शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

स्वच्छ भारत अभियानाला भासतेय निधीची चणचण

By admin | Updated: May 26, 2017 00:17 IST

स्वच्छ भारत अभियानातील निधीच्या कमतरतेचे वास्तव हे महाभयंकर असल्याचे समोर आले आहे. सुमारे ८७ कोटी ६२ लाख १६ हजार रुपयांच्या निधीची अद्यापही

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : स्वच्छ भारत अभियानातील निधीच्या कमतरतेचे वास्तव हे महाभयंकर असल्याचे समोर आले आहे. सुमारे ८७ कोटी ६२ लाख १६ हजार रुपयांच्या निधीची अद्यापही या अभियानासाठी कमतरता भासत आहे. २१ हजार ६१४ लाभार्थ्यांनी २५ कोटी ९३ लाख ६८ हजार रुपये किमतीची शौचालये बांधली. मात्र, त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारने अद्याप एक दमडीदेखील टाकलेली नाही. सरकारच्या या धोरणामुळे शौचालये बांधून पूर्ण झाली असतानाही प्रशासनाला ती रेकॉर्डवर घेता आलेली नाहीत. असे सर्व असतानादेखील हे अभियान यशस्वी होणारच, अशी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात सरकारसह प्रशासन मागे राहिलेले नाही.रायगड जिल्ह्यातील तीन लाख ४६ हजार १६६ कुटुंबांपैकी ३१ मार्च २०१६पर्यंत दोन लाख ४२ हजार ७७५ कुटुंबांनी शौचालये बांधली आहेत. अद्यापही एक लाख चार हजार ३९१ कुटुंबांपैकी ६० हजार ४८६ कुटुंबांनी २०१६-१७पर्यंत शौचालये बांधून पूर्ण केली आहेत. त्यापैकी २१ हजार ६१४ लाभार्थ्यांना २५ कोटी ९३ लाख ६८ हजार रुपये देण्यात आले आहेत. तसेच ज्यांनी ३१ मार्च २०१७ पर्यंत २९ हजार ११३ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे; परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये ३४ कोटी ९३ लाख ५६ हजार रुपये टाकण्यात आलेले नाहीत. त्या सर्व लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनकडे रक्कम मिळावी यासाठी तगादा लावला आहे. अद्यापही ४३ हजार ९०५ शौचालयांच्या उभारणीसाठी ५२ कोटी ६८ लाख ६० हजार रुपयांच्या निधीची चणचण भासत आहे.ज्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे ते २९ हजार ११३ लाभार्थी आणि उरलेल्या ४३ हजार ९०५ शौचालयांच्या उभारणीसाठी एकत्रित ८७ कोटी ६२ लाख १६ हजार रुपयांची आवश्यकता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील निधी सरकारला एकट्या रायगड जिल्ह्याच्या ओंजळीमध्ये ओतायचा आहे. मात्र, सरकारने प्रशासनाला एक नवा पैसाही दिलेला नाही.प्रशासकीय पातळीवरून सातत्याने निधीची मागणी करून तो तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यावाचून प्रशासनाकडे कोणताच पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या निधीसाठी प्रशासन हतबल झाले असल्याचे स्पष्ट होते. निधी उपलब्ध झालेला नसतानाही २९ हजार ११३ लाभार्थ्यांनी पदरचे पैसे खर्च करून शौचालये उभारली आहेत. ती पूर्ण झालेली शौचालये रेकॉर्डवर घेता येत नसल्याने शौचालय बांधण्याचा आकडा हा फुगलेला दिसतो.स्वच्छ भारत अभियान पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सरकारने तातडीने निधी दिला नाही तर रायगड जिल्ह्यातील स्वच्छ भारत अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.