शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांची दादागिरी

By admin | Updated: October 27, 2016 04:09 IST

कामगारांच्या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. रोगराई वाढू नये यासाठी शिवसेना व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी कचरा उचलण्याचा प्रयत्न केला

नवी मुंबई : कामगारांच्या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. रोगराई वाढू नये यासाठी शिवसेना व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी कचरा उचलण्याचा प्रयत्न केला पण कामगारांनी दादागिरी करून कचरा उचलू दिला नाही. कचरा उचलणार नाही व उचलूही देणार नाही अशी भूमिका घेवून शहरवासीयांना वेठीस धरले आहे. पगारवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. रविवारपासून शहरातील साफसफाईची कामे ठप्प आहेत. रूग्णालयामधील साफसफाई झालेली नसल्याने रूग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. महापालिका प्रशासनाला चार दिवसांमध्ये मार्ग काढण्यात यश आलेले नाही. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने कचरा उचलण्यास सुरवात केली आहे. तुर्भे इंदिरानगर परिसरामध्ये शाखा प्रमुख महेश कोठीवाले, तय्यब पटेल व इतर पदाधिकाऱ्यांनी डंपर व खाजगी कामगारांच्या मदतीने कचरा उचलण्यास सुरवात केली पण कंत्राटी कामगारांनी कचरा उचलून देण्यास तीव्र विरोध केला. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो असे निदर्शनास आणूनही कामगारांनी व त्यांच्या नेत्यांनी अरेरावी सुरूच ठेवल्याने कचरा उचलता आला नाही. याविषयी शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली असून याविषयी महापालिका व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. महापालिका प्रशासनाने मात्र कचऱ्यासाठी पूर्णपणे ठेकेदारांना जबाबदार धरले आहे. ठेकेदारांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्याचे आदेश विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. कर्मचाऱ्यांना पगार देण्याची जबाबदारी पूर्णपणे ठेकेदाराची आहे. कंत्राटदाराने सार्वजनिक आरोग्याला बाधा येईल अशा प्रकारे वर्तन करू नये. रस्ते, पदपथ, कचरा कुंडीजवळील कचरा व्यवस्थित गोळा करून ठेवणे आवश्यक आहे पण सद्यस्थितीमध्ये शहरात कचऱ्याचे ढीग तयार झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत अशा सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या आहेत. ठेकेदार गुन्हेगार कसे?महापालिका प्रशासनाने ठेकेदारांच्या कामांना पुढील वर्षासाठी मंजुरी दिली नाही. याविषयी प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर घाईगडबडीत सहा महिन्यांची मुदत वाढवून दिल्याची घोषणा केली आहे. वास्तविक चूक प्रशासनाची असताना त्याचे खापर ठेकेदारांवर फोडण्यात येत असल्याबद्दल ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.कंत्राटी कामगारांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत. त्यांनी आंदोलन करण्यास आमचा विरोध नाही पण शहरात कचऱ्याचे ढीग तयार झाल्यामुळे नागरिक आमच्याकडे तक्रार करत होते. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू नये यासाठी आम्ही स्वखर्चाने कचरा उचलण्यास सुरवात केली होती पण कामगारांच्या विरोधामुळे कचरा उचलता आलेला नसून घडलेल्या प्रकाराविषयी महापालिका व पोलिसांकडे तक्रार केली आहे. - महेश कोठीवाले, शाखा प्रमुख, शिवसेना