शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

CoronaVirus News: मृत्युदर रोखण्यासाठी तज्ज्ञांचीही मदत; प्रत्येक प्रकरणाची केली जातेय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:46 IST

महापालिका आयुक्त घेत आहेत रोज आढावा

- नामदेव मोरे नवी मुुंबई : शहरातील कोरोनाचा मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने निश्चित केले आहे. यासाठी मृत्यू झालेल्या प्रत्येक केसचा सविस्तर अभ्यास केला जात आहे. तज्ज्ञांशीही चर्चा केली जात असून, आयुक्त अभिजीत बांगर स्वत: प्रतिदिन आढावा घेत आहेत.नवी मुंबईमधील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर आली आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. जास्तीतजास्त चाचण्या करायच्या. रुग्ण वेळेत शोधून त्यांना वेगळे करून उपचार करण्यावर भर दिला आहे. रुग्ण वाढले तरी चालतील, पण कोणाचाही मृत्यू होऊ नये, अशा सूचना मनपा व खासगी रुग्णालयांनाही दिल्या आहेत. आयुक्त स्वत: रोज मृत्यू होणाºया व्यक्तींवर काय उपचार केले, उपचारात काय त्रुटी राहिल्या का, याची माहिती घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशीही चर्चा केली जात आहे. खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडूनही माहिती घेतली जात आहे. उपचार करणाºया मनपाच्या डॉक्टरांनाही वेबिनारद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशीही आयुक्त रोज चर्चा करत आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे मृत्युदर साडेतीनवरून अडीच टक्क्यांवर आला आहे.कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महानगरपालिकेच्या वाशी येथील डेडिकेटेड कोविड रुग्णालयात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मनपा रुग्णालयातील मृत्युदर कमी करण्यासाठीही ठोस पावले उचलण्यात आली आहेत. डॉक्टरांनी किती वेळा रुग्णाची तपासणी करावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किती वेळा वार्डमध्ये प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे, याविषयीही स्पष्ट लेखी आदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या या उपाययोजनांना काही प्रमाणात यश येऊ लागले आहे. एक महिन्यापूर्वी मृत्युदर साडेतीनवर गेला होता. त्यामध्ये घसरण होऊन मृत्युदर अडीचवर आला आहे. शून्य मृत्युदर करण्यासाठी वेळेत रुग्णांचा शोध घेऊन तत्काळ उपचार करण्यावर भर देण्यात आला आहे. आयुक्त स्वत: प्रत्येक रुग्णावर लक्ष देत असल्याने, उपचार करणारे डॉक्टरही पूर्वीपेक्षा जास्त दक्ष झाले आहेत.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलेशहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. एक महिन्यापूर्वी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यांवर आले होते. सद्यस्थितीमध्ये हे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढल्याने शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे.ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोकाज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. ५0 वर्षांपेक्षा जास्त वय असेल व रुग्णास मधुमेह, हृदयविकारासह श्वसनाशी संबंधित आजार असल्यास मृत्यूची शक्यता जास्त असते. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे उपचार व चाचण्या यावरही विशेष लक्ष दिले जात आहे.गंभीर रुग्णांवर विशेष लक्षगंभीर लक्षणे असलेल्या प्रत्येक रुग्णावर विशेष लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. रुग्ण आॅक्सिजन, व्हेंटिलेटर आवश्यकतेप्रमाणे वेळेत उपलब्ध व्हावा. रुग्णांशी व त्यांच्या कुटुंबीयांशीही नियमित संपर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका