शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शेतसारा रोखीतच होतो गोळा!

By admin | Updated: January 11, 2017 06:21 IST

रायगड जिल्हा प्रशासनाला २१३ कोटी ४७ लाख रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५० टक्के म्हणजे, १०६ कोटी ९७ लाख रुपयांचा

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा प्रशासनाला २१३ कोटी ४७ लाख रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५० टक्के म्हणजे, १०६ कोटी ९७ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. यातील करमणूक आणि गौण खनिज यांच्या माध्यमातून मिळणारा महसूल कॅशलेस पद्धतीने गोळा केला जातो. मात्र, ग्रामीण भागात शेतसारा गोळा करण्याचा व्यवहार हा अद्यापही रोखीतच होत असल्याने त्याचे प्रमाण हे सुमारे ३२ कोटी रुपयांच्या घरात आहे. कॅशलेस व्यवहारासाठी सरकारने सुरू केलेली ‘ग्रास’ योजना ग्रामीण भागात तळागाळात पोहोेचविण्याची गरज आहे.जेएनपीटी बंदराचा विकास, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर, अलिबाग-विरार, अलिबाग- वडखळ, मुंबई-गोवा महामार्ग, दिघी पोर्ट, काळ जल विद्युत प्रकल्प यांसह अन्य प्रकल्प प्रस्तावित आहेत, तर काहींचे काम सुरू झाले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात लाखो कोटींची गुंतवणूक झाली आहे. विकासाच्या वाटेवर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महसूल आहे. गौण खनिजाच्या माध्यमातूनही महसूल प्रशासनाला प्राप्त होतो, तसाच करमणूक कराच्या रूपानेही बक्कळ कर वसूल केला जातो. हा सर्व कर वसूल करताना चलन भरून अथवा चेकच्या साहाय्याने व्यवहार होतो.शेतीच्या माध्यमातून गोळा करण्यात येणारा शेतसारा अद्यापही रोखीने तलाठी गोळा करीत आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांकडून मिळणारा कर कमी रकमेचा असल्याने तो रोखीने देण्याचा आणि घेण्याचा व्यवहार होतो. ग्रामीण भागामध्ये अद्यापही कॅशलेस व्यवहार करण्याच्या सुविधा नसल्याने कदाचित अडचण होत असावी. शेतसारा हा कमी रकमेचा असतो त्यामुळे छोट्या व्यवहारासाठी स्वाइप मशिनचा काय वापर करायचा, अथवा वापर करायचे ठरवले, तरी तसे स्वाइप मशिन तलाठ्याकडे असणे गरजेचे आहे. एवढ्या कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करण्यासाठी असलेली गव्हर्मेंट रिसीट अकाऊंट सिस्टीम (ग्रास) ही योजना जुलै २०१६ पासून सुरू आहे. या माध्यमातून शेतकरी थेट आॅनलाइन शेतसारा भरू शकतात. मात्र, ‘ग्रास’चा पाहिजे तेवढा वापर होताना दिसत नाही. सध्या यामार्फत सुमारे १५ टक्के व्यवहार केला जातो. २१३ कोटी महसुलाच्या उद्दिष्टाचा विचार केल्यास हे प्रमाण सुमारे ३२ कोटी रुपये एवढेच आहे.गौण खनिज, करमणूक कर आणि शेतसारा या माध्यमातून प्रशासनाकडे जमा झालेला महसूल हा थेट सरकारच्या तिजोरीत कॅशलेस व्यवहारानेच भरण्यात येतो. शेतसारा ‘ग्रास’ने भरण्याचे प्रमाण हे सुमारे १५ टक्के आहे. भविष्यात त्यामध्ये वाढ करण्यावर भर देण्यात येईल.-जयराज देशमुख, तहसीलदार, महसूल