शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

राष्ट्रीय हरित लवादाचा सीईटीपीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:02 IST

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी प्रक्रिया न करताच, कासाडी नदीमध्ये सोडले जात आहे. यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. याविषयी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती.

- वैभव गायकर पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी प्रक्रिया न करताच, कासाडी नदीमध्ये सोडले जात आहे. यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. याविषयी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. लवादाने वस्तुस्थिती पाहून, कासाडी नदीमध्ये होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा ठपका सीईटीपी प्रशासनावर ठेवला असून, ५ कोटी रुपये दंड सुनावला आहे.तळोजा औद्योगिक वसाहत ९०७ हेक्टर परिसरात वसलेली आहे. या औद्योगिक वसाहतीत एकूण ९३७ लहान-मोठे कारखाने आहेत. औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली असली, तरी या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सायंकाळ होताच या परिसरात उग्र वास सुटतो. या ठिकाणच्या कारखान्यांमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर येथील सीईटीपी प्रकल्पात प्रक्रिया होणे गरजेचे असतानादेखील थेट नदीत हे दूषित सांडपाणी सोडले जात असल्याने, येथील कासाडी व घोटनदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एमआयडीसीमधील सांडपाण्यावर प्रक्रि या करण्यासाठी सीईटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे; परंतु २२ एमएलडी क्षमतेच्या या प्रकल्पामध्ये पूर्ण औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. परिणामी, प्रक्रिया न करता हे पाणी कासाडी नदीत सोडण्यात येत असे. या महत्त्वाच्या कारणांमुळेच नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी २६ नोव्हेंबर २०१७ रोजी राष्ट्रीय हरित लवादाकडे या संपूर्ण प्रकरणी धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेत कासाडी नदी प्रदूषणाच्या विविध केलेल्या चाचण्या, सीईटीपी प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त सांडपाण्यावर प्रक्रि या, हवाप्रदूषण यांसारखे तथ्य न्यायालसमोर सादर केले. या सर्व पुराव्यांच्या आधारे हरित लावादाने केंद्रीय व राज्य कमिटीला तळोजा औद्योगिक वसाहतीत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. हरित लवादाच्या पुणे या ठिकाणी चाललेले हे प्रकरण नंतर दिल्ली बेंचकडे वर्ग करण्यात आले. ११ एप्रिल रोजी यासंदर्भात सुनावणी सुरू असताना सीईटीपीमार्फत हे प्रदूषण रोखण्यासाठी काहीच उपाययोजना राबविली नसल्याने न्यायालयाने सीईटीपी प्रशासनाला सुमारे ५ कोटींचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे, हा दंड एका महिन्यात भरण्याचे हे आदेश देण्यात आले असून, प्रत्येक दहा दिवसांनी प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना राबविल्या आहेत, यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अ‍ॅड. चेतन नागरे यांनी दिली.

तळोजा औद्योगिक वसाहतीत होत असलेल्या प्रदूषणाची दखल न्यायालयाने घेतली आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायालयाने दिलेले आदेश हे माझ्या लढ्याला बळ देणारे आहेत. धोक्यात आलेले कासाडी नदीचे पुनरुज्जीवन करायचे आहे.- अरविंद म्हात्रे, हरित लवादाकडे दाखल केलेले याचिकाकर्तेसीईटीपीमार्फत प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याच ठोस उपाययोजना राबविण्यात आलेल्या नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे, म्हणनूच न्यायालयाने पाच कोटींचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे, दहा दिवसांनी काय उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत, यासंदर्भातही अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.- अ‍ॅड. चेतन नागरे,याचिकाकर्ते, वकीलसीईटीपीला ठोठावण्यात आलेल्या दंडाबद्दल अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.- बी. टी. अहिरे, सीईटीपी, प्रशासक