शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

औद्योगिक वसाहतींंतील दूषित पाणी खाडीत; मासेमारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:36 IST

पारंपरिक व्यवसाय धोक्यात आल्याने उपासमारीची वेळ

- अनंत पाटील नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांतून प्रदूषित पाणी थेट खाडीत सोडले जात असल्याने त्याचा फटका मासेमारांना बसला आहे. या दूषित पाण्यामुळे खाडीतील मासे मृत होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरातील पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.नवी मुंबईतील औद्योगिक नगरीत रबाळे, महापे, पावणे, खैरणे, तुर्भे आणि शिरवणे परिसरात सुमारे चार हजारांहून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत. त्यातील १५ ते २० रासायनिक कंपन्या आहेत. त्यापैकी काही कंपन्यांतून प्रक्रिया न करताच सांडपाणी खाडीत सोडले जाते. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि टाकाऊ रसायनाचे ड्रमच्या ड्रम गटारातून सोडून दिले जाते.रसायनमिश्रीत लाल, तांबडे आणि काळ्या रंगाचे हे दूषित पाणी नाल्यातून थेट खाडीत जात असल्याने खाडीतील मासे व इतर जलचरांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खाडीतील मासे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाण्यातील मासे खाणेही आरोग्यास अपायकारक ठरण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.महापे एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या नाल्यातील पाण्यात विविध प्रकारच्या घातक आणि जीवघेण्या रसायनांचे थर साचल्याचे दिसून येतात. प्लास्टिकबंदी असली तरी या नाल्यात प्लास्टिक बाटल्यांसह दारूच्या बाटल्यांचा थर दिसून येतो. रासायनिक कंपन्यांचे दूषित पाणी नाल्यावाटे थेट खाडीत जाते. या दूषित पाण्यामुळे खाडीतील मासे खोल समुद्रात जात आहेत. त्यामुळे किनाऱ्यावरील मासेमारीच्या व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे.पूर्वी ठाणे-बेलापूर पट्टीत खाºया पाण्यातील मासळी मोठ्या प्रमाणात मिळत असे. मात्र, खाडीतील प्रदूषणामुळे आता ही मासळी दुर्मीळ झाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. एकूणच खाडीत सोडल्या जाणाºया प्रदूषित सांडपाण्यामुळे येथील पारंपरिक मासेमारी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेकडो मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे. मत्स्य दुष्काळामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.नवी मुंबईत रासायनिक कंपन्यांची संख्या फार कमी आहेत. अनेक कंपन्या बाहेरून कच्चा माल आणून त्यावर रिसर्च करून तयार माल भारतात आणि भारताबाहेर पाठविला जातो. कंपन्यातील दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी सोडले जाते.- के. आर. गोपी, अध्यक्ष, टी. एम. आय. एल. ठाणे-बेलापूर.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण