शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची विहिरींमधल्या पाणीवापरावर बंदी

By admin | Updated: April 2, 2016 03:01 IST

पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने शहरातील विहिरींमधील पाणीवापरावर बंदी घातली आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील

नवी मुंबई : पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने शहरातील विहिरींमधील पाणीवापरावर बंदी घातली आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील पाणी बांधकामासाठी वापरले जाते. मात्र दुसरीकडे शहरातील तलावांचे पाणी बांधकामासाठी वापरण्यास अनुमती देण्यात आली आहे.शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवणाऱ्या महापालिकेला सध्या पाणीपुरवठ्यात हात आखडता घेण्याची वेळ आली आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असूनही त्यामधील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवावे लागत आहे. त्याकरिता पाणीपुरवठाही मर्यादित करण्यात आला आहे. अशातच शहरातल्या पालिकेच्या ताब्यातील विहिरींमधून उपसले जाणारे पाणी देखील पालिकेच्या नजरेत आले आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील पाणी टँकर व्यवसायिकांमार्फत बांधकामांना पुरवले जात होते. याकरिता आजतागायत पालिकेची कसलीही परवागनी घेतली जात नव्हती. परंतु सध्या भेडसावत असलेल्या पाणीटंचाईमुळे विहिरींमधून होणाऱ्या पाणीचोरीलाही आळा घालण्यासाठी पाऊल पालिकेने उचलले आहे. ज्या विहिरींमधून पाण्याचा उपसा केला जात होता त्या ठिकाणी टँकरने पाणी भरण्यास बंदी घातली आहे. तशा प्रकारचे सूचना फलक देखील पालिकेतर्फे विहिरींच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.दुसरीकडे मात्र बांधकामासाठी तलावांमधील पाणी टँकरने भरण्याची अनुमती महापालिकेने दिलेली आहे. सद्य:स्थितीमध्ये महापालिकेतर्फे तलावांच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. अशावेळी गाळ साफ करण्यासाठी तलावांमधील पाण्याचा साठा कमी होणे गरजेचे आहे. यामुळेच तलावातील पाण्याचा उपसा झाल्यानंतर गाळ काढता येणार आहे. (प्रतिनिधी)