शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्याचे आव्हान; तपासाबाबत संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 00:19 IST

महत्त्वाच्या गुन्ह्यातील दोषींची सुटका

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून त्याची उकल केल्यानंतरही न्यायालयात ते सिद्ध करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. त्यामध्ये तपासातील बाबींसह साक्षीदार पलटण्याच्या कारणांचा समावेश आहे. याचा परिणाम पोलिसांच्या दोषसिद्धी प्रमाणावर होत आहे.एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल करून आरोपींना न्यायालयाद्वारे कठोर शिक्षा मिळेपर्यंत पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते, त्याकरिता गुन्हा घडल्यापासून ते त्याची उकल करेपर्यंतचा तपास महत्त्वाचा असतो. त्यामध्ये घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक तपास यासह साक्षीदार यांचा समावेश असतो. यानंतरही पकडलेल्या आरोपींविरोधात न्यायालयात दोष सिद्ध होऊ न शकल्याने पोलिसांची नाचक्की होत आहे. गुन्हे प्रकटीकरणात नवी मुंबई पोलिसांनी राज्यात आपला ठसा उमटवला आहे; परंतु पकडलेले गुन्हेगार अथवा संशयित शिक्षेपर्यंत पोहोचत नसल्याने पोलिसांची नाचक्की होत आहे. त्यामुळे गुन्हा उघड झाल्यानंतर आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केल्यापासून ते दोष सिद्ध होईपर्यंत पोलिसांची कसोटी पणाला लागत आहे. याबाबत पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी गतवर्षाच्या सुरुवातीलाच चिंता व्यक्त करत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार २०१८ च्या तुलनेत अवघी तीन टक्क्यांनी वाढ होऊन गतवर्षात २५.३६ टक्के दोषसिद्ध होऊ शकले आहेत. त्यावरून नवी मुंबई पोलिसांपुढे दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्याचे आव्हान दिसून येत आहे.

पोलिस तपासातील त्रुटी दूर करण्यासह भक्कम साक्षीदार व सबळ पुरावे गोळा करण्यात सुसूत्रता आणण्याची गरज व्यक्त होत आहे. गतवर्षात न्यायालयात लागलेल्या निकालांपैकी हत्येच्या २५ गुन्ह्यांचाही समावेश आहे. दोषारोपपत्र सादर केलेल्या २५ पैकी अवघ्या आठ गुन्ह्यांतील आरोपींवरील दोष सिद्ध होऊ शकले. तर हत्येच्या प्रयत्नाच्या १६ पैकी फक्त सहा गुन्ह्यांतील आरोपी शिक्षेपर्यंत पोहोचू शकले आहेत. पोक्सो अंतर्गतच्या गुन्ह्यांच्या बाबतीतही हेच पाहायला मिळत आहे. पोक्सोच्या ३७६ कलमांतर्गत दाखल ३६ गुन्ह्यांपैकी केवळ १४ गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा लागलेली आहे. तर ३५४ व ३६३ कलमांतर्गतच्या ३० पैकी १३ गुन्हे न्यायालयात सिद्ध होऊन उर्वरित गुन्ह्यात अटक असलेल्यांची सुटका झाली आहे. तर बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये खोटी तक्रार अथवा साक्षीदार पलटल्याने न्यायालयात गुन्हा सिद्ध न झाल्याचाही परिणाम पोलिसांच्या दोषसिद्धी प्रमाणावर झाला आहे. गतवर्षात बलात्काराच्या १७ गुन्ह्यांपैकी १६ गुन्ह्यांचा खटला न्यायालयात चालला. त्यामधील सात गुन्ह्यांतील फिर्यादींनी न्यायालयात पलटी मारली, तर सात गुन्ह्यांत दोघांच्या संमतीने शरीरसंबंध झाल्याचे न्यायालयात समोर आले. त्यामुळे गतवर्षात बलात्काराचा एकही गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊ शकलेला नाही.