शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीत रस्त्यांचे झाले डम्पिंग

By admin | Updated: April 20, 2016 02:38 IST

शहरात दररोज हजारो टन कचरा तयार होतो. मात्र तो नियमित उचलला जात नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कळंबोली : शहरात दररोज हजारो टन कचरा तयार होतो. मात्र तो नियमित उचलला जात नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे पादचारी तसेच स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. शिवाय वसाहतीतही स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. सिडकोकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने अनेक सेक्टरमधील रस्त्यांना डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कचरा गोळा करणाऱ्या गाड्या नियमित येत नसल्याने आणि सर्व भागात गाड्या जात नसल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. कळंबोलीतील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या बहुतांश कचराकुंड्या नेहमीच ओसंडून भरलेल्या दिसतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, पादचाऱ्यांना नाक मुठीत घेऊन जावे लागते. अंतर्गत रस्त्यावर प्रत्येक सोसायटीसमोर बिन्स ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये कचरा टाकला जातो. मात्र सिडकोकडून तो दोन ते तीन दिवस उचलला जात नाही. मोकाट गुरांकडून कचरा सर्वत्र पसरवला जात असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सेक्टर १४ मध्ये ज्ञानमंदिर शाळेच्या आजूबाजूच्या सोसायट्यांचा कचरा उचलला जात नाही. त्यामुळे रस्त्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागे असलेल्या सोसायट्यांसमोर तर कचऱ्याचा ढीग लागला आहे. अनेक मोकळ्या भूखंडावर हॉटेल चालकांकडून कचरा टाकला जातो. ठेकेदाराकडे पुरेशा गाड्या नसल्याचे सेक्टर १४, १५ येथील कचरा नियमीच उचलला जात नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, मलेरिया आणि डेग्यूचे रुग्ण वाढत आहेत. कचरा उचलण्याचा ठेका असलेल्या बीवीजी कंपनीच्या निष्क्रियतेमुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सिडकोकडूनही संबंधितांवर कडक कारवाई होत नसल्याने आरोग्य धोक्यात आहे. याप्रकरणी सिडकोने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)