शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

प्रकल्पग्रस्तांच्या भूखंड वाटपातही दिरंगाई

By admin | Updated: June 8, 2015 04:13 IST

शासनाने १९९० ला नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के जमीन परत देण्याचा निर्णय घेतला. परंतु या भूखंड वाटपाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईशासनाने १९९० ला नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के जमीन परत देण्याचा निर्णय घेतला. परंतु या भूखंड वाटपाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. २५ वर्षांनंतरही शंभर टक्के भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काचे भूखंड मिळाले नसून सिडकोच्या या उदासीनतेविषयी भूमिपुत्रांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मुंबईवरील लोकसंख्येचा वाढता ताण दूर करण्यासाठी शासनाने ठाणे, पनवेल व उरण तालूक्यामधील ९५ गावांमधील जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला. शहर वसविण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. येथील भूमिपुत्रांची ३४४ चौरस किलोमीटर क्षेत्रावरील १७ हजार हेक्टर जमीन ताब्यात घेतली. प्रकल्पग्रस्तांना एक एकरसाठी ५ हजार रुपये दर निश्चित केला होता. परंतु याविरोधात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा उभारण्यात आला. यामुळे शासनाने हा दर ७ हजार रुपये व नंतर १५ हजार रुपये करण्यात आला. ठाणे तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांना त्यांची जमीन १५ हजार रुपये एकर दराने शासनास द्यावी लागली. यानंतरही आंदोलन सुरूच राहिले. अखेर शासनाने एकरसाठी ३० हजार रुपये दर निश्चित करण्यात आला. शेतकऱ्यांचा जमीन संपादनासाठीचा विरोध वाढतच चालला होता. संपादनासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले जात होते. जासईमधील दास्तानमध्ये निखराचे आंदोलन झाले. शासनाने प्रकल्पग्रस्तांवर गोळीबार केला व त्यामध्ये ५ प्रकल्पग्रस्त हुतात्मा झाले. यानंतर शासनाने नरमाईची भूमिका घेवून १९९० मध्ये एकूण जमिनीच्या साडेबारा टक्के जमीन पुन्हा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी साडेबारा टक्के योजना सुरू केली. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र अत्यंत धीम्या गतीने सुरू झाली. तब्बल २५ वर्षे झाली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे भूखंड दिलेले नाहीत. एकूण १०६४ हेक्टर जमिनीचे वाटप करायचे होते. सिडकोने संकेतस्थळावर ९० टक्के वाटप पूर्ण झाले असल्याचे स्पष्ट केले आहे. दहा टक्के वाटप शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. भूखंड वाटपाची वर्षनिहाय माहितीही दिली आहे. परंतु नक्की किती शेतकऱ्यांना भूखंड वाटप करायचे शिल्लक आहे याचा नेमका आकडा मात्र लपविला जात आहे. ज्यांना भूखंड मंजूर केले त्यांना त्यांचा शंभर टक्के ताबा मिळाला का याचीही माहिती नाही. अनेक ठिकाणी वारसदारांमध्ये सुरू असलेली भांडणे, न्यायालयीन वाद, अतिक्रमण यामुळे भूखंड वाटप धीम्या गतीने सुरू असल्याचे सांगितले जात आहे. परंतु योजना जाहीर झाली तेव्हाच वेगाने वाटप करण्यास सुरवात केली असती तर पहिल्या पाच वर्षांत ही योजना पूर्णपणे मार्गी लागली असती. भूखंड वाटप झाले असते तर गरजेपोटी अनधिकृत घरेही बांधावी लागली नसती असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.