शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

गांजाच्या अड्ड्यांना पालिकेसह सिडकोचेही अभय

By admin | Updated: September 29, 2016 03:33 IST

पोलिसांनी अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेला सिडको व महापालिकेकडून खीळ बसू लागली आहे. वर्षानुवर्षे अमली पदार्थांची विक्री

- नामदेव मोरे, नवी मुंबई

पोलिसांनी अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेला सिडको व महापालिकेकडून खीळ बसू लागली आहे. वर्षानुवर्षे अमली पदार्थांची विक्री होत असलेल्या झोपड्यांवर संबंधित प्रशासनाकडून कारवाईच होत नाही. प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई करणारे प्रशासन अवैध व्यवसाय होत असल्याचे उघड होवूनही त्या झोपड्यांवर कारवाई करत नसल्याने रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एपीएमसी पोलिसांनी २६ सप्टेंबरला उत्तर प्रदेश कोल्ड स्टोरेजच्या बाजूला असलेल्या झोपडीमधून शांती सुंदरम पिल्लईला अटक केली. तिच्याकडे ६८०ग्रॅम गांजा व रोख रक्कम सापडली. अनेक वर्षांपासून या झोपडीमध्ये शांती व गांजामाफिया अशोक पांडे यांचा अड्डा सुरू आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधील सर्वाधिक गांजा विक्री होणाऱ्या अड्ड्यांमध्ये त्या ठिकाणाचाही समावेश आहे. पांडेवर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. अनधिकृत झोपडीमध्ये हा अड्डा सुरू आहे. सार्वजनिक वापराच्या जागेमध्ये अतिक्रमण करून पहिली एक झोपडी बांधण्यात आली होती. आता तेथे तीन झोपड्या तयार झाल्या आहेत. गुन्हेगारी कारवायांसाठी वापर होत असलेल्या या झोपड्यांवर पालिका काहीही कारवाई करत नाही. एपीएमसीच्या मसाला मार्केटबाहेर पदपथावर झोपडी बांधून तेथेच गांजाची चार झाडे लावणाऱ्या परप्रांतीयालाही पोलिसांनी अटक केली. परंतु त्या झोपडीवर कारवाई झालेली नाही. धान्य मार्केटच्या बाहेर पणन मंडळाच्या कोल्डस्टोरेजजवळील झोपडपट्टीमध्येही गांजाचा अड्डा सुरू आहे. तेथे आतापर्यंत सहा ते सात जणांना अटक केली आहे. वारली पाडा येथील अनधिकृत झोपडीमध्ये गांजाचा व्यवसाय सुरू असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. याशिवाय नेरूळमध्ये बालाजी टेकडीच्या पायथ्याशीही असणाऱ्या झोपडपट्टीत दोन ठिकाणी गांजा विक्री होते. नागरिकांच्या येण्या-जाण्याच्या रोडजवळ अतिक्रमण करून झोपडी उभारली असूनही प्रशासन डोळेझाक करत आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी सीबीडी बेलापूरमधील टाटानगर झोपडपट्टीमध्ये जवळपास एक किलो गांजा जप्त करून एका आरोपीस अटक केली होती. हा अड्डाही अनधिकृत झोपड्यांमध्येच सुरू होता. गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री करणारे माफिया गरीब महिला व परप्रांतीयांना गांजा विक्रीसाठी प्रवृत्त करत आहेत. नेरूळ, इंदिरानगर, बोनसरी, वारलीपाडा, एपीएमसी, सीबीडी व इतर अनेक ठिकाणी झोपडपट्टीमधील अड्ड्यांमुळे परिसरात राहणाऱ्या इतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी करूनही काहीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. ‘वॉक वुईथ कमिशनर’मध्ये तक्रार नेरूळमधील ज्वेल आॅफ नवी मुंबई येथे २४ जुलैला ‘वॉक वुईथ कमिशनर’ अभियान होते. तेव्हा बालाजी टेकडीच्या खाली असलेल्या दोन झोपड्यांमध्ये गांजा विक्री होत आहे. तेथे गांजा खरेदीसाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गर्दुल्ल्यांचा वावर असतो. भांडणे होत असल्याने झोपड्यांवर कारवाई करण्याची व गांजा विक्रीचे अड्डे बंद करण्याची लेखी मागणी केली होती. दोन महिने झाल्यानंतरही अद्याप त्या दोन्हीही झोपड्यांवर कारवाई झालेली नाही. बिनधास्तपणे तेथे गांजा विक्री होत आहे. फक्त पोलिसांची जबाबदारी नाहीअमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्याची जबाबदारी फक्त पोलिसांचीच नाही. सिडको, महापालिका, एमआयडीसी, एपीएमसी यांनी त्यांच्या जमिनीवर अवैध व्यवसाय होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. नागरिकांनीही कुठे अवैध व्यवसाय होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देवून ते अड्डे बंद करण्यासाठी शक्य ती मदत केली पाहिजे. अमली पदार्थांमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होवू नये यासाठी सर्व नवी मुंबईकरांनी या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे. प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरच हातोडा नेरूळमध्ये ज्या ठिकाणी गांजा विक्री होते त्या परिसरात दोन वर्षात चार वेळा कारवाई झाली आहे. येथील गरजेपोटी बांधलेल्या इमारतीही पाडल्या आहेत. परंतु जिथे गांजा विक्री होते त्या झोपडीवर मात्र अद्याप कधीच कारवाई झालेली नाही. भूमिपुत्रांच्या घरांवर हातोडा चालविणारे सिडको व पालिका प्रशासन अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या अनधिकृत झोपड्यांवर का कारवाई करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.