शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल फायनलपूर्वी मोठी बातमी! दोन्ही संघांचे दोन महत्वाचे खेळाडू अनफिट; आणखी एक खेळाडू... 
2
“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले
3
IPL 2025 Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियमात स्पष्ट म्हटलंय की...
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!
5
खळबळजनक! लेकाला हवी होती BMW; वडिलांनी दुसरी कार घेताच तरुणाने संपवलं जीवन
6
युक्रेनला हवे होते तेच रशियाने केले! एक हल्ला होताच विमाने ४०००-५५०० किमी आत नेऊन ठेवली, अन्...
7
“तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, बाळासाहेबांनी...”; राऊतांची भाजपावर टीका
8
आग लगने वाली है! 'धुरंधर' सेटवरील रणवीर अन् संजूबाबाचा व्हिडिओ लीक; चाहत्यांना आठवला 'खिलजी'
9
भारत आणि रशियाच्या मैत्रीने अमेरिकेला जळजळ; शस्त्रे खरेदीवर ट्रम्प सरकारने घेतला आक्षेप
10
इवल्याशा पक्ष्याच्या धडकेमुळे महाकाय विमानाला भगदाड कसं पडलं? असं आहे त्यामागचं कारण
11
परेश रावल यांची खंत, 'हेरा फेरी ३'मधून साइडलाइन केल्यामुळे घेतली एक्झिट?, म्हणाले - "मी तर हिरो होतो..."
12
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
13
Mumbai Suicide: आरसीटी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, ३८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युने परिसरात खळबळ
14
एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान?
15
थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का
16
ज्याला कष्टानं बनवलं, आता तोच खातोय नोकरी! मायक्रोसॉफ्टमध्ये दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात
17
कमल हासन यांच्या कन्नड-तमिळ भाषेबाबत केलेल्या वक्तव्याने वाद; हायकोर्टाने फटकारले...
18
अदानी समूहाची अमेरिकेत पुन्हा चौकशी? आज सर्वच शेअर्समध्ये घसरण; काय म्हटलंय कंपनीनं?
19
अयोध्या राम मंदिर: ८ देवळांमध्ये प्राणप्रतिष्ठा, १२ तास सलग विधी; ५ जूनला राम दरबार भरणार!
20
Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

कळंबोलीत रस्त्यांचे झाले डम्पिंग

By admin | Updated: April 20, 2016 02:38 IST

शहरात दररोज हजारो टन कचरा तयार होतो. मात्र तो नियमित उचलला जात नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कळंबोली : शहरात दररोज हजारो टन कचरा तयार होतो. मात्र तो नियमित उचलला जात नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे पादचारी तसेच स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. शिवाय वसाहतीतही स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. सिडकोकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने अनेक सेक्टरमधील रस्त्यांना डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कचरा गोळा करणाऱ्या गाड्या नियमित येत नसल्याने आणि सर्व भागात गाड्या जात नसल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. कळंबोलीतील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या बहुतांश कचराकुंड्या नेहमीच ओसंडून भरलेल्या दिसतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, पादचाऱ्यांना नाक मुठीत घेऊन जावे लागते. अंतर्गत रस्त्यावर प्रत्येक सोसायटीसमोर बिन्स ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये कचरा टाकला जातो. मात्र सिडकोकडून तो दोन ते तीन दिवस उचलला जात नाही. मोकाट गुरांकडून कचरा सर्वत्र पसरवला जात असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सेक्टर १४ मध्ये ज्ञानमंदिर शाळेच्या आजूबाजूच्या सोसायट्यांचा कचरा उचलला जात नाही. त्यामुळे रस्त्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागे असलेल्या सोसायट्यांसमोर तर कचऱ्याचा ढीग लागला आहे. अनेक मोकळ्या भूखंडावर हॉटेल चालकांकडून कचरा टाकला जातो. ठेकेदाराकडे पुरेशा गाड्या नसल्याचे सेक्टर १४, १५ येथील कचरा नियमीच उचलला जात नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, मलेरिया आणि डेग्यूचे रुग्ण वाढत आहेत. कचरा उचलण्याचा ठेका असलेल्या बीवीजी कंपनीच्या निष्क्रियतेमुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सिडकोकडूनही संबंधितांवर कडक कारवाई होत नसल्याने आरोग्य धोक्यात आहे. याप्रकरणी सिडकोने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)