शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: May 7, 2017 06:11 IST

स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून चेन्नईतील अमराठी कामगार भरती करणाऱ्या भारत मुंबई कंटेनर (सिंगापूर) पोर्टचे सीईओ सुरेश अमिरो

मधूकर ठाकूर/ लोकमत न्यूज नेटवर्कउरण : स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून चेन्नईतील अमराठी कामगार भरती करणाऱ्या भारत मुंबई कंटेनर (सिंगापूर) पोर्टचे सीईओ सुरेश अमिरो यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत, शनिवारी जसखार गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. जसखार गावातील पात्रताधारक प्रकल्पग्रस्तांना मुलाखतीशिवाय नोकऱ्यांमध्ये तत्काळ सामावून न घेतल्यास, जसखार गावाच्या हद्दीत सुरू असलेली सिंगापूर पोर्टची कामे बंद पाडून १५ मेपासून प्रकल्पाच्या कार्यालयासमोरच लाक्षणिक उपोषणाचा इशारा जसखार गाव संघर्ष समितीच्या वतीने ग्रामस्थांनी दिला आहे.जेएनपीटीच्या माध्यमातून सर्वात मोठ्या लांबीच्या आणि ५० लाखांपेक्षा अधिक कंटेनर हाताळणी होणाऱ्या भारत मुंबई कंटेनर (सिंगापूर) पोर्ट उभारण्याच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र, जसखार गावाच्या हद्दीतून या अत्याधुनिक बंदराचे दोन रस्ते बांधण्याला सुरुवात झाली आहे. या रस्त्यांमुळे जसखार गावातील अनेक घरे संपादन करून पाडावी लागणार आहेत. त्यामुळे सिंगापूर पोर्टने जसखार गावातील प्रकल्पग्रस्त पात्र असलेल्या बेरोजगारांना नोकऱ्या देण्यात याव्यात, या मागणीसाठी मागील महिन्यात मोर्चा काढण्यात आला होता. आश्वासनांची पूर्तता न करता, उलट पोर्टचे सीईओ सुरेश अमिरो यांनी पदाचा दुरुपयोग करीत स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना डावलून चेन्नई येथील अमराठी कामगारांची भरती केल्याचा आरोप करीत, शनिवारी जसखार गाव संघर्ष समितीच्या वतीने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.