शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

शहरातील ५० हजार खाण कामगारांवर संक्रांत

By admin | Updated: October 11, 2016 03:37 IST

केंद्र शासनाची मंजुरी असतानाही सिडकोने वेळेत परवानगी दिली नसल्याने शहरातील ७२ दगडखाणी बंद करण्यात आल्या आहे

नवी मुंबई : केंद्र शासनाची मंजुरी असतानाही सिडकोने वेळेत परवानगी दिली नसल्याने शहरातील ७२ दगडखाणी बंद करण्यात आल्या आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ५० हजार कामगार, वाहतूकदार व इतरांचा रोजगार थांबला आहे. ऐन दसऱ्यामध्ये खाण कामगारांवर संक्रांत कोसळली आहे. बंद खाणींमुळे शहरातील विकास कामेही ठप्प झाली आहेत. देशामध्ये सर्वाधिक विकास कामे नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये सुरू आहेत. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना व परिसरामुळे बांधकाम हाच प्रमुख व्यवसाय बनला आहे. बांधकामांसाठी आवश्यक असलेली खडी व दगड ठाणे बेलापूर एमआयडीसीमधील दगडखाणींमधून उपलब्ध होत असतो. स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेली नवी मुंबई व दक्षिण नवी मुंबईच्या विकासाला याच खाणींमधून बांधकाम साहित्याचा पुरवठा झाला आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांची जमीन संपादित केल्यानंतर येथील प्रकल्पग्रस्तांना ९४ दगडखाणी मंजूर केल्या होत्या. यामधील २२ दगडखाणी यापूर्वीच बंद झाल्या आहेत. उर्वरित ७२ दगडखाणींना केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन विभागाने २००७ मध्ये पुढील २० वर्षासाठी परवानगी दिली आहे. पण सिडकोच्या धोरणाप्रमाणे दहाच वर्षे परवानगी देता येत असल्याने त्यांनी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत पहिल्या टप्प्यातील परवानगी व नंतर दहा वर्षासाठी परवानगी देण्याचे निश्चित केले होते. पण वेळेत परवानगी न दिल्याने दगडखाणींसाठीची मुदत संपली असल्याने सर्व दगडखाण मालकांनी १ आॅक्टोबरपासून खाणी बंद केल्या आहेत. कायदेशीरपणे परवानगी मिळाल्यानंतरच खाणी सुरू करण्याचा निर्णय नवी मुंबई दगडखाण चालक व मालक संघटनेने घेतला आहे. नवरात्री उत्सव सुरू झाल्याच्या दिवशीच सर्व खाणी बंद झाल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दगडखाणींमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ५० हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. प्रत्यक्ष खाणीमध्ये काम करणारे मजूर, वाहतूकदार व इतर सर्वांचाच रोजगार थांबला आहे. उधारी साहित्य घेवून दसरा साजरा करण्याची वेळ कामगारांवर आली आहे. तत्काळ खाणी सुरू झाल्या नाहीत तर कामगारांची दिवाळीही अंधारात साजरी होणार आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. नवी मुंबईमधील रिकोंडा कॉरी, महात्मा गांधी नगर, बोनसरी, इंदिरानगर, तुर्भेनाका, हनुमाननगर, गणेश नगर व इतर अनेक झोपडपट्टीमधील ८० टक्के लोकसंख्येचा रोजगार दगडखाणींवरच अवलंबून आहे. दगडखाण संघटनेने सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला असून लवकर हा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी केली आहे. सिडको प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आमचा दसरा दु:खात गेला, दिवाळीतरी आनंदात जावू द्या, असे मत खाण मजुरांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)सिडकोची दिरंगाई -केंद्र शासनाची २० वर्षांसाठी परवानगी असताना सिडकोने परवानगीसाठी दोन टप्पे केले. २००७ ते सप्टेंबर २०१६ पर्यंत दहा वर्षांसाठी परवानगी दिली व यानंतर पुढील दहा वर्षांची परवानगी देण्याचे मान्य केले होते. परंतु दहा वर्षांची मुदत संपण्यापूर्वी वाढीव मुदतीसाठीची कार्यवाही करणे आवश्यक होते. वेळेत कार्यवाही झाली नसल्यामुळे ३० सप्टेंबरला खाणींची मुदत संपली व सर्व खाणी बंद करण्याची वेळ आली आहे.

 

विकासावर परिणाम-नवी मुंबई, मुंबई, पनवेल परिसरातील बांधकामांना नवी मुंबईमधून खडी पुरविली जाते. १ आॅक्टोबरपासून खडी उपलब्ध होत नसल्याने सर्व विकास कामे ठप्प झाली आहेत. वेळेत पुन्हा खाणी सुरू झाल्या नाहीत तर बांधकाम साहित्याचे दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दगडखाणींवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ५० हजार नागरिकांचा रोजगार अवलंबून आहे. १ आॅक्टोबरपासून सर्वांचा रोजगार बंद आहे. सिडकोने काही खाण पट्ट्यांसाठी तात्पुरत्या परवान्या देण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. पण याविषयी कायमस्वरूपी तोडगा काढून दहा वर्षासाठीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे. - नामदेव ठाकूर, अध्यक्ष-दगडखाण मालक-चालक संघटना

 

शहरविकासासाठी दगडखाणी-शासनाने नवी मुंबई वसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथील पायाभूत सुविधा व इमारतींसाठी आवश्यक खडी, दगड याच परिसरात उपलब्ध व्हावे यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये दगडखाणी सुरू केल्या. प्रकल्पग्रस्त नागरिक व माजी सैनिकांना खाणपट्ट्यांचे वितरण केले होते. सिडकोच्या जमिनीवर ९४ खाणी होत्या. यामधील ७२ दगडखाणींना केंद्र शासनाने २०२६ पर्यंत मंजुरी दिली आहे.

 

पैसे भरूनही परवानगी नाही-दगडखाणी मालकांनी २००१ मध्ये खाणींच्या मोबदल्यात पर्यायी जमीन व वृक्ष संगोपणासाठी शासनास ३ कोटी रूपये भरले होते. यानंतर २००७ पर्यंत परवानगी दिली होती. सदर मुदत संपत आल्यानंतर खाण मालकांनी केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली. यासाठी सिडकोच्यावतीने खाण मालकांनी १७ कोटी रूपये भरले आहेत.