शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पालिकेची विहिरींमधल्या पाणीवापरावर बंदी

By admin | Updated: April 2, 2016 03:01 IST

पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने शहरातील विहिरींमधील पाणीवापरावर बंदी घातली आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील

नवी मुंबई : पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने शहरातील विहिरींमधील पाणीवापरावर बंदी घातली आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील पाणी बांधकामासाठी वापरले जाते. मात्र दुसरीकडे शहरातील तलावांचे पाणी बांधकामासाठी वापरण्यास अनुमती देण्यात आली आहे.शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवणाऱ्या महापालिकेला सध्या पाणीपुरवठ्यात हात आखडता घेण्याची वेळ आली आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असूनही त्यामधील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवावे लागत आहे. त्याकरिता पाणीपुरवठाही मर्यादित करण्यात आला आहे. अशातच शहरातल्या पालिकेच्या ताब्यातील विहिरींमधून उपसले जाणारे पाणी देखील पालिकेच्या नजरेत आले आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील पाणी टँकर व्यवसायिकांमार्फत बांधकामांना पुरवले जात होते. याकरिता आजतागायत पालिकेची कसलीही परवागनी घेतली जात नव्हती. परंतु सध्या भेडसावत असलेल्या पाणीटंचाईमुळे विहिरींमधून होणाऱ्या पाणीचोरीलाही आळा घालण्यासाठी पाऊल पालिकेने उचलले आहे. ज्या विहिरींमधून पाण्याचा उपसा केला जात होता त्या ठिकाणी टँकरने पाणी भरण्यास बंदी घातली आहे. तशा प्रकारचे सूचना फलक देखील पालिकेतर्फे विहिरींच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.दुसरीकडे मात्र बांधकामासाठी तलावांमधील पाणी टँकरने भरण्याची अनुमती महापालिकेने दिलेली आहे. सद्य:स्थितीमध्ये महापालिकेतर्फे तलावांच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. अशावेळी गाळ साफ करण्यासाठी तलावांमधील पाण्याचा साठा कमी होणे गरजेचे आहे. यामुळेच तलावातील पाण्याचा उपसा झाल्यानंतर गाळ काढता येणार आहे. (प्रतिनिधी)