शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

महासभेत आयुक्तांची अनुपस्थिती

By admin | Updated: August 20, 2016 04:53 IST

पाणीप्रश्नावर लक्षवेधी असतानाही आयुक्त सभागृहात उपस्थित नसल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पाण्यासारख्या महत्त्वाच्या

नवी मुंबई : पाणीप्रश्नावर लक्षवेधी असतानाही आयुक्त सभागृहात उपस्थित नसल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाचे गांभीर्य नसल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली. सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने ५० रूपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु मागील काही दिवसांपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिमाणसी १३५ लिटर प्रमाणे पाण्याचे वितरण करण्यास सुरवात केली आहे. परंतु अनेक सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना गरजेपुरते पाणीही उपलब्ध होत नाही. यामुळे नागरिक पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करू लागले आहेत. परंतु अधिकारी आयुक्तांचा आदेश असल्याचे सांगून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नागरिकांनी नगरसेवकांकडे गाऱ्हाणी मांडण्यास सुरवात केली आहे. परंतु प्रशासन नगरसेवकांचेही ऐकत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींमध्येही नाराजी निर्माण झाली आहे. नेरूळ पश्चिमेलाही अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवक सूरज पाटील व गिरीश म्हात्रे यांनी लक्षवेधी मांडली होती. शुक्रवारी लक्षवेधीवर चर्चा होणार होती. परंतु सभागृहात आयुक्त उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्यावतीने अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण सभागृहात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना आयुक्तांनीच उपस्थित असले पाहिजे असा आग्रह धरला. आयुक्त येणार नसतील तर सभा तहकूब करा अशी सूचना रवींद्र इथापे यांनी मांडली व कोणतीही चर्चा न करताच सभा गुंडाळण्यात आली. राष्ट्रवादी काँगे्रसने सभा तहकूब केल्याने शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. नियमाप्रमाणे आयुक्त ते नसतील तर दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्यांना महासभेत पाठवू शकतात. यापूर्वी अनेकवेळा असे होत असते.परंतु सत्ताधाऱ्यांनी मनमानी करून सभा गुंडाळली आहे. दोन महिन्यातील सर्वसाधारण सभेतील सर्व विषय प्रलंबित आहेत. अनेक महत्वाचे प्रस्ताव असतानाही सत्ताधाऱ्यांनी मनमानी करून कामकाज होवू दिले नसल्याचा आरोप एम. के. मढवी यांनी केला आहे.