शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर संक्रात

By admin | Updated: October 24, 2016 03:10 IST

संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचे तीन पुरस्कार मिळवून देण्यामध्ये महत्वाचा वाटा असलेल्या ९१ प्रकल्पग्रस्त साफसफाई ठेकेदारांवर संक्रात

नवी मुंबई : संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचे तीन पुरस्कार मिळवून देण्यामध्ये महत्वाचा वाटा असलेल्या ९१ प्रकल्पग्रस्त साफसफाई ठेकेदारांवर संक्रात आली आहे. सर्व ठेके रद्द करण्यात आले असून त्यांच्या ऐवजी दोनच ठेकेदारांची नियुक्ती करण्याचा डाव आखला जात आहे. यामुळे नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने पनवेल, उरण व ठाणे तालुक्यामधील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन संपादीत केली. प्रकल्पग्रस्तांना अत्यंत तुटपंजा मोबदला देण्यात आला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर उभे राहिले पण त्यामध्ये गावठाणांची स्थिती बिकट झाली. शहरातील खाजगी व सरकारी अस्थापनांमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. पण सर्वांना नोकऱ्या देता येत नसल्याने पालिका, सिडको, एपीएमसी मध्ये साफसफाई व इतर कामांचे ठेके प्रकल्पग्रस्तांना देण्याचे धोरण राबविण्यात आले. महापालिकेत १९९४ पासून ९१ प्रकल्पग्रस्त ठेकेदारांच्या माध्यमातून शहरातील साफसफाईची कामे करण्यात येत आहेत. त्यांच्या कामगिरीवर राज्य शासनाने तिन वेळा मोहर उमठविली आहे. शासनाने २००२ - ०३ मध्ये सर्वप्रथम संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राबविले. पहिल्याच वर्षी प्रथम क्रमांकाचे बक्षीस नवी मुुंबई महानगरपालिकेस मिळाले. यानंतर २००५ - ०६ मध्ये पुन्हा महापालिकेने या अभियानामध्ये सहभाग घेतला व प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. दोन्ही वेळेला प्रत्येकी ५० लाख रूपये बक्षीस मिळाले. या पैशातूनच नेरूळ रेल्वे स्टेशन समोर संत गाडगेबाबा उद्यान उभारण्यात आले आहे. यानंतर २००८ -९ या वर्षामध्ये पुन्हा सर्वोत्कृष्ठ स्वच्छता सुविधेसाठीचे बक्षीस महापालिकेस मिळाले.साफसफाई ठेकेदारांनी फक्त शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले नाही तर सर्व आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीचा हात दिला आहे. रामराव पाटीलच्या घंटागाडीचा ठेका रद्द केल्यानंतर शहरातील कचरा कोणी उचलायचा असा प्रश्न निर्माण होता. यावेळीही प्रकल्पग्रस्त ठेकेदार मदतीला धावून आले. नवीन ठेकेदाराची नियुक्ती करेपर्यंत शहरात कुठेही कचरा साचून दिला नाही. दोन वर्षांपूर्वी ९१ ठेकेदारांऐवजी फक्त दोन ठेकेदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आणला होता. पण लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे हे काम पुन्हा प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले. पाच वर्षासाठी त्यांना हा ठेका देण्यात आला असताना दुसऱ्याच वर्षी ठेका रद्द करण्याचा निर्णयघेण्यात आला आहे. यामुळे पुन्हा प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)