शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

गावांचा विकास आव्हानात्मक

By admin | Updated: May 6, 2017 06:26 IST

नवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली बहुतांशी गावे प्रभाग क्र मांक १ ते ३ मध्ये आहेत. भविष्यात या भागाचा

अरूणकुमार मेहत्रे/  लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली बहुतांशी गावे प्रभाग क्र मांक १ ते ३ मध्ये आहेत. भविष्यात या भागाचा विकास करण्याचे मोठे आव्हान महानगरपालिकेसमोर असणार आहे. पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सारण, रस्ते, गटारे या सुविधा पुरविण्याकरिता प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. याठिकाणी अ, आ, ईपासून सुरूवात करावी लागणार आहे. सिडकोने येथील जमीन संपादित करताना गावठाणांचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्राधिकरणाने सातत्याने दुर्लक्ष केले. या कारणाने वसाहती जरी झकास झाल्या असल्या तरी गावे मात्र भकासच राहिले आहेत. पनवेल महानगरपालिकेत २९ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यापैकी बरेचशी गावे प्रभाग १ ते ३ मध्ये येतात. त्या गावांपर्यंत नागरीकरण सुध्दा आले आहे तसेच टोलेजंग इमारती उभा राहिल्या आहेत. असे असले तरी पायाभूत सुविधांची मोठी वानवा आहे. दळवळणाकरिता रस्ते उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर पावसाळी पाणी वाहून नेण्याकरिता येथे गटारे नाहीत. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता मलनि:सारण केंद्रे नाहीत की घनकचरा उचलला जात नाही. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था नाही. अनेक ग्रामपंचायती हा कचरा महामार्गालगत किंवा नदीच्या पात्रात डम्प करीत होत्या आणि महापालिका झाल्यानंतरही बदललेली नाही. जी गावे समाविष्ट करण्यात आली आहेत त्यांचा विकास आराखडा तयार करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्या व्यतिरिक्त या भागात रस्त्यांची निर्मिती करणे सुध्दा अतिशय अवघड याचे कारण म्हणजे मनाला वाटेल त्या ठिकाणी इमारती, घरे उभारण्यात आलेले आहे. गावागावांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीत अडचणी येणार आहे. घनकचरा उचलण्याकरिता वेगळी यंत्रणा उभारावी लागेल त्याशिवाय त्याची विल्हेवाट लावायची कुठे आणि कशी याबाबत नियोजन करावे लागणार आहे. महापालिका हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये मलनि:सारण केंदे्र उभारावी लागतील त्याकरिता जागेची उपलब्धता करावी लागणार आहे.अनिधकृत बांधकामे जास्तबिनशेती परवाना त्याचबरोबर टाऊन प्लॅनिंगची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीची घरबांधणी परवाना घेवून टोलेजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. हे बांधकाम करताना एफएसआय त्याचबरोबर रस्ते, सांडपाणी याचा विचार करण्यात आलेला नाही.तीनही प्रभागांना प्रदूषणाचा विळखातळोजा एमआयडीसीच्या बाजूला असलेल्या या तीनही प्रभागाला प्रदूषणाचा विळखा आहे. कारखाने मोठ्या प्रमाणात हवेत विषारी वायू सोडत आहेत. त्याचबरोबर रसायनमिश्रित सांडपाणी कासाडी नदीत सोडले जात आहे. प्रभाग क्र मांक-१च्या हद्दीत सिडकोचे डम्पिग ग्राउंड आहे. त्या ठिकाणी शास्त्रशुध्द पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट होत नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी कचरा डम्प करू दिला जात नाही.