शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर संक्रात

By admin | Updated: October 24, 2016 03:10 IST

संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचे तीन पुरस्कार मिळवून देण्यामध्ये महत्वाचा वाटा असलेल्या ९१ प्रकल्पग्रस्त साफसफाई ठेकेदारांवर संक्रात

नवी मुंबई : संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचे तीन पुरस्कार मिळवून देण्यामध्ये महत्वाचा वाटा असलेल्या ९१ प्रकल्पग्रस्त साफसफाई ठेकेदारांवर संक्रात आली आहे. सर्व ठेके रद्द करण्यात आले असून त्यांच्या ऐवजी दोनच ठेकेदारांची नियुक्ती करण्याचा डाव आखला जात आहे. यामुळे नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने पनवेल, उरण व ठाणे तालुक्यामधील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन संपादीत केली. प्रकल्पग्रस्तांना अत्यंत तुटपंजा मोबदला देण्यात आला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर उभे राहिले पण त्यामध्ये गावठाणांची स्थिती बिकट झाली. शहरातील खाजगी व सरकारी अस्थापनांमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. पण सर्वांना नोकऱ्या देता येत नसल्याने पालिका, सिडको, एपीएमसी मध्ये साफसफाई व इतर कामांचे ठेके प्रकल्पग्रस्तांना देण्याचे धोरण राबविण्यात आले. महापालिकेत १९९४ पासून ९१ प्रकल्पग्रस्त ठेकेदारांच्या माध्यमातून शहरातील साफसफाईची कामे करण्यात येत आहेत. त्यांच्या कामगिरीवर राज्य शासनाने तिन वेळा मोहर उमठविली आहे. शासनाने २००२ - ०३ मध्ये सर्वप्रथम संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राबविले. पहिल्याच वर्षी प्रथम क्रमांकाचे बक्षीस नवी मुुंबई महानगरपालिकेस मिळाले. यानंतर २००५ - ०६ मध्ये पुन्हा महापालिकेने या अभियानामध्ये सहभाग घेतला व प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. दोन्ही वेळेला प्रत्येकी ५० लाख रूपये बक्षीस मिळाले. या पैशातूनच नेरूळ रेल्वे स्टेशन समोर संत गाडगेबाबा उद्यान उभारण्यात आले आहे. यानंतर २००८ -९ या वर्षामध्ये पुन्हा सर्वोत्कृष्ठ स्वच्छता सुविधेसाठीचे बक्षीस महापालिकेस मिळाले.साफसफाई ठेकेदारांनी फक्त शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले नाही तर सर्व आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीचा हात दिला आहे. रामराव पाटीलच्या घंटागाडीचा ठेका रद्द केल्यानंतर शहरातील कचरा कोणी उचलायचा असा प्रश्न निर्माण होता. यावेळीही प्रकल्पग्रस्त ठेकेदार मदतीला धावून आले. नवीन ठेकेदाराची नियुक्ती करेपर्यंत शहरात कुठेही कचरा साचून दिला नाही. दोन वर्षांपूर्वी ९१ ठेकेदारांऐवजी फक्त दोन ठेकेदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आणला होता. पण लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे हे काम पुन्हा प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले. पाच वर्षासाठी त्यांना हा ठेका देण्यात आला असताना दुसऱ्याच वर्षी ठेका रद्द करण्याचा निर्णयघेण्यात आला आहे. यामुळे पुन्हा प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)