शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

गोठीवलीत तलावाची दुरवस्था; घणसोलीत विहिरींवर चढले शेवाळ, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 07:32 IST

नवी मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष, तलावाच्या सभोवताली केरकचरा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच तसेच लहान-मोठी झाडे वाढलेली आहेत

नवी मुंबई : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तलाव आणि विहिरींची साफसफाई वेळच्या वेळी करण्यात येत नसल्यामुळे घणसोली ‘एफ’ विभागातील विहिरी आणि तलावांची पार दुरवस्था झाल्याने त्यातील दुर्गंधीयुक्त आणि घाण पाण्याच्या वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यात गोठीवली गावातील खदान तलाव आणि घणसोली गावातील विहिरींचा समावेश आहे.

गोठीवली गावाला लागूनच खदान तलाव आहे. ता तलावाचे ‘स्वर्गीय राजीव गांधी तलाव’ असे लॉकडाऊनपूर्वी महापालिकेने नामकरण केले आहे. १ मार्च २०२० रोजी महापालिकेच्या वतीने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र आज या तलावाची दुरवस्था  झाली आहे. वेळच्या वेळी साफसफाई होत नसल्यामुळे तलावाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. गवत चार ते पाच फूट वाढलेले आहे. संरक्षण भिंतीचा आणि लोखंडी ग्रीलचा वापर झोपडपट्टी परिसरातील शेकडो रहिवाशांकडून कपडे सुकविण्यासाठी केला जात आहे. जलप्रदूषित दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेकदा मासळी मरण्याच्या अनेक घटना घडत आहेत. 

तलावाच्या सभोवताली केरकचरा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच तसेच लहान-मोठी झाडे वाढलेली आहेत. वाढलेल्या गवतामुळे सापांचा सुळसुळाट असल्याने सकाळ-सायंकाळी वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता टाळता येत नाही.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका