शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शहराबाहेरील मृतदेह आणल्याने स्मशानभूमीला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:58 IST

सारसोळे ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

- अनंत पाटील नवी मुंबई : महापालिकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांचा पूर्वीपासून विरोध आहे. असे असतानाही खालापूर येथून एका मृतदेह सारसोळे येथील महापालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आणल्यामुळे संतप्त झालेल्या सारसोळे ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी थेट या स्मशानभूमीलाच टाळे ठोकले. मात्र काही वेळाने मृतदेह माघारी पाठविण्यात आल्याने ग्रामस्थांनी स्मशानभूमीचे टाळे उघडले. या प्रकरणी ग्रामस्थांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा नेरूळ येथील तेरणा रुग्णालयात गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, मृताच्या नातेवाइकांनी मृतदेह खालापूरला न नेता तो सारसोळे गावच्या स्मशानभूमीत आणला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शविला. तसेच कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी मृतदेह जाळण्याच्या प्रकाराबाबत जोरदार आक्षेप घेत या स्मशानभूमीला टाळे ठोकले.महापालिका व खासगी रुग्णालयाकडून कोरोनाग्रस्त मृतदेहांना नेरूळ सेक्टर ४ मधील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पाठविले जाते. यासंदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वीसुद्धा आक्षेप नोंदविला होता. गुरुवारी असाच प्रकार घडल्याने अखेर संतप्त युवकांनी स्मशानभूमीलाच टाळे ठोकले. परंतु काही ज्येष्ठ ग्रामस्थांच्या मध्यस्थीने स्मशानभूमीचे टाळे काढण्यात आले. तथापि यापुढे बाहेरील कोणत्याही भागातील कोरोनाग्रस्त मृतदेह सारसोळे स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी आणला तर तो मृतदेह महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांच्या टेबलावर नेवून ठेवला जाईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने मनोज यशवंत मेहेर यांनी दिला आहे.बुधवारी मध्यरात्री मुंबई येथील एका कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहावर अंत्यविधी न करता सारसोळेच्या ग्रामस्थांनी परत पाठवून दिला होता. गुरुवारी सकाळी अंत्यविधीसाठी खालापूर येथील एका कोरोनाग्रस्ताचा मृतदेह सारसोळे स्मशानभूमीत आणला जाणार असल्याचे समजताच सारसोळेच्या युवकांच्या संतापाचा उद्रेक झाला. मनोज मेहेर, नीलेश तांडेल, विशाल मेहेर, प्रतीक तांडेल, गणेश यांच्यासह अन्य युवकांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली व थेट सारसोळे स्मशानभूमीलाच टाळे ठोकत फोटो महापालिका अधिकाऱ्यांना पाठवून दिले. नवी मुंबईत सर्वत्र स्मशानभूमी असताना सारसोळेच्याच स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त अंत्यविधीसाठी पालिका व हॉस्पिटलकडून का पाठवितात, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.सारसोळे गावातील स्मशानभूमीत कोरोनाचा खालापूर येथील मृतदेह आणल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी टाळे ठोकल्याचा प्रकार खरा आहे. पण ग्रामस्थांनी आता टाळे उघडून स्मशानभूमीचे प्रवेशद्वार खुले केले आहे. गुरुवारी या स्मशानभूमीत एकूण सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.- दत्तात्रय नागरे, प्रभारी सहायक आयुक्त, नेरूळ विभाग