शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई आराखड्याची कोटींची उड्डाणे

By admin | Updated: March 10, 2016 02:22 IST

जिल्ह्यातील पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यापेक्षा जलदगतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होणाऱ्या पर्यायाचाच विचार केल्याचे जिल्ह्याच्या टंचाई कृती आराखड्यावरून दिसून येते.

आविष्कार देसाई, अलिबागजिल्ह्यातील पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यापेक्षा जलदगतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होणाऱ्या पर्यायाचाच विचार केल्याचे जिल्ह्याच्या टंचाई कृती आराखड्यावरून दिसून येते. टँकरने पाणीपुरवठा करण्याचा आकडा हा तब्बल सात कोटी ५० लाख ८९ हजार रुपयांवर पोचणार आहे. त्यामुळे सरकारच्या काही मार्गदर्शक सूचनांना राजकीय आणि प्रशायकीय यंत्रणेने तिलांजली दिल्याचे अधोरेखित होत आहे.अपुऱ्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील विविध धरणांत सुमारे ६० टक्के जमा झालेला पाणीसाठा आता तळपत्या उन्हाने सुमारे ५० टक्क्यांवर आला आहे. धरणे तळ गाठण्याच्या तयारीत असल्याने जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. जिल्ह्यामध्ये ४३३ गावे, एक हजार ४३३ वाड्या टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्या आहेत. टंचाई निवारण्यासाठी २०१५-१६ साठी सात कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. गेल्यावर्षी हाच आकडा पाहिला तर ५८१ गावे, ९९५ वाड्यांसाठी सहा कोटी ८८ लाख ९९ हजार रुपये खर्च करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी ज्यांनी टँकरने पाणीपुरवठा केला होता त्यांची बिलेही अद्याप अदा केली नसल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. सरकारच्या नियमांप्रमाणे टँकर ही कमी खर्चाची योजना टंचाई कृती आराखड्यात समाविष्ठ करणे गरजेचे असेल, तर अजून किती वर्षे टँकरने पाणीपुरवठा करायचा आणि कमी खर्चाची योजना म्हणून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करायचे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. टंचाई क्षेत्रातून पाण्याचे संकट दूर व्हावे, यासाठी सरकारने काही मार्गदर्शक सूचना ३ फेब्रुवारी १९९९ च्या सरकारी निर्णयाने जारी केल्या होत्या. बुडक्या घेणे, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, विहिरी अधिग्रहण करणे, प्रगतीपथावरील नळ पाणीपुरवठा योजना करणे, त्यांची दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहीर घेणे, तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजना करणे, विंधन विहिरींचे जल भंजण करणे याचा समावेश आहे. मात्र २०१४-१५ आणि १०१५-१६ च्या कृती आराखड्यात राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणांनी या बाबींना कृती आराखड्यातच बगल दिल्याचे दिसून येते.