शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
3
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
4
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
5
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
6
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
7
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
8
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
9
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
10
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
11
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
12
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
13
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
14
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
15
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
16
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
17
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
18
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
19
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
20
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?

ग्रामसेवकांच्या बदलीमुळे ग्रामीण भागातील विकासकामांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:56 IST

सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या  त्या गावांतील ग्रामसेवकांवर असते.

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : ग्रामीण भागात काम करण्यास अनेकांची तयारी नसते. त्यातच ग्रामसेवकावर एका ग्रामपंचायतीपेक्षा अनेक ग्रामपंचायतींची जबाबदारी असते. अनेक गावात ग्रामसेवक हजर राहात नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विकासकामांचा खोळंबा वाढला आहे. हे टाळण्यासाठी ग्रामसेवकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी थांबावे. यात कसूर झाल्यास त्यांना निलंबित करण्याबाबत तक्रार केली जाते. यामुळे अधिकारीवर्गाला नाहक त्रास होतो तसेच तालुक्याच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापुढे ग्रामसेवकांबाबत कोणी तक्रारी केली अथवा कामात अडथळा निर्माण केल्यास चौकशी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रत्येक पंचायत समितीला पत्राद्वारे कळविण्यात आले. 

सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या  त्या गावांतील ग्रामसेवकांवर असते. परंतु ग्रामसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक कामे अपूर्ण राहतात. ती मुदतीत पूर्ण होत नाही. ग्रामसेवकांविरुद्ध ग्रामीण भागात तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. तसेच काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच तर सदस्य स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामसेवकाला वेठीस धरत असून, दबावतंत्र टाकून कामात विघ्न निर्माण करतात तर काही ठिकाणी ग्रामसेवक इतरांचे ऐकून चुकीच्या कामाला खतपाणी घालत असल्याचे प्रकार कर्जत तालुक्यात दिसून येत आहेत. तसेच सरपंच प्रामाणिक काम करीत असून, अनेक सदस्यांना अथवा ग्रामसेवकाचा फायदा होत नाही म्हणून ग्रामसेवकाला हाताशी धरून मासिक सभेत गोंधळ निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचप्रमाणे संबंधिताना निलंबित करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेऊन खोट्या केसेस केल्या जात असल्याचे प्रकार घडले आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये लोकप्रतिनिधी स्वतःच्या सोयीनुसार ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक निवडतात. त्यामुळे विकासकामांमध्ये अडचणी निर्माण होत आहे. तसेच ग्रामसेवकाला एका ग्रामपंचायतीचा ताबा दिला पाहिजे, जेणेकरून ग्रामसेवकाला ग्रामस्थांचे प्रश्न सोडविता येतील तर आणि कामकाजामध्ये वेळ देता येईल, यावर विचारविनिमय झाला पाहिजे. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः प्रत्यक्षात येऊन पाहणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 

ग्रामसेवकाला त्यांच्या नियमाप्रमाणे काम करून दिले पाहिजे तसेच ग्रामसेवकांनी आपले अधिकार, शासनाने दिलेले अधिकाराप्रमाणे नियमात राहून काम केले पाहिजे. चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालू नये.    - बालाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई