शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

कळंबोलीत सिडकोने बांधलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:10 IST

सुविधांचा अभाव : फक्त दोनच शवदाहिनींचा वापर : नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

कळंबोली : कळंबोली वसाहतीकरिता सिडकोने बांधलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी चारपैकी दोनच शवदाहिन्या सुरू आहेत. तसेच इतर सुविधांचीही वानवा आहे. त्याच अवस्थेत सिडकोकडून महापालिकेने स्मशानभूमी अंतर्गत सेवा वर्ग करून घेतल्या आहेत. तर सिडकोने १0 कोटी विविध कामासाठी मंजुरी दिली असली तरी त्यात स्मशानभूमी वगळण्यात आली असल्याने नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

रोडपाली तलावाजवळ सिडकोने सुरुवातीला स्मशानभूमी उभारली आहे. त्या ठिकाणी शोकसभा, प्रार्थना तसेच विधी करण्याकरिता निवारा बांधण्यात आला होता. त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता या ठिकाणचा स्लॅब कधी कोसळेल याची शाश्वती देता येत नाही. त्याला लोखंडी खांबांचा टेकू देण्यात आला आहे. त्याचबरोबर भिंतीला मोठमोठे तडे सुद्धा गेले आहेत. त्यामुळे ही वास्तू धोकादायक असल्याची स्थिती आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीत चार शवदाहिन्या आहेत त्यापैकी दोनच चालू आहेत. त्यांची अवस्था फार चांगली नाही. उर्वरित दोनची दुरवस्था झाली आहे. त्या कार्यान्वित करण्याबाबत सिडकोकडून कधीच प्रयत्न झाले नाहीत. मात्र, जेव्हा एकाच वेळी जास्त मृतदेह येतात त्यावेळी दगडांचा टेकू देऊन बंद असलेल्या शवदाहिन्यांमध्ये अंत्यसंस्कार करावे लागतात. या ठिकाणी पाणी साठवणूक करण्याकरिता जास्त क्षमतेचे जलकुंभ नाही त्यामुळे पाणीटंचाईलासुद्धा सामोरे जावे लागते. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना बसण्यासाठी जो निवारा आहे त्याचीही दुरवस्था झालेली आहे. पावसाळ्यात तर त्याला गळती लागते, त्यामुळे स्मशानात काम करणाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. स्मशानभूमीत गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या आठवड्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली.

नूतनीकरणाचा प्रस्ताव रेंगाळलाकळंबोली स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार होता. याकरिता निधीसुद्धा मंजूर झाला होता. त्याचबरोबर मे महिन्यात सिडकोने विविध कामाकरिता १0 कोटी मंजुरी दिली आहे; परंतु त्यात स्मशानभूमी वगळण्यात आली आहे.महापालिका स्थापन झाल्यानंतर सिडकोने आखडता हात घेतला असल्याचे मत येथील रहिवासी आत्माराम कदम यांनी व्यक्त केले. खारघरला विद्युत शवदाहिनी असताना कळंबोलीला का नाही, असा सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे.स्मशानभूमीत लाकडेच नाहीतसिडकोने या ठिकाणची देखभाल करणे, तसेच लाकडे पुरविण्याकरिता एका एजन्सीची नियुक्ती केली होती. प्रतिकिलो सात रुपये दराने ठेकेदार अंत्यविधीकरिता लाकडे उपलब्ध करून देत होता; पण महापालिकेकडे स्मशानभूमीमधील सेवा दिल्यामुळे या ठिकाणी ठेकेदार नेमला नाही, त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. 

स्मशानभूमी हस्तांतरित झाली नसली तरी आतमधील सेवा महापालिका पुरवते. त्यांचे कामगार तिथे काम करीत आहेत. लाकडे पुरविण्याकरिता मनपानेच ठेकेदार नेमणे क्र मप्राप्त आहे, तसेच विविध कामासाठी सिडकोने १0 कोटी मंजुरी दिली असली तरी त्यात स्मशानभूमीचे काम करण्यात येणार नसून त्यासाठी वेगळ्या बजेटची मागणी करण्यात आली आहे.- गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता, सिडको, कळंबोली