शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

गांजाच्या अड्ड्यांना पालिकेसह सिडकोचेही अभय

By admin | Updated: September 29, 2016 03:33 IST

पोलिसांनी अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेला सिडको व महापालिकेकडून खीळ बसू लागली आहे. वर्षानुवर्षे अमली पदार्थांची विक्री

- नामदेव मोरे, नवी मुंबई

पोलिसांनी अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेला सिडको व महापालिकेकडून खीळ बसू लागली आहे. वर्षानुवर्षे अमली पदार्थांची विक्री होत असलेल्या झोपड्यांवर संबंधित प्रशासनाकडून कारवाईच होत नाही. प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई करणारे प्रशासन अवैध व्यवसाय होत असल्याचे उघड होवूनही त्या झोपड्यांवर कारवाई करत नसल्याने रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एपीएमसी पोलिसांनी २६ सप्टेंबरला उत्तर प्रदेश कोल्ड स्टोरेजच्या बाजूला असलेल्या झोपडीमधून शांती सुंदरम पिल्लईला अटक केली. तिच्याकडे ६८०ग्रॅम गांजा व रोख रक्कम सापडली. अनेक वर्षांपासून या झोपडीमध्ये शांती व गांजामाफिया अशोक पांडे यांचा अड्डा सुरू आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधील सर्वाधिक गांजा विक्री होणाऱ्या अड्ड्यांमध्ये त्या ठिकाणाचाही समावेश आहे. पांडेवर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. अनधिकृत झोपडीमध्ये हा अड्डा सुरू आहे. सार्वजनिक वापराच्या जागेमध्ये अतिक्रमण करून पहिली एक झोपडी बांधण्यात आली होती. आता तेथे तीन झोपड्या तयार झाल्या आहेत. गुन्हेगारी कारवायांसाठी वापर होत असलेल्या या झोपड्यांवर पालिका काहीही कारवाई करत नाही. एपीएमसीच्या मसाला मार्केटबाहेर पदपथावर झोपडी बांधून तेथेच गांजाची चार झाडे लावणाऱ्या परप्रांतीयालाही पोलिसांनी अटक केली. परंतु त्या झोपडीवर कारवाई झालेली नाही. धान्य मार्केटच्या बाहेर पणन मंडळाच्या कोल्डस्टोरेजजवळील झोपडपट्टीमध्येही गांजाचा अड्डा सुरू आहे. तेथे आतापर्यंत सहा ते सात जणांना अटक केली आहे. वारली पाडा येथील अनधिकृत झोपडीमध्ये गांजाचा व्यवसाय सुरू असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. याशिवाय नेरूळमध्ये बालाजी टेकडीच्या पायथ्याशीही असणाऱ्या झोपडपट्टीत दोन ठिकाणी गांजा विक्री होते. नागरिकांच्या येण्या-जाण्याच्या रोडजवळ अतिक्रमण करून झोपडी उभारली असूनही प्रशासन डोळेझाक करत आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी सीबीडी बेलापूरमधील टाटानगर झोपडपट्टीमध्ये जवळपास एक किलो गांजा जप्त करून एका आरोपीस अटक केली होती. हा अड्डाही अनधिकृत झोपड्यांमध्येच सुरू होता. गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री करणारे माफिया गरीब महिला व परप्रांतीयांना गांजा विक्रीसाठी प्रवृत्त करत आहेत. नेरूळ, इंदिरानगर, बोनसरी, वारलीपाडा, एपीएमसी, सीबीडी व इतर अनेक ठिकाणी झोपडपट्टीमधील अड्ड्यांमुळे परिसरात राहणाऱ्या इतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी करूनही काहीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. ‘वॉक वुईथ कमिशनर’मध्ये तक्रार नेरूळमधील ज्वेल आॅफ नवी मुंबई येथे २४ जुलैला ‘वॉक वुईथ कमिशनर’ अभियान होते. तेव्हा बालाजी टेकडीच्या खाली असलेल्या दोन झोपड्यांमध्ये गांजा विक्री होत आहे. तेथे गांजा खरेदीसाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गर्दुल्ल्यांचा वावर असतो. भांडणे होत असल्याने झोपड्यांवर कारवाई करण्याची व गांजा विक्रीचे अड्डे बंद करण्याची लेखी मागणी केली होती. दोन महिने झाल्यानंतरही अद्याप त्या दोन्हीही झोपड्यांवर कारवाई झालेली नाही. बिनधास्तपणे तेथे गांजा विक्री होत आहे. फक्त पोलिसांची जबाबदारी नाहीअमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्याची जबाबदारी फक्त पोलिसांचीच नाही. सिडको, महापालिका, एमआयडीसी, एपीएमसी यांनी त्यांच्या जमिनीवर अवैध व्यवसाय होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. नागरिकांनीही कुठे अवैध व्यवसाय होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देवून ते अड्डे बंद करण्यासाठी शक्य ती मदत केली पाहिजे. अमली पदार्थांमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होवू नये यासाठी सर्व नवी मुंबईकरांनी या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे. प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरच हातोडा नेरूळमध्ये ज्या ठिकाणी गांजा विक्री होते त्या परिसरात दोन वर्षात चार वेळा कारवाई झाली आहे. येथील गरजेपोटी बांधलेल्या इमारतीही पाडल्या आहेत. परंतु जिथे गांजा विक्री होते त्या झोपडीवर मात्र अद्याप कधीच कारवाई झालेली नाही. भूमिपुत्रांच्या घरांवर हातोडा चालविणारे सिडको व पालिका प्रशासन अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या अनधिकृत झोपड्यांवर का कारवाई करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.