शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडांची वाटपपत्रे घेण्याचे प्रकल्पग्रस्तांना आवाहन

By admin | Updated: May 18, 2017 03:43 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांना पुनर्वसन व पुन:स्थापना धोरणांतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचे निवाडे तथा वाटपपत्रे देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांना पुनर्वसन व पुन:स्थापना धोरणांतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचे निवाडे तथा वाटपपत्रे देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु या मोहिमेला प्रकल्पग्रस्तांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. कारण गेल्या तीन दिवसांत जेमतेम ५0 ते ५५ प्रकल्पग्रस्तांनी वाटपपत्रे घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी तातडीने आपल्या भूखंडांची वाटपपत्रे घ्यावीत, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्रातील ९ गावांतील जमिनी अधिसूचित करून त्या संपादित करण्यात आल्या आहेत. त्याबदल्यात येथील प्रकल्पग्रस्तांना सोडतीद्वारे पर्यायी जागांचे वाटप करण्यात आले आहे. पुनर्वसन आणि पुन:स्थापना धोरणांतर्गत देण्यात आलेल्या भूखंडांचे निवाडे तथा वाटपपत्रे वितरित करण्यासाठी १५ ते १९ मे या दरम्यान विशेष कॅम्प सुरू करण्यात आले आहेत. बुधवारी या उपक्रमाचा तिसरा दिवस होता. या तीन दिवसांत जेमतेम ५0 ते ५५ प्रकल्पग्रस्तांनीच भूखंडांची वाटपपत्रे घेतल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी बुधवारी पनवेल येथील मेट्रो सेंटरला भेट देवून विशेष कॅम्पच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रक्रियेची पाहणी केली. प्रकल्पग्रस्तांची गैरसोय टाळण्यासाठी हे कॅम्प सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी पुढाकार घेवून आपल्या भूखंडांची वाटपपत्रे स्वीकारावीत, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. या विशेष कॅम्पची मुदत १९ मे रोजी संपत असली तरी प्रकल्पग्रस्तांच्या सोयीसाठी यात आणखी वाढ करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ..अन्यथा वाटपपत्रे न्यायालयात होतील जमाविमानतळबाधितांना जवळपास ४५00 निवाडे तथा भूखंडांची वाटपपत्रे वितरित केली जाणार आहेत. त्यासाठी सध्या पाच दिवसांचा विशेष कॅम्प सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या सोयीसाठी या प्रक्रियेची कालमर्यादा वाढविली जाणार आहे. परंतु वेळोवेळी संधी देवूनही प्रतिसाद न देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची वाटपपत्रे न्यायालयात जमा करण्याच्या दृष्टीने सिडको विचार करीत असल्याचे समजते. एकूणच वेळोवेळी दिलेल्या मुदतीत भूखंडांची वाटपपत्रे न घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना अंतिम मुदतीनंतर न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत.