शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

कंत्राटी कामगारांची दादागिरी

By admin | Updated: October 27, 2016 04:09 IST

कामगारांच्या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. रोगराई वाढू नये यासाठी शिवसेना व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी कचरा उचलण्याचा प्रयत्न केला

नवी मुंबई : कामगारांच्या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. रोगराई वाढू नये यासाठी शिवसेना व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी कचरा उचलण्याचा प्रयत्न केला पण कामगारांनी दादागिरी करून कचरा उचलू दिला नाही. कचरा उचलणार नाही व उचलूही देणार नाही अशी भूमिका घेवून शहरवासीयांना वेठीस धरले आहे. पगारवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. रविवारपासून शहरातील साफसफाईची कामे ठप्प आहेत. रूग्णालयामधील साफसफाई झालेली नसल्याने रूग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. महापालिका प्रशासनाला चार दिवसांमध्ये मार्ग काढण्यात यश आलेले नाही. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने कचरा उचलण्यास सुरवात केली आहे. तुर्भे इंदिरानगर परिसरामध्ये शाखा प्रमुख महेश कोठीवाले, तय्यब पटेल व इतर पदाधिकाऱ्यांनी डंपर व खाजगी कामगारांच्या मदतीने कचरा उचलण्यास सुरवात केली पण कंत्राटी कामगारांनी कचरा उचलून देण्यास तीव्र विरोध केला. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो असे निदर्शनास आणूनही कामगारांनी व त्यांच्या नेत्यांनी अरेरावी सुरूच ठेवल्याने कचरा उचलता आला नाही. याविषयी शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली असून याविषयी महापालिका व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. महापालिका प्रशासनाने मात्र कचऱ्यासाठी पूर्णपणे ठेकेदारांना जबाबदार धरले आहे. ठेकेदारांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्याचे आदेश विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. कर्मचाऱ्यांना पगार देण्याची जबाबदारी पूर्णपणे ठेकेदाराची आहे. कंत्राटदाराने सार्वजनिक आरोग्याला बाधा येईल अशा प्रकारे वर्तन करू नये. रस्ते, पदपथ, कचरा कुंडीजवळील कचरा व्यवस्थित गोळा करून ठेवणे आवश्यक आहे पण सद्यस्थितीमध्ये शहरात कचऱ्याचे ढीग तयार झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत अशा सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या आहेत. ठेकेदार गुन्हेगार कसे?महापालिका प्रशासनाने ठेकेदारांच्या कामांना पुढील वर्षासाठी मंजुरी दिली नाही. याविषयी प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर घाईगडबडीत सहा महिन्यांची मुदत वाढवून दिल्याची घोषणा केली आहे. वास्तविक चूक प्रशासनाची असताना त्याचे खापर ठेकेदारांवर फोडण्यात येत असल्याबद्दल ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.कंत्राटी कामगारांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत. त्यांनी आंदोलन करण्यास आमचा विरोध नाही पण शहरात कचऱ्याचे ढीग तयार झाल्यामुळे नागरिक आमच्याकडे तक्रार करत होते. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू नये यासाठी आम्ही स्वखर्चाने कचरा उचलण्यास सुरवात केली होती पण कामगारांच्या विरोधामुळे कचरा उचलता आलेला नसून घडलेल्या प्रकाराविषयी महापालिका व पोलिसांकडे तक्रार केली आहे. - महेश कोठीवाले, शाखा प्रमुख, शिवसेना