शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बंद दगडखाणीच्या जागेवर डांबर प्लांट

By admin | Updated: January 4, 2016 02:12 IST

तुर्भे नाक्यावरील संजीवन क्वॉरीच्या जागेवर पाच वर्षांपासून डांबर प्लांट सुरू झाला आहे. महापालिका व एमआयडीसीने पाणीपुरवठा दिलेला नसताना व कंपनीच्या नावाने

नामदेव मोरे,  नवी मुंबईतुर्भे नाक्यावरील संजीवन क्वॉरीच्या जागेवर पाच वर्षांपासून डांबर प्लांट सुरू झाला आहे. महापालिका व एमआयडीसीने पाणीपुरवठा दिलेला नसताना व कंपनीच्या नावाने अधिकृत वीजजोडणी नसूनही हा प्रकल्प सुरू आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नोटीसनंतरही दोन्ही प्रशासनांनी अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. नवी मुंबई परिसरात सुरू झालेल्या विकासकामांना दगड, खडी सहज उपलब्ध व्हावी, यासाठी सिडको व जिल्हाधिकारी कार्यालयाने दिघा ते नेरूळपर्यंत दगडखाणींना परवानगी दिली आहे. तुर्भे नाका फायझर कंपनीला लागून संजीवन कन्स्ट्रक्शन कंपनीला दगडखाणीसाठी जागा दिली होती. मागील काही वर्षांपासून ही कंपनी बंद आहे. परंतु जवळपास २०१० पासून या जागेवर लिंटेच इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने डांबर बनविण्याचा प्लांट उभा केला आहे. वास्तविक दगडखाणीची जागा इतर व्यवसायासाठी वापरता येत नाही. ही लागा भाडेतत्त्वावरही देता येत नाही. असे असताना संजीवन कंपनीचे प्रमुख जयप्रकाश जगताप यांनी संबंधित कंपनीशी भागीदारीचा करार केला आहे. वास्तविक मूळ जागामालक जगताप असताना त्यांची भागीदारी फक्त १ टक्के आहे व लिंटेच इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची भागीदारी ९९ टक्के आहे. आर्थिक व्यवहाराचे पूर्ण अधिकार लिंटेचलाच देण्यात आले आहेत. कंपनीविषयी काहीही प्रकरण झाल्यास त्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. वास्तविक दगडखाणीची जागा ही संबंधित व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिलेली असते. दगडखाणी संपल्यानंतर ती पुन्हा शासनाच्या हवाली करणे आवश्यक आहे. परंतू संजीवन कंपनीची दगडखाण बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या कंपनीशी भागीदारीत डांबर प्लांट टाकण्यात आला आहे. लिंटेच व इतर कंपन्यांमुळे या परिसरातील प्रदूषण वाढू लागले आहे. याविषयी आदर्श सेवाभागी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, एमआयडीसी, जिल्हा अधिकारी कार्यालय, महावितरणकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु कोणीच संबंधितांवर कारवाई करीत नाही. गट नंबर ३७७ वर ही कंपनी सुरू करण्यात आली आहे. एमआयडीसीकडे याविषयी माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की ही जागा १४ आॅक्टोंबर १९७४ मध्ये एमआयडीसीने ताब्यात घेतली आहे. त्यावर सद्य:स्थितीमध्ये एमआयडीसीचा ताबा असून तिचे वाटप कोणत्याही एजन्सीला केलेले नाही. कोणत्याही कंपनीला जागा दिलेली नसल्याने त्यांना नळजोडणी देण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जागेवर मालकी हक्क दाखविणाऱ्या एमआयडीसीने अद्याप या ठिकाणी असलेला प्लांट कसा सुरू झाला व आतापर्यंत त्यांनी पाणी कोठून वापरले, याविषयी साधी विचारपूसही केलेली नाही. महापालिका व एमआयडीसी प्रशासन येथील अतिक्रमणावरही काहीच कार्यवाही केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तक्रारदाराच्या जीवाला धोकातुर्भे नाक्यावरील डांबर, सिमेंट प्लांटमुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. महावितरणने वीजपुरवठा दिलेला नसताना व एमआयडीसीसह पालिकेने पाणी दिलेले नसताना प्लांट सुरू असून, याविषयी शिवाजी जाधव यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, एमआयडीसी व जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत. यामुळे काही समाजकंटकांकडून त्यांना धमकावले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यामुळे जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली असून, याविषयी पोलीस आयुक्तांसह राज्य शासनाकडे अर्ज देणार असल्याचेही सांगितले आहे.