शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनपूर्वक पिकवा भात

By admin | Updated: May 12, 2016 02:00 IST

देशातील बहुतांश नागरिकांचे जेवण भाताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तर महाराष्ट्रातील कोकणासह आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, आसाम, आदी राज्यांतील नागरिकांचे मुख्य अन्नच भात आहे

पालघर: देशातील बहुतांश नागरिकांचे जेवण भाताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तर महाराष्ट्रातील कोकणासह आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, आसाम, आदी राज्यांतील नागरिकांचे मुख्य अन्नच भात आहे. त्यामुळे देशात भाताचे पीक मोठयÞा प्रमाणात घेतले जाते. याला आपला पालघर जिल्हाही अपवाद नाही. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मोठयÞा प्रमाणात पाऊस पडणार्?या भागात भाताचे पीक मोठयÞा प्रमाणात घेतले जाते. भाताच्या उत्पादनाच्या प्रदेशानुसार व तेथील पावसाच्या प्रमाणानुसार विविध पद्धती आहेत. सध्या जिल्ह्यात भातशेतीच्या मशागतीची तयारी सुरू आहे. योग्य नियोजन, पाण्याची उपलब्धता आण ितण, कीड नियंत्रण केल्यास भाताचे विक्रमी उत्पादन काढणे शक्य आहे. भात लावणीचे प्रचलित तीन प्रकार आहेत.लावणी पद्धत : ज्या विभागात १,५०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो अशा कोकण आणि विदर्भातील नागपूर विभागात प्रामुख्याने लावणी पद्धतीने भात पीक घेतले जाते. तेथे भात रोपे रोपवाटिकेत तयार करून लहान लहान वाफे करून बैलांच्या अथवा छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखलणी केली जाते. रोपे पुरेशी उंच आल्यावर लावणी केली जाते. या पद्धतीमध्ये वाफ्यात पाणी तुंबून रहात असल्याने अधिक पाणी लागणारे इंद्रायणी, बासमती यासारख्या (पाणबुडी) भाताच्या जाती लावल्या जातात. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, पन्हाळा तालुक्यांतील काही भागात लावणी पद्धत वापरली जाते.पेरणी पद्धती : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील १५०० मि. मी. पेक्षा कमी पाऊसमान असणार्?या प्रदेशात पेरभात व टोकन पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीमध्ये जमीन नांगरल्यानंतर कुळवाच्या चार ते पाच पाळ्या देऊन जमिनीची चांगली मशागत करावी लागते. पाऊस पडण्यापूर्वी धूळवाफ पद्धतीने किंवा पाऊस पडल्यानंतर वापशावर कुरीने दोन ओळींतील अंतर २० ते २२.५ सें.मी. ठेवून पेरणी केली जाते. टोकण पद्धत : कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात ही पद्धत यशस्वी झाली आहे. जमिनीचा पोत पाहून त्याप्रमाणे गरव्या व निमगरव्या जाती २० बाय १५ सें.मी. आणि हळव्या जाती १५ बाय १५ सें.मी. अंतरावर व एका ठिकाणी २ ते ३ दाण्यांची टोकण करतात. या पद्धतीमध्ये जमिनीची उत्तम मशागत करावी लागते. त्यानंतर दोरीने अथवा तिकाटन्याने उभ्या आडव्या रेषा मारून फुलीवर दाणे पेरावेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात पेरणी व टोकण पद्धत वापरली जाते.आंतरमशागत : भात लावणीनंतर १५ दिवसांनी निंदणी करून तण काढून टाकावे. पिकाची स्थिती आण ितणांची तीव्रता यानुसार दर १५ दिवसांनी निंदणी अथवा कोळपणी पीक पोटरीत येईपर्यंत करावी. लावणीनंतर भात खाचरांमध्ये सतत ५ ते ६ सें.मी. पाण्याची उंची ठेवल्यास तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होते.तणनाशक : तणनाशके वापरूनसुद्धा तणाचा बंदोबस्त करता येते. त्यासाठी ब्युटाक्लोर ५० ई.सी. किंवा बेन्थिओकार्ब ५० ई. सी. यापैकी कोणतेही एक तणनाशक वापरावे. लावणीनंतर सहा दिवसांच्या आत वरीलपैकी कोणतेही तणनाशक हेक्टरी तीन लिटर, ५०० मि.ली. पाण्यातून फवारावे. फवारणी करण्याच्या अगोदर शेतीतील सर्व पाणी काढून टाकावे व नंतर २४ तासांनी खाचरात पुन्हा पाणी भरावे.खते : पेरणीच्या वेळी २० टक्के नत्र, स्फुरद व पालाश द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० टक्के नत्न, द्यावे. पुन्हा ३० दिवसांनी राहिलेले ३० टक्के नत्र द्यावे. बागायती पेरभातास ८०:५०:५० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावे, तर कोरडवाहू पेरभातास ६०:३०:३० किलो नत्र, स्फुरद व पालाश हेक्टरी द्यावे. नत्नाची ५० टक्के मात्र, पूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी व राहिलेले ?0 टक्के नत्र फुटवे येण्याच्या वेळी द्यावे.पाणी व्यवस्थापन : शेतात २ ते ५ से.मी. उंची इतके पाणी ठेवावे. ही पातळी लावणी केलेली रोपे चांगली मुळे चिक धरेपर्यंत ठेवावी. त्यानंतर पिकातील दाण्यात चिक भरेपर्यंत पाण्याची पातळी ५ सें. मी. ठेवावी. वारंवार पाणीपुरवठा व निचरा यांची सोय करावी. लोंब्या येण्यापूर्वी १० दिवस आणि लोंब्या आल्यानंतर १० दिवसांपर्यंत शेतातील पाण्याची पातळी १० सें.मी. ठेवावी. त्यानंतर पाण्याची पातळी कमी करावी. भात दाणे व्यविस्थत आणि एकाच वेळी भरावा, पिकाची कापणी व्यवस्थित व्हावी, यासाठी कापणीपूर्वी १० दिवस अगोदर पिकातील पाणी काढावे.दापोग : फिलीपाइन्स व जपानमध्ये रोपे तयार करण्याची लोकप्रिय असलेली दापोग ही नवीन पद्धत आहे. या पद्धतीने रोपे तयार करून वर्षातून तीनवेळा पिके घेता येतात. दापोग वाफा अंगणात, ओसरीवर, परसात, गच्चीवर, लाकडी पलंगावर, टेबलावर, फळ्यांवर सोयीनुसार करता येतो. या वाफ्यात पाणी साठून राहण्यासाठी विटा किंवा लाकडी पट्टीच्या साहाय्याने वाफ्याच्या चारी बाजू ८ ते १० सें.मी. उंच करतात. वाफा तयार करण्यास प्लास्टिकचा कागद वापरतात. या वाफ्याची रु ंदी १.५ मीटर असते. लांबी सोयीनुसार ठेवावी. एक चौरस मीटर क्षेत्रासाठी ३.५ किलो बियाणे वापरतात.(प्रतिनिधी)