शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत उसाच्या रसाला मागणी

By admin | Updated: October 17, 2015 23:39 IST

आॅक्टोबर हीटमुळे मुंबई, नवी मुंबईतील तापमान ३६ डीग्री अंश सेल्सिअसवर गेले आहे. उखाड्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी नागरिकांची

- प्राची सोनावणे,  नवी मुंबईआॅक्टोबर हीटमुळे मुंबई, नवी मुंबईतील तापमान ३६ डीग्री अंश सेल्सिअसवर गेले आहे. उखाड्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी नागरिकांची पावले रसवंतीगृहाकडे वळू लागली आहेत. रोज २०० ते ३०० टन उसाची आवक होऊ लागली आहे. शहाळे, लिंबू व इतर शीतपेयांची मागणीही प्रचंड वाढली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे यावर्षी आॅक्टोबरमध्ये उन्हाची काहिली वाढली आहे. मुंबई, नवी मुंबई परिसरातील तापमान ३६ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आहे. दिवसा घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. माथाडी व इतर कष्टाची कामे करणाऱ्या नागरिकांना उखाड्याचा खूपच त्रास होऊ लागला आहे. घराबाहेर पडलेले नागरिक असह्य उखाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी रसवंतीगृहांचा आधार घेऊ लागले आहेत. उसाची मागणी सर्वाधिक वाढली आहे. मुंबई, नवी मुंबई परिसरात रोज २०० ते ३०० टन ऊस रसवंतीगृहांसाठी लागत आहे. मागील पाच महिन्यांमध्ये तब्बल ३१,०१४ टन उसाची आवक झाली असल्याची माहिती मुुंबई बाजार समितीमधील पर्यवेक्षक जी. आर. चव्हाण यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातून लाकडी चरखे घेऊन अनेक शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. १० ते १५ रुपयांना उसाचा रस विकला जात आहे. पाऊस पडण्याची शक्यता कमी झाल्यामुळे यावर्षी उसाची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. उखाड्यामुळे शहाळ्यांनाही मागणी वाढली आहे. दाक्षिणात्य राज्यातून रोज मोठ्या प्रमाणात शहाळ्याची आवक होत आहे. ३० ते ४० रुपयांना शहाळे विकले जात होते. उखाड्यामुळे ही किंमत ५० ते ६० रुपये झाली आहे. शहाळ्यांची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. ऊस व शहाळ्याप्रमाणे इतर फळांच्या रसालाही ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगड, संत्री, मोसंबी, डाळिंब, चिकू, अननस, लिंबू यांचीही आवक वाढली आहे. मार्केटमध्ये उपलब्ध असणारी कोल्ड्रिंक्स आरोग्यास घातक असल्याचे समोर येऊ लागले आहे. यामुळे नागरिकांनी ऊस, लिंबू व इतर फळांच्या रसाला सर्वाधिक पसंती देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शहरातील सर्वच रसवंतीगृहांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. मुंबईत उसाच्या रसाला मागणीप्राची सोनावणे ल्ल नवी मुंबईआॅक्टोबर हीटमुळे मुंबई, नवी मुंबईतील तापमान ३६ डीग्री अंश सेल्सिअसवर गेले आहे. उखाड्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी नागरिकांची पावले रसवंतीगृहाकडे वळू लागली आहेत. रोज २०० ते ३०० टन उसाची आवक होऊ लागली आहे. शहाळे, लिंबू व इतर शीतपेयांची मागणीही प्रचंड वाढली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे यावर्षी आॅक्टोबरमध्ये उन्हाची काहिली वाढली आहे. मुंबई, नवी मुंबई परिसरातील तापमान ३६ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आहे. दिवसा घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. माथाडी व इतर कष्टाची कामे करणाऱ्या नागरिकांना उखाड्याचा खूपच त्रास होऊ लागला आहे. घराबाहेर पडलेले नागरिक असह्य उखाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी रसवंतीगृहांचा आधार घेऊ लागले आहेत. उसाची मागणी सर्वाधिक वाढली आहे. मुंबई, नवी मुंबई परिसरात रोज २०० ते ३०० टन ऊस रसवंतीगृहांसाठी लागत आहे. मागील पाच महिन्यांमध्ये तब्बल ३१,०१४ टन उसाची आवक झाली असल्याची माहिती मुुंबई बाजार समितीमधील पर्यवेक्षक जी. आर. चव्हाण यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातून लाकडी चरखे घेऊन अनेक शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. १० ते १५ रुपयांना उसाचा रस विकला जात आहे. पाऊस पडण्याची शक्यता कमी झाल्यामुळे यावर्षी उसाची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. उखाड्यामुळे शहाळ्यांनाही मागणी वाढली आहे. दाक्षिणात्य राज्यातून रोज मोठ्या प्रमाणात शहाळ्याची आवक होत आहे. ३० ते ४० रुपयांना शहाळे विकले जात होते. उखाड्यामुळे ही किंमत ५० ते ६० रुपये झाली आहे. शहाळ्यांची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. ऊस व शहाळ्याप्रमाणे इतर फळांच्या रसालाही ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगड, संत्री, मोसंबी, डाळिंब, चिकू, अननस, लिंबू यांचीही आवक वाढली आहे. मार्केटमध्ये उपलब्ध असणारी कोल्ड्रिंक्स आरोग्यास घातक असल्याचे समोर येऊ लागले आहे. यामुळे नागरिकांनी ऊस, लिंबू व इतर फळांच्या रसाला सर्वाधिक पसंती देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शहरातील सर्वच रसवंतीगृहांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. नवरात्रीनिमित्त बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. वाढत्या मागणीबरोबरच फळांच्या किमतीतही वाढ झाली आहे. दांडिया खेळून लागलेली पाण्याची तहान भागविण्यासाठी नागरिकांची ज्युस विक्रेत्यांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दीची लाट पाहायला मिळते. फळांच्या वाढत्या किमतीने शीतपेय विक्रेत्यांनीही दरात वाढ केल्याचे पाहायला मिळते. संत्री - मोसंबीचा एक ग्लास ज्युस ४० ते ५० रुपये, कलिंगड ज्युस ४० रुपये, चिकू मिल्कशेक ५५ रुपये, डाळिंबाचा ज्युस ५० रुपये, सफरचंद मिल्कशेक ६० रुपये, लिंबू सरबत १५ रुपये अशाप्रकारे शीतपेयांच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळते. बर्फाच्या लादीच्या किमतीतही वाढ झाल्याची माहिती शीतपेय विक्रेत्यांनी दिली. १०० किलोची एक लादी २८० ते ३०० रुपयांना मिळत होती. वाढत्या मागणीमुळे या बर्फाच्या लादीची किंमत आता ३४० ते ३६० रुपयांपर्यंत वाढली आहे. फळांचे दर : कलिंगड : ५० ते ६० रुपये किलो, खरबूज : ५० ते ५५ रुपये किलो, सफरचंद : १५० ते १८० रुपये किलो, मोसंबी : : ७० ते ७५ रुपये किलो, चिकू : ६० ते ७० रुपये किलो, संत्री : १५० ते १६० रुपये किलो, डाळिंब : १०० ते १५० रुपये किलो. एपीएमसीतील ऊस व इतर फळांची आवकवस्तूआवक (क्विंटल)भाव (किलो)ऊस२,००० ते ३,०००अननस १,०७०१० ते २६चिकू१६०१५ ते ४८डाळिंब५९६५० ते १२०कलिंगड२,७३४१० ते १४संत्री४,२२३१० ते ३२मोसंबी ५,०८०१० ते ३२