शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दहीहंडी शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:16 IST

उंचीचा थरार नाही । हंडींच्या शोधात पथकांची उडाली तारांबळ

नवी मुंबई : गोविंदांच्या उत्साहात भर टाकणारा दहीहंडी उत्सव शहरात शांततेत व शिस्तबद्धरीत्या साजरा झाला. पश्चिम महाराष्टÑातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या मंडळांनी त्यांच्या हंडी रद्द केल्या होत्या. त्यामुळे शहराबाहेरून आलेल्या गोविंदा पथकांची हंडींच्या शोधात तारंबळ उडाली होती. पनवेलमध्येही गोविंदा पथकांची हंडी फोडण्यासाठी लागलेली स्पर्धा पाहायला मिळाली.

प्रतिवर्षी शहरात मोठ्या उत्साहात दहीहंडी सण साजरा केला जातो. ऐरोली, कोपरखैरणे, वाशी व नेरुळमध्ये लाखोच्या बक्षिसांच्या हंडी रचल्या जातात. त्या फोडण्यासाठी नवी मुंबईसह मुंबई, ठाणे व लगतच्या इतर शहरातील पथके नवी मुंबईत हजेरी लावत असतात. या वेळी प्रतिष्ठेच्या हंडी फोडण्याच्या स्पर्धेतून गोविंदा पथकांकडून रचले जाणारे मानवी मनोरे पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक एकत्र जमत असतात. मात्र, यंदा शहरात हे मानवी मनोरे पाहण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नवी मुंबईकरांसह राज्यभरातून मदतीचा हात मिळत आहे. याच पूरपरिस्थितीची दखल घेऊन शहरातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मोठ्या हंडी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोपरखैरणेतील वनवैभव कला क्रीडा निकेतन, ऐरोलीतील सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन व वाशीतील श्री गणेश बाल गोपाळ मित्रमंडळ या आयोजकांचा समावेश आहे. त्यांनी हंडी रद्द करून त्यावर होणारा खर्च पूरबाधितांच्या मदतीसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. तर परिमंडळ एक मधील स्थानिक पातळीवरील केवळ २९ हंडी रचण्यात आल्या होत्या. त्यांनीही सामाजिक बांधीलकी जपत अत्यंत साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला. तर एपीएमसी भाजी मार्केट आवारात व्यापाऱ्यांकडून आयोजित केली जाणारी हंडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.बापटवाड्यात तीन शतकांची परंपरापनवेलमधील बापटवाड्यातील दहीहंडी उत्सवाला तीन शतकांची परंपरा आहे. १७२० मध्ये बाळाजीपंत बापट आपल्या कुटुंबासह पनवेलमध्ये आले होते. त्यांनी १७३० पासून हा उत्सव सुरू केला. पंढरपूरवरून आणलेल्या विठ्ठल मूर्तीची स्थापना केली होती. गोकुळाष्टमीच्या दिवशी बापटवाड्यात असलेल्या देव-देवतांची अभिषेक करून सजावट केली जाते. आदल्या दिवशी रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आयोजित केले जातात. पनवेल शहरात नवनाथाची शक्तिपीठ आहेत. त्या ठिकाणचे भक्त या उत्सवात सामील होऊन या ठिकाणच्या दहीहंडी फोडत असतात. विशेष म्हणजे, येथील दहीहंडी ही मोठ्या उंचावर न बांधता ठरावीक उंचीवर दहीहंडी टांगून सर्व जण रिंगणामध्ये एकत्र येत असतात. गोलाकार जमलेल्या गोविंदांना जाड्या दोरखंडाने फटके मारले जातात. हा एक परंपरेचाच भाग असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार ही दहीहंडी एका काठीने फोडली जाते. 

मानाच्या हंडी फोडण्यासाठी आम्ही प्रतिवर्षी नवी मुंबईत येतो. त्यानुसार दिवसभरात सात ते आठ हंडी फोडण्याचा मान पटकावत असतो. मात्र, यंदा बहुतांश मोठ्या हंडी रद्द झाल्याने छोट्या हंडींकडे पथक वळवावे लागले. त्यांचीही संख्या कमी असल्याने दिवसभरात केवळ चार हंडी फोडल्या.- अमोल तांदळे, बापदेव पथक, देवनार