शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

ग्रामसेवकांच्या बदलीमुळे ग्रामीण भागातील विकासकामांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:56 IST

सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या  त्या गावांतील ग्रामसेवकांवर असते.

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : ग्रामीण भागात काम करण्यास अनेकांची तयारी नसते. त्यातच ग्रामसेवकावर एका ग्रामपंचायतीपेक्षा अनेक ग्रामपंचायतींची जबाबदारी असते. अनेक गावात ग्रामसेवक हजर राहात नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विकासकामांचा खोळंबा वाढला आहे. हे टाळण्यासाठी ग्रामसेवकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी थांबावे. यात कसूर झाल्यास त्यांना निलंबित करण्याबाबत तक्रार केली जाते. यामुळे अधिकारीवर्गाला नाहक त्रास होतो तसेच तालुक्याच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापुढे ग्रामसेवकांबाबत कोणी तक्रारी केली अथवा कामात अडथळा निर्माण केल्यास चौकशी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रत्येक पंचायत समितीला पत्राद्वारे कळविण्यात आले. 

सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या  त्या गावांतील ग्रामसेवकांवर असते. परंतु ग्रामसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक कामे अपूर्ण राहतात. ती मुदतीत पूर्ण होत नाही. ग्रामसेवकांविरुद्ध ग्रामीण भागात तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. तसेच काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच तर सदस्य स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामसेवकाला वेठीस धरत असून, दबावतंत्र टाकून कामात विघ्न निर्माण करतात तर काही ठिकाणी ग्रामसेवक इतरांचे ऐकून चुकीच्या कामाला खतपाणी घालत असल्याचे प्रकार कर्जत तालुक्यात दिसून येत आहेत. तसेच सरपंच प्रामाणिक काम करीत असून, अनेक सदस्यांना अथवा ग्रामसेवकाचा फायदा होत नाही म्हणून ग्रामसेवकाला हाताशी धरून मासिक सभेत गोंधळ निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचप्रमाणे संबंधिताना निलंबित करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेऊन खोट्या केसेस केल्या जात असल्याचे प्रकार घडले आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये लोकप्रतिनिधी स्वतःच्या सोयीनुसार ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक निवडतात. त्यामुळे विकासकामांमध्ये अडचणी निर्माण होत आहे. तसेच ग्रामसेवकाला एका ग्रामपंचायतीचा ताबा दिला पाहिजे, जेणेकरून ग्रामसेवकाला ग्रामस्थांचे प्रश्न सोडविता येतील तर आणि कामकाजामध्ये वेळ देता येईल, यावर विचारविनिमय झाला पाहिजे. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः प्रत्यक्षात येऊन पाहणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 

ग्रामसेवकाला त्यांच्या नियमाप्रमाणे काम करून दिले पाहिजे तसेच ग्रामसेवकांनी आपले अधिकार, शासनाने दिलेले अधिकाराप्रमाणे नियमात राहून काम केले पाहिजे. चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालू नये.    - बालाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई