शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

गावांचा विकास आव्हानात्मक

By admin | Updated: May 6, 2017 06:26 IST

नवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली बहुतांशी गावे प्रभाग क्र मांक १ ते ३ मध्ये आहेत. भविष्यात या भागाचा

अरूणकुमार मेहत्रे/  लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली बहुतांशी गावे प्रभाग क्र मांक १ ते ३ मध्ये आहेत. भविष्यात या भागाचा विकास करण्याचे मोठे आव्हान महानगरपालिकेसमोर असणार आहे. पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सारण, रस्ते, गटारे या सुविधा पुरविण्याकरिता प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. याठिकाणी अ, आ, ईपासून सुरूवात करावी लागणार आहे. सिडकोने येथील जमीन संपादित करताना गावठाणांचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्राधिकरणाने सातत्याने दुर्लक्ष केले. या कारणाने वसाहती जरी झकास झाल्या असल्या तरी गावे मात्र भकासच राहिले आहेत. पनवेल महानगरपालिकेत २९ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यापैकी बरेचशी गावे प्रभाग १ ते ३ मध्ये येतात. त्या गावांपर्यंत नागरीकरण सुध्दा आले आहे तसेच टोलेजंग इमारती उभा राहिल्या आहेत. असे असले तरी पायाभूत सुविधांची मोठी वानवा आहे. दळवळणाकरिता रस्ते उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर पावसाळी पाणी वाहून नेण्याकरिता येथे गटारे नाहीत. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता मलनि:सारण केंद्रे नाहीत की घनकचरा उचलला जात नाही. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था नाही. अनेक ग्रामपंचायती हा कचरा महामार्गालगत किंवा नदीच्या पात्रात डम्प करीत होत्या आणि महापालिका झाल्यानंतरही बदललेली नाही. जी गावे समाविष्ट करण्यात आली आहेत त्यांचा विकास आराखडा तयार करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्या व्यतिरिक्त या भागात रस्त्यांची निर्मिती करणे सुध्दा अतिशय अवघड याचे कारण म्हणजे मनाला वाटेल त्या ठिकाणी इमारती, घरे उभारण्यात आलेले आहे. गावागावांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीत अडचणी येणार आहे. घनकचरा उचलण्याकरिता वेगळी यंत्रणा उभारावी लागेल त्याशिवाय त्याची विल्हेवाट लावायची कुठे आणि कशी याबाबत नियोजन करावे लागणार आहे. महापालिका हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये मलनि:सारण केंदे्र उभारावी लागतील त्याकरिता जागेची उपलब्धता करावी लागणार आहे.अनिधकृत बांधकामे जास्तबिनशेती परवाना त्याचबरोबर टाऊन प्लॅनिंगची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीची घरबांधणी परवाना घेवून टोलेजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. हे बांधकाम करताना एफएसआय त्याचबरोबर रस्ते, सांडपाणी याचा विचार करण्यात आलेला नाही.तीनही प्रभागांना प्रदूषणाचा विळखातळोजा एमआयडीसीच्या बाजूला असलेल्या या तीनही प्रभागाला प्रदूषणाचा विळखा आहे. कारखाने मोठ्या प्रमाणात हवेत विषारी वायू सोडत आहेत. त्याचबरोबर रसायनमिश्रित सांडपाणी कासाडी नदीत सोडले जात आहे. प्रभाग क्र मांक-१च्या हद्दीत सिडकोचे डम्पिग ग्राउंड आहे. त्या ठिकाणी शास्त्रशुध्द पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट होत नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी कचरा डम्प करू दिला जात नाही.