शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

औद्योगिक वसाहतींंतील दूषित पाणी खाडीत; मासेमारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:36 IST

पारंपरिक व्यवसाय धोक्यात आल्याने उपासमारीची वेळ

- अनंत पाटील नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांतून प्रदूषित पाणी थेट खाडीत सोडले जात असल्याने त्याचा फटका मासेमारांना बसला आहे. या दूषित पाण्यामुळे खाडीतील मासे मृत होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरातील पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.नवी मुंबईतील औद्योगिक नगरीत रबाळे, महापे, पावणे, खैरणे, तुर्भे आणि शिरवणे परिसरात सुमारे चार हजारांहून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत. त्यातील १५ ते २० रासायनिक कंपन्या आहेत. त्यापैकी काही कंपन्यांतून प्रक्रिया न करताच सांडपाणी खाडीत सोडले जाते. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि टाकाऊ रसायनाचे ड्रमच्या ड्रम गटारातून सोडून दिले जाते.रसायनमिश्रीत लाल, तांबडे आणि काळ्या रंगाचे हे दूषित पाणी नाल्यातून थेट खाडीत जात असल्याने खाडीतील मासे व इतर जलचरांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खाडीतील मासे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाण्यातील मासे खाणेही आरोग्यास अपायकारक ठरण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.महापे एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या नाल्यातील पाण्यात विविध प्रकारच्या घातक आणि जीवघेण्या रसायनांचे थर साचल्याचे दिसून येतात. प्लास्टिकबंदी असली तरी या नाल्यात प्लास्टिक बाटल्यांसह दारूच्या बाटल्यांचा थर दिसून येतो. रासायनिक कंपन्यांचे दूषित पाणी नाल्यावाटे थेट खाडीत जाते. या दूषित पाण्यामुळे खाडीतील मासे खोल समुद्रात जात आहेत. त्यामुळे किनाऱ्यावरील मासेमारीच्या व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे.पूर्वी ठाणे-बेलापूर पट्टीत खाºया पाण्यातील मासळी मोठ्या प्रमाणात मिळत असे. मात्र, खाडीतील प्रदूषणामुळे आता ही मासळी दुर्मीळ झाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. एकूणच खाडीत सोडल्या जाणाºया प्रदूषित सांडपाण्यामुळे येथील पारंपरिक मासेमारी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेकडो मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे. मत्स्य दुष्काळामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.नवी मुंबईत रासायनिक कंपन्यांची संख्या फार कमी आहेत. अनेक कंपन्या बाहेरून कच्चा माल आणून त्यावर रिसर्च करून तयार माल भारतात आणि भारताबाहेर पाठविला जातो. कंपन्यातील दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी सोडले जाते.- के. आर. गोपी, अध्यक्ष, टी. एम. आय. एल. ठाणे-बेलापूर.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण