शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

औद्योगिक कॉरिडोरसाठी सक्तीचे भूसंपादन?

By admin | Updated: May 7, 2017 06:19 IST

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यासाठी आवश्यक जमिनीपैकी ३० टक्के जमीन अद्याप संपादित होणे बाकी

लोकमत न्यूज नेटवर्करोहा : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यासाठी आवश्यक जमिनीपैकी ३० टक्के जमीन अद्याप संपादित होणे बाकी आहे. सामंजस्याने जमीन संपादित करण्याबाबतचे प्रयत्न असफल होत असल्याने शासनाकडून सक्तीने भूसंपादन करण्याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे. रोहा तालुक्यातील जामगाव, पाथरशेत व पहूर या गावांमधील जमीन पहिल्या टप्प्यातील औद्योगिक कॉरिडोरसाठी संपादित होणार आहे; परंतु स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. जागतिकीकरण विरोधी मंचाच्या नेत्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली बाधित ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.प्रकल्पासाठी सलग जागा आवश्यक असून, संपादित जागेलगत असणारी जागा शेतकऱ्यांनी दिलेली नसल्याने सक्तीने भूसंपादन करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू असून, जिल्हा प्रशासनाने याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सुपूर्द केला आहे. ५ वर्षांपासून हा लढा चालू असून विरोधक सत्ताधारी झाले आणि सत्ताधारी विरोधक झाले; परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे बघण्यास मात्र कोणीही तयार नाही, असे दिसत आहे.प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना १५ टक्के विकसित भूखंड नको असल्यास हेक्टरी ४६ लाख तर विकसित भूखंड हवा असल्यास हेक्टरी ३२ लाख ५० हजार रुपये दर शासनाने निश्चित केला आहे. जागा न देण्याबाबत शेतकरी अद्यापही ठाम आहे. यामुळे दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्ट्याचा प्रश्न भविष्यात चिघळण्याची शक्यता आहे.प्रकल्पाच्या माध्यमातून जपानकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतात येणार असल्याने केंद्र सरकारकडून हा प्रकल्प पुढे रेटण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. यापूर्वीदेखील रायगड जिल्ह्यातील अनेक जमिनी विविध प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आल्या आहेत.