शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

रायगड समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: December 26, 2016 06:23 IST

मुंबई-पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्याच्या निसर्गरमणीय किनारपट्टीत सध्या समुद्राच्या पाण्याचे उधाण कमी

अलिबाग : मुंबई-पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्याच्या निसर्गरमणीय किनारपट्टीत सध्या समुद्राच्या पाण्याचे उधाण कमी आणि पर्यटकांचीच तुडुंब भरती असे चित्र दिसून येत आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ही गर्दी झाली आहे. रायगडच्या किनारपट्टीतील मांडवा सागरी पोलीस ठाणे, अलिबाग, रेवदंडा, मुरुड, दिघी सागरी पोलीस ठाणे, म्हसळा आणि श्रीवर्धन या आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण पाच हजारांच्यावर हॉटेल्स, रिसॉर्ट, घरगुती निवारे आणि गेस्ट हाऊसेस असून ही सर्व हाऊसफुल्ल झाली असून ठिकठिकाणचे हॉटेल व्यावसायिक आणि पोलीस स्टेशन्सकडून उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्याच्या किनारपट्टीत तब्बल पाच लाखांच्या वर पर्यटक मुक्कामी दाखल झाले आहेत.शनिवारी गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा (अलिबाग)दरम्यानची सागरी प्रवासी बोट वाहतूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवली होती. त्यामुळे मुंबईतील पर्यटक शनिवारी अलिबागेत दाखल होवू शकले नाहीत. परिणामी काही पर्यटकांनी नाराजीव्यक्त केली. रविवारी सकाळपासून गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा (अलिबाग) दरम्यानची सागरी प्रवासी बोट मार्गे सुमारे ४५ हजार पर्यटक मांडवा, आवास, सासवने, थळ, वरसोली, अलिबाग, नागाव, रेवदंडा या किनारपट्टीत दाखल झाले. पावसाळ्यात गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मुंबई-पुण्याच्या रायगडच्या किनारपट्टीत कारने येणाऱ्या पर्यटकांनी चक्क पाठच फिरवली होती. परिणामी किनारपट्टीतील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थंडावला होता. शुक्रवारपासून पर्यटकांच्या अगमनाने किनारपट्टीतील पर्यटन व्यावसायिक सुखावला असल्याची माहिती पर्यटन अभ्यासक राजेश शिंदे यांनी दिली आहे.पुण्याहून ताम्हाणी घाट मार्गे सुमारे ७००च्यावर कार व बसेस रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, दिवेआगर,मुरुड या किनारपट्टीत दाखल झाल्या आहेत तर वरंध मार्गे महाडला येवून रायगड दर्शन करून पुढे दापोली-हर्णेच्या सागर किनारपट्टीत पोहोचणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटकांचे प्रमाण मोठे असल्याची माहिती श्रीवर्धनमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज गोगटे यांनी दिली आहे. हरिहरेश्वर हे तीर्थस्थान दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांचे ते कुलदैवतही आहे. त्यामुळे देवदर्शनासह पर्यटन असा दुहेरी हेतू ने पर्यटक येत असल्याचे गोगटे म्हणाले.