शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांना टॅबचा मोह सुटेना

By admin | Updated: February 16, 2016 02:59 IST

महापालिकेचा संपूर्ण कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला आहे. तर प्रशासनाचाच प्रयत्न फसल्याची संधी साधत नगरसेवकांनाही टॅबचा मोह अनावर झाल्याचे दिसत आहे

नवी मुंबई : महापालिकेचा संपूर्ण कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला आहे. तर प्रशासनाचाच प्रयत्न फसल्याची संधी साधत नगरसेवकांनाही टॅबचा मोह अनावर झाल्याचे दिसत आहे. यामुळे पालिकेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या मागील पंचवार्षिक कालाधीत तत्कालीन महापौर सागर नाईक यांच्या संकल्पनेतून नगरसेवक व अधिकाऱ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले होते. महापालिकेचे संपूर्ण कामकाज पेपरलेस व्हावे, या दृष्टीने त्यांनी हे पाऊल उचलले होते. या संकल्पने अंतर्गत नगरसेवक, अधिकारी यांना टॅबवरच विषयपत्रिका मिळणार होती. ८९ नगरसेवक व अधिकारी अशा १२२ जणांना हे टॅब देण्यात आले होते. टॅबवर विषयपत्रिका पाहता यावी, याकरिता विशेष अ‍ॅप्लिकेशन देखील तयार करण्यात आले होते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ४५ लाखांहून अधिक रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र पेपरलेस कामकाजाची संपूर्ण संकल्पनाच फेल ठरल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीनंतर दुसऱ्या पंचवार्षिक कालावधीस सुरुवात होऊन सुमारे ११ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही गत कालखंडातील नगरसेवकांनी हे टॅब परत केलेले नाहीत. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना देण्यात आलेले टॅब कालखंड संपल्यानंतर परत जमा करायचे असल्याचे गुपित काहीसे उशिरा उघड झाले होते. त्यामुळे वाटप झालेले टॅब कायमस्वरूपी आपलेच असल्याचा गैरसमज काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना झालेला असावा. यामुळे त्यांनी सदर टॅब पालिकेला परत केलेले नाहीत. परंतु जे नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत त्यांच्याकडूनही टॅबचा वापर होत असल्याचे सभागृहात दिसत नाही. सद्य:स्थितीला गतकालखंडातील ४८ नगरसेवक व त्यांचे नातेवाईक सभागृहात आहेत. त्यापैकी २५ नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. तर १३ नगरसेवकांच्या पत्नी, ९ नगरसेविकांचे पती व दोन जणांची मुले असे ४८ जण निवडून आले आहेत. नगरसेवकांना टॅब दिल्यानंतर परिवहन व शिक्षण मंडळ सदस्यांनाही टॅबचे स्वप्न पडू लागले होते. त्यांनीही स्वत:साठी पालिकेकडे टॅबची मागणी करायला सुरुवात केली होती. मात्र ज्यांना टॅब दिले त्यांनीच परत केले नसल्याने पालिकेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अवघ्या १३ जणांनी अद्यापपर्यंत पालिकेला टॅब परत केले आहेत. त्यामध्ये तत्कालीन आयुक्त आबासाहेब जऱ्हाड व नगररचनाकार प्रकाश ठाकूर यांच्यासह ११ लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. त्यापैकी नामदेव भगत यांनी निवडणूकदरम्यान टॅब परत करून निवडून आल्यानंतर तो पुन्हा घेतला आहे. मात्र सेसचे तत्कालीन अधिकारी सुधीर चेके यांनी महापालिकेतून बदली झाल्यानंतरही टॅब परत केलेला नाही. यावरून लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनाही टॅबचा मोह सुटत नसल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)