शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

कामोठेवासीयांची पाण्यासाठी वणवण

By admin | Updated: March 17, 2016 02:31 IST

कामोठेवासीयांना डिसेंबरपासूनच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. रोज १६ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा जाणवत असून, रहिवाशांनी या परिसरातून स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे.

- प्रशांत शेडगे,  पनवेलकामोठेवासीयांना डिसेंबरपासूनच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. रोज १६ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा जाणवत असून, रहिवाशांनी या परिसरातून स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. सिडकोच्या नियोजनातील चुकांचा फटका हजारो नागरिकांना बसत असून, येथील अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. शहराची शिल्पकार म्हणून सिडको प्रशासन स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. नवी मुंबई हे देशातील पहिले नियोजनबद्ध शहर वसविले व आता दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा संकल्प केला आहे. परंतु ज्या दिवशी स्मार्ट सिटीची घोषणा केली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामोठेवासीयांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली. डिसेंबरमध्येच नागरिकांवर पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली. पाणी प्रश्नाने पुन्हा एकदा सिडकोचे नियोजन चुकल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. वास्तविक या नोडचा विकास करताना तेथे भविष्यातील लोकसंख्या विचारात घेवून पाणीपुरवठ्याची सोय करणे अत्यंत आवश्यक होते. परंतु सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून पाणी घेवून ते या परिसराला पुरविण्यास सुरवात केली. दुसऱ्यावर अवलंबून असणारी पाणीपुरवठा यंत्रणा कधीही कोलमडू शकते याचाच प्रशासनास विसर पडला. पाणीटंचाईचे कारण सांगून महापालिकेने डिसेंबरमध्ये अचानक पाणीपुरवठा कमी केला असल्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होवू लागली आहे. गरजेपुरतेही पाणी मिळेनासे झाले आहे. पाणी कधी येईल याचा भरवसाही राहिला नाही. कामोठेपासून खांदेश्वर व मानसरोवर रेल्वे स्टेशन जवळ आहे. यामुळे भविष्याचा विचार करून नागरिकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून येथे घरे घेतली आहेत. कामोठे, जुई या गावांच्या परिसरात येथील भूमिपुत्रांनी मोठी गुुंतवणूक करून व प्रसंगी कर्ज घेवून इमारती बांधल्या आहेत. घरे भाड्याने देणे हा परिसरातील प्रमुख व्यवसाय झाला आहे. कामोठे परिसरात डिसेंबरमध्येच पाणी मिळेनासे झाल्याने नागरिकांनी घरे खाली करण्यास सुरवात केली आहे. भाडेतत्त्वावर राहणाऱ्या हजारो नागरिकांनी या परिसरातून स्थलांतर केले आहे. शेकडो इमारतींमधील अनेक सदनिका भाडेकरू मिळत नसल्याने मोकळ्या पडल्या आहेत. नागरिकांनी येथून स्थलांतर केल्यामुळे घर भाड्याने देणाऱ्यांचे नुकसान झाले आहेच, शिवाय इतर व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. येथील आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांनी बोअरवेल मारून पाण्यासाठी पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जादा पैसे देवून टँकरने पाणी आणावे लागत आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाणी पुरवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सिडको-मनपा भांडणाचा परिणाम सिडको प्रशासनाने ४ डिसेंबरला दक्षिण नवी मुंबई ही पहिली स्मार्ट सिटी बनविण्याची घोषणा केली. या कार्यक्रमात महापौरांना योग्य सन्मान दिला नाही.सिडकोने अप्रत्यक्षपणे महापालिकेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे नोव्हेंबरपर्यंत कामोठे परिसराला रोज ३० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेने डिसेंबरमध्ये तत्काळ २३ दशलक्ष लिटरवर प्रमाण आणले.कामोठे परिसरात रोज ४० एमएलडी पाणी पुरवठ्याची गरज आहे. परंतू सद्यस्थितीमध्ये २२ ते २३ एमएलडी पाणीच उपलब्ध होत आहे. अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आम्हाला मागणीप्रमाणे पाणी देता येत नाही. सद्यस्थितीमध्ये शहरात ४० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. पुढील काळात नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. हेटवणे धरणातील पाणीही कामोठे नोडला देण्याचे विचाराधीन आहे. - रमेश गिरी, अधीक्षक अभियंता, सिडको पाणीपुरवठा यावर्षी पुरेसा पाऊस पडला नसल्याने पाणीटंचाई सुरू आहे. पण कामोठेमधील रहिवाशांना वर्षभरच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचे हाल होवू लागले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. - रेश्मा गायकर, सेक्टर २०, कामोठे सिडकोचा देशातील पहिली स्मार्ट सिटी बनविण्याचा आटापिटा पाहून त्यांची कीव कराविशी वाटत आहे. कामोठेमधील रहिवाशांना आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध करून देणेही प्रशासनाला शक्य होत नाही. पहिले पाणी द्या नंतर स्मार्ट सिटीचा विचार करा. - तृप्ती सुर्वे, गृहिणीसिडकोने कामोठेमधील समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. पाऊस कमी पडल्याने पाण्याची टंचाई भासणार हे माहीत असूनही काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. यामुळेच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिडकोने फक्त वसाहत वसविण्याचे काम केले, नागरिकांच्या सुविधेचा विचारच केला नाही. - अनुराधा जगताप, कामोठेपाणी नसल्यामुळे रोजची काम करणं कठीण आहे. एक दिवसाआड आमच्या सोसायटीत पाणी येत असल्याने दैनंदिन कामाचा खोळंबा होतो. पाणी कमी दाबाने येत असल्याने चौथ्या मजल्याच्या वर पाणी चढत नाही. त्यामुळे आमच्या सोसायटीत बोअरवेल घेण्यात आली आहे. कामोठ्यासाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था नव्हती तर सिडकोने वसाहत का वसविली? - संघमित्रा सरकटे, गृहिणीकामोठ्यात पाण्याची समस्या गंभीर होत आहे. नवीन पनवेल येथे पाणीटंचाई नाही, मग कामोठ्यातच का? सिडकोने यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.- अश्विनी फुं दे, गृहिणीकामोठ्यात पाणी नसल्याने आम्ही दुसरीकडे भाड्याने घर घेण्याचा विचार करत आहोत. जे पाणी येत आहे, तेही चांगले येत नसल्याने बिसलरी पाणी मागवावे लागत आहे. - विद्या जोशी, गृहिणी