शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतसारा रोखीतच होतो गोळा!

By admin | Updated: January 11, 2017 06:21 IST

रायगड जिल्हा प्रशासनाला २१३ कोटी ४७ लाख रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५० टक्के म्हणजे, १०६ कोटी ९७ लाख रुपयांचा

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा प्रशासनाला २१३ कोटी ४७ लाख रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५० टक्के म्हणजे, १०६ कोटी ९७ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. यातील करमणूक आणि गौण खनिज यांच्या माध्यमातून मिळणारा महसूल कॅशलेस पद्धतीने गोळा केला जातो. मात्र, ग्रामीण भागात शेतसारा गोळा करण्याचा व्यवहार हा अद्यापही रोखीतच होत असल्याने त्याचे प्रमाण हे सुमारे ३२ कोटी रुपयांच्या घरात आहे. कॅशलेस व्यवहारासाठी सरकारने सुरू केलेली ‘ग्रास’ योजना ग्रामीण भागात तळागाळात पोहोेचविण्याची गरज आहे.जेएनपीटी बंदराचा विकास, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर, अलिबाग-विरार, अलिबाग- वडखळ, मुंबई-गोवा महामार्ग, दिघी पोर्ट, काळ जल विद्युत प्रकल्प यांसह अन्य प्रकल्प प्रस्तावित आहेत, तर काहींचे काम सुरू झाले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात लाखो कोटींची गुंतवणूक झाली आहे. विकासाच्या वाटेवर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महसूल आहे. गौण खनिजाच्या माध्यमातूनही महसूल प्रशासनाला प्राप्त होतो, तसाच करमणूक कराच्या रूपानेही बक्कळ कर वसूल केला जातो. हा सर्व कर वसूल करताना चलन भरून अथवा चेकच्या साहाय्याने व्यवहार होतो.शेतीच्या माध्यमातून गोळा करण्यात येणारा शेतसारा अद्यापही रोखीने तलाठी गोळा करीत आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांकडून मिळणारा कर कमी रकमेचा असल्याने तो रोखीने देण्याचा आणि घेण्याचा व्यवहार होतो. ग्रामीण भागामध्ये अद्यापही कॅशलेस व्यवहार करण्याच्या सुविधा नसल्याने कदाचित अडचण होत असावी. शेतसारा हा कमी रकमेचा असतो त्यामुळे छोट्या व्यवहारासाठी स्वाइप मशिनचा काय वापर करायचा, अथवा वापर करायचे ठरवले, तरी तसे स्वाइप मशिन तलाठ्याकडे असणे गरजेचे आहे. एवढ्या कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करण्यासाठी असलेली गव्हर्मेंट रिसीट अकाऊंट सिस्टीम (ग्रास) ही योजना जुलै २०१६ पासून सुरू आहे. या माध्यमातून शेतकरी थेट आॅनलाइन शेतसारा भरू शकतात. मात्र, ‘ग्रास’चा पाहिजे तेवढा वापर होताना दिसत नाही. सध्या यामार्फत सुमारे १५ टक्के व्यवहार केला जातो. २१३ कोटी महसुलाच्या उद्दिष्टाचा विचार केल्यास हे प्रमाण सुमारे ३२ कोटी रुपये एवढेच आहे.गौण खनिज, करमणूक कर आणि शेतसारा या माध्यमातून प्रशासनाकडे जमा झालेला महसूल हा थेट सरकारच्या तिजोरीत कॅशलेस व्यवहारानेच भरण्यात येतो. शेतसारा ‘ग्रास’ने भरण्याचे प्रमाण हे सुमारे १५ टक्के आहे. भविष्यात त्यामध्ये वाढ करण्यावर भर देण्यात येईल.-जयराज देशमुख, तहसीलदार, महसूल