शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

बदनामीस लेखापरीक्षकही जबाबदार

By admin | Updated: November 14, 2016 04:38 IST

महापालिकेच्या अनेक विभागांत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमे व सोशल मीडियामधून प्रसारित होऊ लागली आहेत.

नामदेव मोरे / नवी मुंबई

महापालिकेच्या अनेक विभागांत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमे व सोशल मीडियामधून प्रसारित होऊ लागली आहेत. यामुळे आतापर्यंत पुरस्कारामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या नवी मुंबईची देशभर बदनामी होऊ लागली आहे. या बदनामीस पालिकेचे मुख्य लेखापरीक्षकही जबाबदार असल्याची टीका होऊ लागली आहे. लेखापरीक्षकांनी नियमाप्रमाणे साप्ताहिक अहवाल स्थायी समितीसमोर ठेवले नाहीत व कामकाजातील अनियमितता निदर्शनास आणून दिल्या नसल्याने त्यांच्यावरच कारवाईची मागणी केली जाऊ लागली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर, स्काडा, शिक्षण मंडळ, अभियांत्रिकी व इतर विभागांमध्ये घोटाळे झाल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. वास्तविक याविषयी वास्तव व वस्तुनिष्ठपणे माहिती पालिका आयुक्त तुकाराम मुंढे किंवा प्रशासनाच्या वतीने अद्याप देण्यात आलेली नाही. महापालिका रोज उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर केलेल्या कारवाईची प्रेसनोट प्रसिद्धीमाध्यमांकडे पाठवत असते. गावठाणांमधील घरांवरील कारवाईनंतर प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष निर्माण होताच अफवांवर विश्वास ठेवू नका, असा खुलासा प्रशासनाने स्वत:हून केला; पण महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना ते आरोप खरे आहेत की खोटे, याविषयी एकही खुलासा अद्याप तयार करण्यात आलेला नाही. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे. मागील स्थायी समिती बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते जयवंत सुतार यांनी प्रशासनच महापालिकेची बदनामी करत असल्याचा आरोप केला होता. वास्तविक महापालिकेच्या बदनामीला आता मुख्य लेखापरीक्षकांनाही जबाबदार धरले जाऊ लागले आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून लेखापरीक्षकपदावर शासननियुक्त अधिकारी कार्यरत असतो. सद्यस्थितीमध्ये डॉ. सुहास शिंदे हे आॅक्टोबर २०१३ पासून या पदावर कार्यरत आहेत.नियमाप्रमाणे शिंदे यांनी प्रत्येक आठवड्याला महापालिकेला येणे असलेल्या रकमांच्या वसुलीच्या बाबतीत किंवा तिच्या लेख्यांच्या बाबतीत जे कोणतेही महत्त्वाचे अयोग्य किंवा नियमबाह्य प्रकार आढळून येतील त्यासंबंधी स्थायी समितीमध्ये अहवाल सादर करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या लेखापरीक्षकाने महानगरपालिकेच्या लेख्यांची साप्ताहिक तपासणी व लेखापरीक्षण केले पाहिजे. त्यावरील आपला अहवाल स्थायी समितीकडे पाठवला पाहिजे व स्थायी समितीदेखील वेळोवेळी व तिला योग्य वाटेल अशा कालावधीपर्यंत स्वतंत्रपणे महानगरपालिकेच्या लेख्यांची तपासणी व लेखापरीक्षण करू शकेल, असा कायद्यात स्पष्ट उल्लेख आहे. विद्यमान लेखापरीक्षक तीन वर्षे त्या पदावर आहेत; पण त्यांनी कधीही अशाप्रकारे लेखापरीक्षण अहवाल स्थायी समितीकडे दिलेले नाहीत. प्रत्येक आठवड्याला त्यांनी अहवाल सादर केले असते तर विद्यमान स्थितीत सुरू असलेली बदनामी झाली नसती. याशिवाय लेखापरीक्षक असतानाच ते काही महिने मुख्य लेखा व वित्त अधिकारी व आता प्रशासन उपआयुक्त म्हणून काम करत असून मूळ कामांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.