शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

ग्रामसेवकांच्या बदलीमुळे ग्रामीण भागातील विकासकामांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:56 IST

सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या  त्या गावांतील ग्रामसेवकांवर असते.

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : ग्रामीण भागात काम करण्यास अनेकांची तयारी नसते. त्यातच ग्रामसेवकावर एका ग्रामपंचायतीपेक्षा अनेक ग्रामपंचायतींची जबाबदारी असते. अनेक गावात ग्रामसेवक हजर राहात नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विकासकामांचा खोळंबा वाढला आहे. हे टाळण्यासाठी ग्रामसेवकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी थांबावे. यात कसूर झाल्यास त्यांना निलंबित करण्याबाबत तक्रार केली जाते. यामुळे अधिकारीवर्गाला नाहक त्रास होतो तसेच तालुक्याच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापुढे ग्रामसेवकांबाबत कोणी तक्रारी केली अथवा कामात अडथळा निर्माण केल्यास चौकशी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रत्येक पंचायत समितीला पत्राद्वारे कळविण्यात आले. 

सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या  त्या गावांतील ग्रामसेवकांवर असते. परंतु ग्रामसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक कामे अपूर्ण राहतात. ती मुदतीत पूर्ण होत नाही. ग्रामसेवकांविरुद्ध ग्रामीण भागात तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. तसेच काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच तर सदस्य स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामसेवकाला वेठीस धरत असून, दबावतंत्र टाकून कामात विघ्न निर्माण करतात तर काही ठिकाणी ग्रामसेवक इतरांचे ऐकून चुकीच्या कामाला खतपाणी घालत असल्याचे प्रकार कर्जत तालुक्यात दिसून येत आहेत. तसेच सरपंच प्रामाणिक काम करीत असून, अनेक सदस्यांना अथवा ग्रामसेवकाचा फायदा होत नाही म्हणून ग्रामसेवकाला हाताशी धरून मासिक सभेत गोंधळ निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचप्रमाणे संबंधिताना निलंबित करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेऊन खोट्या केसेस केल्या जात असल्याचे प्रकार घडले आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये लोकप्रतिनिधी स्वतःच्या सोयीनुसार ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक निवडतात. त्यामुळे विकासकामांमध्ये अडचणी निर्माण होत आहे. तसेच ग्रामसेवकाला एका ग्रामपंचायतीचा ताबा दिला पाहिजे, जेणेकरून ग्रामसेवकाला ग्रामस्थांचे प्रश्न सोडविता येतील तर आणि कामकाजामध्ये वेळ देता येईल, यावर विचारविनिमय झाला पाहिजे. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः प्रत्यक्षात येऊन पाहणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 

ग्रामसेवकाला त्यांच्या नियमाप्रमाणे काम करून दिले पाहिजे तसेच ग्रामसेवकांनी आपले अधिकार, शासनाने दिलेले अधिकाराप्रमाणे नियमात राहून काम केले पाहिजे. चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालू नये.    - बालाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई