शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

गोठीवलीत तलावाची दुरवस्था; घणसोलीत विहिरींवर चढले शेवाळ, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 07:32 IST

नवी मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष, तलावाच्या सभोवताली केरकचरा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच तसेच लहान-मोठी झाडे वाढलेली आहेत

नवी मुंबई : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तलाव आणि विहिरींची साफसफाई वेळच्या वेळी करण्यात येत नसल्यामुळे घणसोली ‘एफ’ विभागातील विहिरी आणि तलावांची पार दुरवस्था झाल्याने त्यातील दुर्गंधीयुक्त आणि घाण पाण्याच्या वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यात गोठीवली गावातील खदान तलाव आणि घणसोली गावातील विहिरींचा समावेश आहे.

गोठीवली गावाला लागूनच खदान तलाव आहे. ता तलावाचे ‘स्वर्गीय राजीव गांधी तलाव’ असे लॉकडाऊनपूर्वी महापालिकेने नामकरण केले आहे. १ मार्च २०२० रोजी महापालिकेच्या वतीने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र आज या तलावाची दुरवस्था  झाली आहे. वेळच्या वेळी साफसफाई होत नसल्यामुळे तलावाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. गवत चार ते पाच फूट वाढलेले आहे. संरक्षण भिंतीचा आणि लोखंडी ग्रीलचा वापर झोपडपट्टी परिसरातील शेकडो रहिवाशांकडून कपडे सुकविण्यासाठी केला जात आहे. जलप्रदूषित दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेकदा मासळी मरण्याच्या अनेक घटना घडत आहेत. 

तलावाच्या सभोवताली केरकचरा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच तसेच लहान-मोठी झाडे वाढलेली आहेत. वाढलेल्या गवतामुळे सापांचा सुळसुळाट असल्याने सकाळ-सायंकाळी वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता टाळता येत नाही.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका