणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या ५ लाख ९ हजार आहे. त्यामुळे ही महापालिका ‘ड’ वर्गात मोडणार असल्याचे समजते. महापालिकेच्या मनुष्यबळात वाढ होणार असून १२५० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. पनवेल नगरपरिषदेतील नवीन पनवेल, खांदा वसाहत हा परिसर सिडको नोडमध्ये होता. तेथे रस्ते, उद्यानाचा बऱ्यापैकी विकास झाला असला तरी पनवेल शहर याबाबतीत उपेक्षितच होते. महापालिकेमुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल. वाढीव निधीमुळे रखडलेल्या तक्का, मार्केट यार्ड व हरी ओमनगर येथील अत्याधुनिक उद्यानांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. शहरातील अंतर्गत रस्ते दर्जेदार होतील. शहरात रिंग रूट बससेवेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. पनवेल पालिकेला ५७ कोटींचा खर्च पेलवणारा नव्हता त्यामुळे तो प्रस्ताव बारगळला होता. शहरात नवी मुंबई महानगरपालिकेप्रमाणे पनवेल महापालिकेची परिवहन सेवा देणे शक्य होईल. वगळलेली गावे : आदई, आकुर्ली, पाली देवद, देवद , विचुंबे, उसरली खुर्द,शिल्लोतर, रायचूर, चिपळे, बोनशेत, विहीघर, चिखले, कोण, डेरवली,पळस्पे, कोळखे, शिवकर, कोप्रोली,केवाळे, नेरे, हरिग्राम, नितळस, खैराण खुर्द,कानपोळी, वलप, हेदुटणे, पाले बुद्रुक, वाकडी, नेवाळी, उमरोळी, अंबिवली, मोहो, नांदगाव, कुडावे,वडवळी, तुरमाळे व चिरवत.सिडकोने विकसित केलेला मोठे विभाग महानगरपालिकेत समाविष्ट केल्याने मध्यम वर्गाचे कमी दरात घरे घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील घरे स्वस्त होती. ग्रामीण भाग महानगरपालिकेत समाविष्ट न केल्याने हा वर्ग शहराच्या बाहेरच राहणार असल्याचे एका बांधकाम व्यावसायिकाने सांगितले. शहरात घनकचरा व्यवस्थापनाच्या योग्य नियोजनाची गरज आहे. पाणीसाठा वाढविण्यावर लक्ष दिल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल, असा विश्वास कामोठे येथील सामाजिक कार्यकर्त्या सुलक्षणा जगदाळे यांना वाटते. पनवेल तालुक्याचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. नागरी समस्या व प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे यासाठी महानगरपालिका होणे गरजेचे होते. पनवेलच्या सर्वांगीण विकासाला आता गती मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचे मी आभार मानतो. - प्रशांत ठाकूर, आमदारपनवेल महानगरपालिका झाल्याचे आता शिक्कामोर्तब झाले आहे. नगर पालिकेला काम करताना मर्यादा असतात. महानगरपालिकेची व्याप्ती मोठी असते. आय.ए. एस. अधिकारी कारभार पाहणार असल्याने शहराच्या विकासाला चांगली गती प्राप्त होईल. - मंगेश चितळे, मुख्याधिकारी पनवेल पालिका