शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

उच्चभ्रूंच्या मुजोरीने डेंग्यू बळावला

By admin | Updated: October 28, 2014 00:32 IST

केईएममधील निवासी डॉक्टरच डेंग्यूची बळी ठरल्यामुळे पालिकेच्या आरोग्य खात्याचे धाबे दणाणले आह़े

मुंबई : केईएममधील निवासी डॉक्टरच डेंग्यूची बळी ठरल्यामुळे पालिकेच्या आरोग्य खात्याचे धाबे दणाणले आह़े याची गंभीर दखल घेऊन महापौर दालनात आज तातडीची बैठकही बोलाविण्यात आली़ यामध्ये जनजागृती व तपासणीसाठी सहकार्य न करणा:या खासगी सोसायटय़ांवर सक्ती अथवा कारवाईचा संकेत देण्यात आला़
पावसाळा संपल्यानंतरही साथीच्या आजारांपैकी डेंग्यूने मुंबईत तळ ठोकला आह़े चांगल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याने उच्चभ्रू वसाहतींना याचा सर्वाधिक धोका आह़े यावर नियंत्रण आणण्यासाठी श्रीमंत लोकवस्तीमध्ये जनजागृती हाच एक मार्ग उरला आह़े मात्र उच्चभ्रू वसाहतीच्या प्रवेशद्वारावरूनच पालिका कर्मचा:यांना हाकलून देण्यात येत आह़े
ही बाब महापौर स्नेहल आंबेकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीतून समोर आली़ त्यामुळे अशा वसाहतींमध्ये पालिका कर्मचा:यांना जनजागृतीसाठी प्रवेश देण्याची 
सक्ती करण्याचा विचार सुरू आह़े तसेच सहकार्य न करणा:या या सोसायटय़ांवर कोणती कारवाई करण्यात येईल, याबाबतही 
चाचपणी सुरू झाल्याचे महापौरांनी सांगितल़े (प्रतिनिधी) 
 
अशी झाली 
आहे कारवाई
डेंग्यूचा धोका वाढत असतानाही उत्तुंग इमारती आणि उच्चभ्रू वसाहतींमध्ये डास प्रतिबंधक खबरदारी घेतली जात नसल्याचे उजेडात आले आह़े पालिकेच्या पाहणीत उच्च लोकवस्तींचा निष्काळजीपणा उघड झाल्यानंतर 92 निवासी सोसायटय़ांना कोर्टात खेचण्याचा निर्णय पालिकेने घेतला आह़े मात्र जनजागृतीसाठी प्रवेश न दिल्यास कोणती कारवाई करावी, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही़
 
खरे रुग्ण किती?
जूनपासून आतार्पयत डेंग्यूचे 134 रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत़ अशी पालिकेची आकडेवारी सांगत़े मात्र प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात दाखल होत असल्याचे आढळून येत आह़े
 
अशी वाढते डासांची पैदास : फेंगशुई व शोभेच्या वस्तूंमध्ये साठवलेल्या पाण्यात तसेच जुने टायर व बाटल्यांमध्ये या डासांची पैदास होत़े त्यामुळे अशा वस्तूंमधील पाणी बदलत राहणो, पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवणो असे नियम तयार करण्यात आले आहेत़ शोभेच्या वस्तूंमध्ये पाणी सतत बदलत ठेवण्याबाबत बिगर शासकीय संस्थांच्या मदतीने पालिकेची जनजागृती मोहीम सुरू आह़े 
 
डेंग्यूची लागण होण्यास एडिस डास कारणीभूत असतो़ मात्र या डासांमध्ये झपाटय़ाने बदल होत चालला आह़े त्यामुळे या आजाराचे निदान होण्यापूर्वीच रुग्णांच्या रक्तपेशी कमी होत जातात़ त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू करण्यापूर्वीच गुंतागुंत वाढत आह़े 
 
पूर्वी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ताप आणि सांधेदुखी व अंगदुखी ही प्रमुख लक्षणो होती़ मात्र आता डेंग्यूच्या रुग्णांच्या रक्तपेशीत झपाटय़ाने घसरण होत असून न्युमोनिया होण्याचा धोका वाढत आह़े तसेच रुग्णाची शुद्धही हरपत असल्याने अशा रुग्णांवर उपचार करणो दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात़