शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
6
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
7
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
8
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
9
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
10
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
11
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
12
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
13
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
14
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
15
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
16
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
17
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
19
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
20
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

सेन्सॉर बोर्डाच्या कामात फेरबदल व्हावा

By admin | Updated: January 17, 2015 23:26 IST

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा लीला सॅमसन यांनी दिलेला राजीनामा ही एक साधी घटना असल्याचे मानून त्याकडे दुर्लक्ष करणे खरेतर चुकीचे ठरेल.

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा लीला सॅमसन यांनी दिलेला राजीनामा ही एक साधी घटना असल्याचे मानून त्याकडे दुर्लक्ष करणे खरेतर चुकीचे ठरेल. कारण ही एक गंभीर घटना आहे. चित्रपटसृष्टीशी काही संबंध नसलेल्या लीला यांना अध्यक्षपद देण्यावरून जेवढे वाद झाले तेवढेच त्यांच्या राजीनाम्यामुळे झाले आहेत. कारण राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी बोर्डाच्या कामात सरकार हस्तक्षेप करीत असल्याचे सांगितले. खूप काळापासून बोर्डाची कार्यशैली आणि स्वरूपात त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. सरकारच्या हस्तक्षेपाचे आणखी एक ताजे उदाहरण म्हणजे ‘पीके’ चित्रपट. सेन्सॉर बोर्डाने यातील वादग्रस्त दृश्ये हटवण्याचा कठोर निर्णय घेतला होता. त्यानंतर चित्रपटाच्या दृश्यांविषयी अनेक नव्या बातम्या येत होत्या. ‘पीके’ चित्रपटाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या एका अधिकाऱ्याने काही दृश्यांबाबत आक्षेप घेतला. तेव्हा त्याचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘पीके’ला संमती देण्याचा निर्णय हा वेगळ््या पातळीवर झाला. आता तो निर्णय नेमका कुठून घेतला गेला, हे कोणत्याही सूज्ञ व्यक्तीला कळेल. जेव्हा देशात सत्तेमध्ये बदल होतो तेव्हा सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्षही बदलला जातो. संबंधित राजकारणी आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्याला पद देतात, ही आता फॅशनच झाली आहे. मे महिन्यात दिल्लीत नवे सरकार आल्यावर बोर्डातही मोठे फेरबदल होणार असल्याचे कळले होते. त्यात अध्यक्षपदावरही नवी नियुक्ती होणार असल्याचे कळले होते. पण एवढे महिने होऊनही बोर्डातल्या अधिकाऱ्यांमध्ये कोणतेच बदल झाले नाहीत. त्यामुळे बोर्डाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचेही सरळ सरळ आरोप करण्यात आले. चित्रपटांना त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या या संस्थेचे महत्त्व मोठे आहे. पण गेल्या काही वर्षांत बोर्डातल्या काही लोकांमुळे, वाढत्या सरकारी हस्तक्षेपामुळे सेन्सॉर बोर्डाचे महत्त्वच कमी होत चालले आहे. काही लोक सेन्सॉर बोर्ड नकोच, अशीही मागणी करीत आहेत. पण आपली परंपरा, धार्मिक संवेदना, संस्कृती बघता चित्रपटांच्या भल्यासाठी हे बॉर्ड असणे गरजेचे असल्याचेही अनेकांचे मत आहे. असे असले तरी अगदी जुन्या नियम आणि कामकाजात फेरबदल करणे हे सगळ््यात जास्त महत्त्वाचे आहे. पण सध्या बोर्डाच्या ढासळत चाललेल्या अवस्थेकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करते आहे. लीला सॅमसन यांनी एकंदर जे प्रश्न उपस्थित केले त्याची सरकारी पातळीवर बारकाईने दखल कोणी घेईल याची अपेक्षाही नाही. पण ‘पीके’ आणि आता ‘मॅसेंजर आॅफ गॉड’ या चित्रपटांमुळे झालेल्या वादामुळे एक मात्र स्पष्ट आहे की, सेन्सॉर बॉर्डाच्या कामात मोठ्या फेरबदलाची नितांत गरज आहे. त्याकडे सरकार जर दुर्लक्षच करणार असेल तर त्याहून खेदाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? उलट सेन्सॉरशी संबंधित जे वाद होतात त्यासाठी सरकारच जबाबदार असून त्यांना बदल नको आहे, हाच संदेश जाणार आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर सेन्सॉर बोर्डाच्या अस्तित्वासाठी तरी सरकारने ठोस पावले उचलावीत.