शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

जुईनगर नाल्यात रसायनमिश्रित पाणी; कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 23:33 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या रसायनमिश्रित पाणी जुईनगरमधील नाल्यात सोडत आहेत. यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होत असून रात्री या परिसरात दुर्गंधी पसरत आहेत. प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नवी मुंबईमधील प्रदूषणामध्ये वाढ होऊ लागली असून देशातील सर्वाधिक प्रदूषण असणाऱ्या शहरांमध्ये समावेश होऊ लागला आहे. औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार नियमांचे पालन करत नसल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी कोपरीमधील नाल्यातून रसायनमिश्रित पाणी सोडले जात होते. 

कोपरी, तुर्भे, कोपरखैरणे परिसरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. माजी मंत्री गणेश नाईक यांनी शिष्टमंडळासह जाऊन निवेदन दिले होते. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने भरारी पथक तयार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यानंतरही नाल्यांमध्ये दूषित पाणी सोडण्याचे प्रकार सुरूच आहेत.