शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रायगड समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: December 26, 2016 06:23 IST

मुंबई-पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्याच्या निसर्गरमणीय किनारपट्टीत सध्या समुद्राच्या पाण्याचे उधाण कमी

अलिबाग : मुंबई-पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्याच्या निसर्गरमणीय किनारपट्टीत सध्या समुद्राच्या पाण्याचे उधाण कमी आणि पर्यटकांचीच तुडुंब भरती असे चित्र दिसून येत आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ही गर्दी झाली आहे. रायगडच्या किनारपट्टीतील मांडवा सागरी पोलीस ठाणे, अलिबाग, रेवदंडा, मुरुड, दिघी सागरी पोलीस ठाणे, म्हसळा आणि श्रीवर्धन या आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण पाच हजारांच्यावर हॉटेल्स, रिसॉर्ट, घरगुती निवारे आणि गेस्ट हाऊसेस असून ही सर्व हाऊसफुल्ल झाली असून ठिकठिकाणचे हॉटेल व्यावसायिक आणि पोलीस स्टेशन्सकडून उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्याच्या किनारपट्टीत तब्बल पाच लाखांच्या वर पर्यटक मुक्कामी दाखल झाले आहेत.शनिवारी गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा (अलिबाग)दरम्यानची सागरी प्रवासी बोट वाहतूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवली होती. त्यामुळे मुंबईतील पर्यटक शनिवारी अलिबागेत दाखल होवू शकले नाहीत. परिणामी काही पर्यटकांनी नाराजीव्यक्त केली. रविवारी सकाळपासून गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा (अलिबाग) दरम्यानची सागरी प्रवासी बोट मार्गे सुमारे ४५ हजार पर्यटक मांडवा, आवास, सासवने, थळ, वरसोली, अलिबाग, नागाव, रेवदंडा या किनारपट्टीत दाखल झाले. पावसाळ्यात गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मुंबई-पुण्याच्या रायगडच्या किनारपट्टीत कारने येणाऱ्या पर्यटकांनी चक्क पाठच फिरवली होती. परिणामी किनारपट्टीतील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थंडावला होता. शुक्रवारपासून पर्यटकांच्या अगमनाने किनारपट्टीतील पर्यटन व्यावसायिक सुखावला असल्याची माहिती पर्यटन अभ्यासक राजेश शिंदे यांनी दिली आहे.पुण्याहून ताम्हाणी घाट मार्गे सुमारे ७००च्यावर कार व बसेस रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, दिवेआगर,मुरुड या किनारपट्टीत दाखल झाल्या आहेत तर वरंध मार्गे महाडला येवून रायगड दर्शन करून पुढे दापोली-हर्णेच्या सागर किनारपट्टीत पोहोचणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटकांचे प्रमाण मोठे असल्याची माहिती श्रीवर्धनमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज गोगटे यांनी दिली आहे. हरिहरेश्वर हे तीर्थस्थान दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांचे ते कुलदैवतही आहे. त्यामुळे देवदर्शनासह पर्यटन असा दुहेरी हेतू ने पर्यटक येत असल्याचे गोगटे म्हणाले.