शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची विहिरींमधल्या पाणीवापरावर बंदी

By admin | Updated: April 2, 2016 03:01 IST

पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने शहरातील विहिरींमधील पाणीवापरावर बंदी घातली आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील

नवी मुंबई : पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने शहरातील विहिरींमधील पाणीवापरावर बंदी घातली आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील पाणी बांधकामासाठी वापरले जाते. मात्र दुसरीकडे शहरातील तलावांचे पाणी बांधकामासाठी वापरण्यास अनुमती देण्यात आली आहे.शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवणाऱ्या महापालिकेला सध्या पाणीपुरवठ्यात हात आखडता घेण्याची वेळ आली आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असूनही त्यामधील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवावे लागत आहे. त्याकरिता पाणीपुरवठाही मर्यादित करण्यात आला आहे. अशातच शहरातल्या पालिकेच्या ताब्यातील विहिरींमधून उपसले जाणारे पाणी देखील पालिकेच्या नजरेत आले आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील पाणी टँकर व्यवसायिकांमार्फत बांधकामांना पुरवले जात होते. याकरिता आजतागायत पालिकेची कसलीही परवागनी घेतली जात नव्हती. परंतु सध्या भेडसावत असलेल्या पाणीटंचाईमुळे विहिरींमधून होणाऱ्या पाणीचोरीलाही आळा घालण्यासाठी पाऊल पालिकेने उचलले आहे. ज्या विहिरींमधून पाण्याचा उपसा केला जात होता त्या ठिकाणी टँकरने पाणी भरण्यास बंदी घातली आहे. तशा प्रकारचे सूचना फलक देखील पालिकेतर्फे विहिरींच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.दुसरीकडे मात्र बांधकामासाठी तलावांमधील पाणी टँकरने भरण्याची अनुमती महापालिकेने दिलेली आहे. सद्य:स्थितीमध्ये महापालिकेतर्फे तलावांच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. अशावेळी गाळ साफ करण्यासाठी तलावांमधील पाण्याचा साठा कमी होणे गरजेचे आहे. यामुळेच तलावातील पाण्याचा उपसा झाल्यानंतर गाळ काढता येणार आहे. (प्रतिनिधी)