शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

निवृत्तांसाठी ‘कंत्राटी’ धोरण

By admin | Updated: January 18, 2016 02:13 IST

सरकारी सेवेतून निवृत झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी पध्दतीने सेवेत सामावून घेण्याची छुपी तयारी सरकारने पूर्ण केली आहे.

आविष्कार देसाई, अलिबागसरकारी सेवेतून निवृत झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी पध्दतीने सेवेत सामावून घेण्याची छुपी तयारी सरकारने पूर्ण केली आहे. निवृत्तीचे वय ५८ वर्षे असले, तरी कंत्राटी पध्दतीच्या आडून ते ७० वर्षांपर्यंत करण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारकडून सोशल सिक्युरिटीवर काट मारली असतानाच दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगारांवरही बेकारीचा घाव घातल्याची धारणा निर्माण झाली आहे. सरकारच्या या धोरणाचा फटका जिल्ह्यातील ६३ हजार सुशिक्षित बेराजगारांना बसणार आहे, तर सुमारे १७ हजार निवृत्तीधारकांना याचा लाभही घेता येणार आहे.५८-६० वर्षांपर्यंत सरकारी सेवेत काम करायचे आणि निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन, भविष्य निवाह निधी (पीएफ) यासह अन्य सेवा-सुविधा उपभोगाच्या. त्यामुळे सरकारी सेवेत काम करण्याचा मोह आजही कायम असल्याचे दिसून येते. सरकारी अधिकारी, कर्मचारी, त्यांचे भत्ते, पेन्शन, पीएफ या सोशल सिक्युरिटीमुळे सरकारच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण पडतो. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने २००५ नंतर अशा आर्थिक खर्चावर लगाम लावताना कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे ठरविले. त्यातूनही काही सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम मिळालेही, मात्र सरकारी सेवत कायमस्वरूपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळण्याचे बंद झाले.८ जानेवारी २०१६ला सरकारी निर्णय प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार निवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्दतीने सेवेत सामावून घ्यावे. ज्यांनी वयाची ७० वर्षे ओलांडली नाहीत त्यांनाच या निर्णयाचा लाभ द्यावा. विशेष म्हणजे कंत्राटी पध्दतीने घेतलेल्यांना नियमित करता येणार नाही. देण्यात आलेली नियुक्ती एका वेळी जास्तीत जास्त एका वर्षासाठी देण्यात यावी; परंतु तीन वर्षांपर्यंत दरवर्षी त्याचे नूतनीकरण करण्यात यावे, असे सरकारने म्हटले आहे. काही प्रमाणात जिल्ह्यामध्ये बेराजगारांना कंत्राटी पध्दतीने नोकऱ्या मिळणार आहेत. मात्र काही निवृत्तीधारकांना कंत्राटी पध्दतीने सेवेत घेतल्यास काही अंशी याचा फटका बेरोजगारांना बसणार आहे.