शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

रायगड समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: December 26, 2016 06:23 IST

मुंबई-पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्याच्या निसर्गरमणीय किनारपट्टीत सध्या समुद्राच्या पाण्याचे उधाण कमी

अलिबाग : मुंबई-पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्याच्या निसर्गरमणीय किनारपट्टीत सध्या समुद्राच्या पाण्याचे उधाण कमी आणि पर्यटकांचीच तुडुंब भरती असे चित्र दिसून येत आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ही गर्दी झाली आहे. रायगडच्या किनारपट्टीतील मांडवा सागरी पोलीस ठाणे, अलिबाग, रेवदंडा, मुरुड, दिघी सागरी पोलीस ठाणे, म्हसळा आणि श्रीवर्धन या आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण पाच हजारांच्यावर हॉटेल्स, रिसॉर्ट, घरगुती निवारे आणि गेस्ट हाऊसेस असून ही सर्व हाऊसफुल्ल झाली असून ठिकठिकाणचे हॉटेल व्यावसायिक आणि पोलीस स्टेशन्सकडून उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्याच्या किनारपट्टीत तब्बल पाच लाखांच्या वर पर्यटक मुक्कामी दाखल झाले आहेत.शनिवारी गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा (अलिबाग)दरम्यानची सागरी प्रवासी बोट वाहतूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवली होती. त्यामुळे मुंबईतील पर्यटक शनिवारी अलिबागेत दाखल होवू शकले नाहीत. परिणामी काही पर्यटकांनी नाराजीव्यक्त केली. रविवारी सकाळपासून गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा (अलिबाग) दरम्यानची सागरी प्रवासी बोट मार्गे सुमारे ४५ हजार पर्यटक मांडवा, आवास, सासवने, थळ, वरसोली, अलिबाग, नागाव, रेवदंडा या किनारपट्टीत दाखल झाले. पावसाळ्यात गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मुंबई-पुण्याच्या रायगडच्या किनारपट्टीत कारने येणाऱ्या पर्यटकांनी चक्क पाठच फिरवली होती. परिणामी किनारपट्टीतील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थंडावला होता. शुक्रवारपासून पर्यटकांच्या अगमनाने किनारपट्टीतील पर्यटन व्यावसायिक सुखावला असल्याची माहिती पर्यटन अभ्यासक राजेश शिंदे यांनी दिली आहे.पुण्याहून ताम्हाणी घाट मार्गे सुमारे ७००च्यावर कार व बसेस रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, दिवेआगर,मुरुड या किनारपट्टीत दाखल झाल्या आहेत तर वरंध मार्गे महाडला येवून रायगड दर्शन करून पुढे दापोली-हर्णेच्या सागर किनारपट्टीत पोहोचणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटकांचे प्रमाण मोठे असल्याची माहिती श्रीवर्धनमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज गोगटे यांनी दिली आहे. हरिहरेश्वर हे तीर्थस्थान दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांचे ते कुलदैवतही आहे. त्यामुळे देवदर्शनासह पर्यटन असा दुहेरी हेतू ने पर्यटक येत असल्याचे गोगटे म्हणाले.