शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वाघिवलीप्रकरणी सीआयडी चौकशी करा

By admin | Updated: August 11, 2016 04:13 IST

वाघिवलीमधील ६६ शेतकऱ्यांच्या फसवणुकीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी. वडिलोपार्जित जमीन गेली व त्याचा मोबदलाही दुसऱ्यांनीच हडप केला

नामदेव मोरे, नवी मुंबई वाघिवलीमधील ६६ शेतकऱ्यांच्या फसवणुकीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी. वडिलोपार्जित जमीन गेली व त्याचा मोबदलाही दुसऱ्यांनीच हडप केला. पूर्ण गावच भूमिहीन झाले असून आम्हाला न्याय मिळावा. न्याय मिळणार नसेल तर मरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून पोलीस महासंचालकांनाही याविषयी पत्र दिले आहे. दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा सिडकोने केली आहे. याच स्मार्ट सिटीमध्ये येणाऱ्या विमानतळाजवळ असलेल्या वाघिवली ग्रामस्थांची स्थिती आदिवासींपेक्षाही भयंकर आहे. गावामध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. फक्त सहावीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा. शहरात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. मासेमारी व रेती काढण्यावर पूर्ण गावाचा उदरनिर्वाह होतो. रेती उपसा बंद झाल्याने अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. सिडकोने ९५ गावांमधील जमीन संपादन केल्यानंतर ग्रामस्थांना त्याचा मोबदला दिला. साडेबारा टक्केचे भूखंड दिले. प्रकल्पग्रस्त प्रचंड श्रीमंत असल्याचे भासविले जात आहे. परंतु वाघिवली गावची स्थिती पाहिली की प्रकल्पग्रस्तांची किती दयनीय अवस्था आहे, हे स्पष्ट दिसते. खारघर, कामोठेमध्ये गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. परंतु खाडीच्या पलीकडे वसलेल्या वाघिवलीमधील ग्रामस्थ अद्याप पूर्वजांनी बांधलेल्या कौलारू घरामध्येच वास्तव्य करत आहेत. गावात येण्यासाठीच्या रोडवर प्रचंड खड्डे आहेतच, शिवाय अंतर्गत रस्त्यांची स्थितीही भयंकर आहे. ग्रामस्थांची १५२ एकर जमीन संपादित करण्यात आली. परंतु कुळांचा अधिकार डावलून मोबदला कुळांच्या मालकाला मिळाला. साडेबारा टक्के योजनेअंतर्गत ५३ हजार चौरस मीटरचे भूखंड कुळांच्या सावकार कंपनीला दिला व त्यांनी परस्पर ते भूखंड विकासकाला दिले. सीबीडीमध्ये निसर्गरम्य पारसिक हिल डोंगरामध्ये दिलेल्या या भूखंडाची किंमत जवळपास १ हजार कोटी रूपये होत आहे. परंंतु ज्यांचा या भूखंडावर नैसर्गिक हक्क आहे त्यांना मात्र एक रूपयाही मिळालेला नाही. गावातील सर्व ६६ कुळांची तीन पिढ्यांपासूनची जमीन गेल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. आठ वर्षे न्यायासाठी धडपड सुरू आहे. विधानसभेमध्ये आवाज उठविण्यात आला. सिडकोने भूखंड वाटपाला स्थगिती दिली व काही महिन्यांपूर्वी पुन्हा स्थगिती उठविली. न थकता लढणारे ग्रामस्थ आम्हाला न्याय मिळावा एवढीच मागणी शासनाकडे करत आहेत. आतापर्यंत सिडको, पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी सर्वत्र निवेदने दिली. गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली. परंतु कोणीच दखल घेत नसल्याने अखेर सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने बुधवारी पोलीस महासंचालकांना निवेदन देवून सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.