शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

शहरातील ५० हजार खाण कामगारांवर संक्रांत

By admin | Updated: October 11, 2016 03:37 IST

केंद्र शासनाची मंजुरी असतानाही सिडकोने वेळेत परवानगी दिली नसल्याने शहरातील ७२ दगडखाणी बंद करण्यात आल्या आहे

नवी मुंबई : केंद्र शासनाची मंजुरी असतानाही सिडकोने वेळेत परवानगी दिली नसल्याने शहरातील ७२ दगडखाणी बंद करण्यात आल्या आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ५० हजार कामगार, वाहतूकदार व इतरांचा रोजगार थांबला आहे. ऐन दसऱ्यामध्ये खाण कामगारांवर संक्रांत कोसळली आहे. बंद खाणींमुळे शहरातील विकास कामेही ठप्प झाली आहेत. देशामध्ये सर्वाधिक विकास कामे नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये सुरू आहेत. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना व परिसरामुळे बांधकाम हाच प्रमुख व्यवसाय बनला आहे. बांधकामांसाठी आवश्यक असलेली खडी व दगड ठाणे बेलापूर एमआयडीसीमधील दगडखाणींमधून उपलब्ध होत असतो. स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेली नवी मुंबई व दक्षिण नवी मुंबईच्या विकासाला याच खाणींमधून बांधकाम साहित्याचा पुरवठा झाला आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांची जमीन संपादित केल्यानंतर येथील प्रकल्पग्रस्तांना ९४ दगडखाणी मंजूर केल्या होत्या. यामधील २२ दगडखाणी यापूर्वीच बंद झाल्या आहेत. उर्वरित ७२ दगडखाणींना केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन विभागाने २००७ मध्ये पुढील २० वर्षासाठी परवानगी दिली आहे. पण सिडकोच्या धोरणाप्रमाणे दहाच वर्षे परवानगी देता येत असल्याने त्यांनी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत पहिल्या टप्प्यातील परवानगी व नंतर दहा वर्षासाठी परवानगी देण्याचे निश्चित केले होते. पण वेळेत परवानगी न दिल्याने दगडखाणींसाठीची मुदत संपली असल्याने सर्व दगडखाण मालकांनी १ आॅक्टोबरपासून खाणी बंद केल्या आहेत. कायदेशीरपणे परवानगी मिळाल्यानंतरच खाणी सुरू करण्याचा निर्णय नवी मुंबई दगडखाण चालक व मालक संघटनेने घेतला आहे. नवरात्री उत्सव सुरू झाल्याच्या दिवशीच सर्व खाणी बंद झाल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दगडखाणींमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ५० हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. प्रत्यक्ष खाणीमध्ये काम करणारे मजूर, वाहतूकदार व इतर सर्वांचाच रोजगार थांबला आहे. उधारी साहित्य घेवून दसरा साजरा करण्याची वेळ कामगारांवर आली आहे. तत्काळ खाणी सुरू झाल्या नाहीत तर कामगारांची दिवाळीही अंधारात साजरी होणार आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. नवी मुंबईमधील रिकोंडा कॉरी, महात्मा गांधी नगर, बोनसरी, इंदिरानगर, तुर्भेनाका, हनुमाननगर, गणेश नगर व इतर अनेक झोपडपट्टीमधील ८० टक्के लोकसंख्येचा रोजगार दगडखाणींवरच अवलंबून आहे. दगडखाण संघटनेने सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला असून लवकर हा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी केली आहे. सिडको प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आमचा दसरा दु:खात गेला, दिवाळीतरी आनंदात जावू द्या, असे मत खाण मजुरांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)सिडकोची दिरंगाई -केंद्र शासनाची २० वर्षांसाठी परवानगी असताना सिडकोने परवानगीसाठी दोन टप्पे केले. २००७ ते सप्टेंबर २०१६ पर्यंत दहा वर्षांसाठी परवानगी दिली व यानंतर पुढील दहा वर्षांची परवानगी देण्याचे मान्य केले होते. परंतु दहा वर्षांची मुदत संपण्यापूर्वी वाढीव मुदतीसाठीची कार्यवाही करणे आवश्यक होते. वेळेत कार्यवाही झाली नसल्यामुळे ३० सप्टेंबरला खाणींची मुदत संपली व सर्व खाणी बंद करण्याची वेळ आली आहे.

 

विकासावर परिणाम-नवी मुंबई, मुंबई, पनवेल परिसरातील बांधकामांना नवी मुंबईमधून खडी पुरविली जाते. १ आॅक्टोबरपासून खडी उपलब्ध होत नसल्याने सर्व विकास कामे ठप्प झाली आहेत. वेळेत पुन्हा खाणी सुरू झाल्या नाहीत तर बांधकाम साहित्याचे दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दगडखाणींवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ५० हजार नागरिकांचा रोजगार अवलंबून आहे. १ आॅक्टोबरपासून सर्वांचा रोजगार बंद आहे. सिडकोने काही खाण पट्ट्यांसाठी तात्पुरत्या परवान्या देण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. पण याविषयी कायमस्वरूपी तोडगा काढून दहा वर्षासाठीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे. - नामदेव ठाकूर, अध्यक्ष-दगडखाण मालक-चालक संघटना

 

शहरविकासासाठी दगडखाणी-शासनाने नवी मुंबई वसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथील पायाभूत सुविधा व इमारतींसाठी आवश्यक खडी, दगड याच परिसरात उपलब्ध व्हावे यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये दगडखाणी सुरू केल्या. प्रकल्पग्रस्त नागरिक व माजी सैनिकांना खाणपट्ट्यांचे वितरण केले होते. सिडकोच्या जमिनीवर ९४ खाणी होत्या. यामधील ७२ दगडखाणींना केंद्र शासनाने २०२६ पर्यंत मंजुरी दिली आहे.

 

पैसे भरूनही परवानगी नाही-दगडखाणी मालकांनी २००१ मध्ये खाणींच्या मोबदल्यात पर्यायी जमीन व वृक्ष संगोपणासाठी शासनास ३ कोटी रूपये भरले होते. यानंतर २००७ पर्यंत परवानगी दिली होती. सदर मुदत संपत आल्यानंतर खाण मालकांनी केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली. यासाठी सिडकोच्यावतीने खाण मालकांनी १७ कोटी रूपये भरले आहेत.