शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

लक्षवेधीनंतरही आंबेडकर भवनच्या डोमला विरोध कायम

By admin | Updated: November 13, 2016 01:38 IST

ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मार्बल लावण्याच्या नागरिक व लोकप्रतिनिधींच्या आग्रहाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. विशेष सर्वसाधारण सभेच्या

नवी मुंबई : ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मार्बल लावण्याच्या नागरिक व लोकप्रतिनिधींच्या आग्रहाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. विशेष सर्वसाधारण सभेच्या आदेशानंतरही मार्बल लावणे योग्य होणार नसल्याचे पत्र शासनाला दिल्याने आंबेडकरी जनतेमधील नाराजी वाढली आहे. नवी मुंबई महापालिकेने ऐरोलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचे काम सुरू केले आहे. स्मारकाच्या डोमला रंग लावण्याऐवजी मकराना मार्बल लावण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला होता. याविषयी निविदा प्रक्रिया सुरू केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयआयटीच्या अहवालामुळे मार्बल लावण्याचा निर्णय रद्द केला. यानंतर या निर्णयाने पालिकेच्या खर्चात बचत झाल्याचे वृत्त पालिकेच्या वतीने देण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली. आंबेडकर स्मारकासाठी खर्चामध्ये कंजुसी केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी दिला होता. काँगे्रसच्या नगरसेविका हेमांगी अंकुश सोनावणे यांनी १६ आॅगस्टला लक्षवेधी मांडली होती. या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आंबेडकर भवनला मकराना मार्बलच लावण्याचा आग्रह करून तसे न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. आयुक्तांनीही सभागृहाचा आग्रह असल्यास माझी हरकत नाही, असे उत्तर दिले होते. लक्षवेधीमध्ये आयुक्तांनीही मार्बल लावण्यास होकार दर्शविल्यानंतर हा विषय मार्गी लागल्याचा आनंद नागरिकांना झाला; पण प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया सुरूच झाली नाही. प्रशासनाने पुन्हा मार्बल लावण्यासाठी समिती गठीत केली. या समितीमध्ये आयआयटीचे तज्ज्ञ, सिडको व इतरांचा समावेश होता. या समितीने डोमला मार्बल लावणे योग्य होणार नसल्याचा अहवाल दिला असल्याचे कारण देव्ऊन पुन्हा निविदा प्रक्रियेचे काम ठप्प केले असून याविषयी शासनालाही अहवाल दिला आहे. नागरिकांची इच्छा डावलून प्रशासनाने परस्पर निर्णय घेतल्यामुळे नगरसेवकांसह शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला असून याविषयी आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)मार्बलच लागेलआंबेडकर स्मारकास मार्बल न लावण्याविषयीचा अहवाल प्रशासनाने शासनास दिला आहे. याविषयी पाठविलेल्या पत्रामुळे आंबेडकरी जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. स्मारकास मकराना मार्बलच लावले जाईल तसे न केल्यास आंदोलन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.